शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची सरकारविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी

By admin | Updated: March 5, 2016 00:56 IST

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींकडे सरकारने फिरविलेली पाठ, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीकडे होत असलेले दुर्लक्ष, ...

शासनाला पाठविला ठराव : शेतकऱ्यांना कर्जातून तत्काळ मुक्त कराचंद्रपूर : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींकडे सरकारने फिरविलेली पाठ, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीकडे होत असलेले दुर्लक्ष, वाढलेल्या आत्महत्या, नापिकीमुळे ग्रामीण भागात आलेले दारिद््रय अशा विविध प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.या अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जातून संपूर्ण मुक्तता करणे, शेती व्यवसाय आणि शेतकऱ्यांना संरक्षण देणे, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पोशिंदा म्हणून उदरनिवारहासाठी दरमहा पाच हजार रूपये पेन्शन मिळणे, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करणे आदी प्रश्नांसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. शेतमजूर कृती समिती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने किशोर माथनकर आणि शंकर धोंडगे हे शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. या याचिकेसाठी आवश्यक असलेले प्रपत्र पक्षाच्या सर्व तालुका अध्यक्षांकडे आणि प्रमुख पदाधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या प्रपत्रांवर आपले नाव आणि पत्ता लिहून ते न्यायालयाच्या खंडपीठाकडे पाठवून हा लढा सामूहिक करावा, अशी विनंती जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी केली आहे. जिल्ह्यातील धान उत्पादकांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यासाठी आंदोलने करून आणि मोर्चे काढून कसलीही दखल होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्वात पक्षाने जिल्ह्यात हे पाऊल उचलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २६ नोव्हेंबरला सावलीतील विश्वशांती विद्यालयाच्या मैदानावर शेतकरी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत ठराव करून शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने ३ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्यात आला होता. मात्र सरकारने निर्णय न घेतल्याने न्यायालयात दाद मागणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)