शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

आदरातिथ्याने बोलाविलेल्या पाहुण्यांना जा म्हणण्याची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:27 IST

आयुष्यात एकदाच येणारा प्रसंग म्हणजे लग्न. लग्नप्रसंगी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आनंदाची उधळण, डोळे दिपवणारी रोषणाई, ...

आयुष्यात एकदाच येणारा प्रसंग म्हणजे लग्न. लग्नप्रसंगी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आनंदाची उधळण, डोळे दिपवणारी रोषणाई, आतषबाजी, नवीन कपडे आदी सर्व काही करतात. मात्र, या आनंदावर आता कोरोनाने विरजण घातले आहे. वधू-वरासह केवळ ५० जणांच्याच उपस्थितीला प्रशासनाकडून परवानगी दिली जात आहे. त्यातच प्रत्येकाचे नाव, नंबरही लिहून ठेवावे लागत आहेत. त्यामुळे कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही, या चिंतेत वधू- वराकडील मंडळी सध्या पडली आहे.

मागील काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने आवश्यक कारवाई करणे सुरू केले आहे. ज्यांच्या घरी लग्नाची तारीख जवळ येत आहे आणि ज्यांची तयारी पूर्ण झाली आहे, अशांना वेळेवर लाॅकडाऊन तर होणार नाही ना, याची चिंता लागली आहे, तर ज्यांचा लग्नसमारंभ सध्या पार पडला आहे त्यांनी आलेल्या पाहुण्यांनी जेवण उरकताच मंगल कार्यालयातून जा म्हणण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र वधू- वर पक्षांकडील मंडळींना चांगलाच धक्का बसत आहे.

बाॅक्स

मंगल कार्यालयाकडून ॲडव्हान्स परत

कोरोनाचे संकट पुन्हा तोंड वर काढत असल्यामुळे दोन ते तीन महिन्यांपूर्वी ज्यांनी मंगल कार्यालय बुक केले आहे. त्यांनी आता ॲडव्हान्स परत घेणे सुरू केले आहे. त्यामुळे मंगल कार्यालय, लाॅन संचालकांचे मोठे नुकसान होत आहे. ५० जणांच्या उपस्थितीसाठी लाखो रुपयांचे मंगल कार्यालय, लाॅन कशासाठी, असा विचार वधू- वरांकडील मंडळी करीत आहे.

--