शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शाळेच्या लोखंडी दरवाजाचा वाद पेटला

By admin | Updated: July 16, 2015 01:22 IST

गांधी नगरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या काही दिवसांपासून शाळा व्यवस्थापन आणि नागरिकांत लोखंडी दरवाजामुळे वाद उद्भवला आहे.

ब्रह्मपुरी : गांधी नगरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या काही दिवसांपासून शाळा व्यवस्थापन आणि नागरिकांत लोखंडी दरवाजामुळे वाद उद्भवला आहे. या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.शाळेच्या सुरक्षाभिंतीचे काम लोकवर्गणीतून करण्यात आले. शाळेला लोखंडी दरवाजा कुठून ठेवायचा, यावरुन वाद झाला. प्रभागातील नागरिकांची मते विचारात न घेता काम करण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शाळा व्यवस्थापनाविरुद्ध रितसर तक्रार पंचायत समितीकडे करण्यात आली होती. त्यानंतर जुन्या दान दिलेल्या वस्तूची परस्पर विक्री करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता. जुनी मोडकळीस आलेली इमारत नष्ट करण्याविषयी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. परस्पर जुनी इमारत पाडून त्यातील किंमतीचे साहित्य मर्जीतल्या लोकांना विकण्यात आले, असाही आरोप केल्या गेला आहे. वॉर्डातील हरिभाऊ ढोमळे, गजानन गिरी, जितेंद्र धकाते, संजय दिघोरे यांनी याविषयी विचारणा केली असता, त्यांना व्यवस्थापणाने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. सुरक्षाभिंतीच्या आत मुलांना खेळण्याचे मैदान आहे. त्या संपूर्ण मैदानावर बगीचा बनविण्याचे काम करण्याविषयी उपाययोजना करण्यात आली. प्रभागातील नागरिकांनी मुलांना खेळण्यासाठी काही जागा मोकळी ठेवा व काही जागेवर बगीचा तयार करा, असे सांगितले. त्यांच्या सूचना विचाराधीन न ठेवता आपल्या मर्जीने काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पूर्वी शाळेच्या बाहेर बोअरवेल होती. नागरिक पाणी भरायचे. ती बोअरवेल आता शाळेची सुरक्षाभिंत टाकल्याने शाळेच्या आत गेली. नागरिक पाणी भरण्यासाठी गेले असता पाणी भरु दिले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)