शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची सरकारविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी

By admin | Updated: March 5, 2016 00:56 IST

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींकडे सरकारने फिरविलेली पाठ, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीकडे होत असलेले दुर्लक्ष, ...

शासनाला पाठविला ठराव : शेतकऱ्यांना कर्जातून तत्काळ मुक्त कराचंद्रपूर : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींकडे सरकारने फिरविलेली पाठ, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीकडे होत असलेले दुर्लक्ष, वाढलेल्या आत्महत्या, नापिकीमुळे ग्रामीण भागात आलेले दारिद््रय अशा विविध प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.या अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जातून संपूर्ण मुक्तता करणे, शेती व्यवसाय आणि शेतकऱ्यांना संरक्षण देणे, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पोशिंदा म्हणून उदरनिवारहासाठी दरमहा पाच हजार रूपये पेन्शन मिळणे, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करणे आदी प्रश्नांसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. शेतमजूर कृती समिती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने किशोर माथनकर आणि शंकर धोंडगे हे शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. या याचिकेसाठी आवश्यक असलेले प्रपत्र पक्षाच्या सर्व तालुका अध्यक्षांकडे आणि प्रमुख पदाधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या प्रपत्रांवर आपले नाव आणि पत्ता लिहून ते न्यायालयाच्या खंडपीठाकडे पाठवून हा लढा सामूहिक करावा, अशी विनंती जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी केली आहे. जिल्ह्यातील धान उत्पादकांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यासाठी आंदोलने करून आणि मोर्चे काढून कसलीही दखल होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्वात पक्षाने जिल्ह्यात हे पाऊल उचलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २६ नोव्हेंबरला सावलीतील विश्वशांती विद्यालयाच्या मैदानावर शेतकरी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत ठराव करून शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने ३ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्यात आला होता. मात्र सरकारने निर्णय न घेतल्याने न्यायालयात दाद मागणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)