शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
4
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
5
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
6
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
7
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
8
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
9
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
10
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
11
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
12
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
13
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
14
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
15
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
16
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
17
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
18
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
19
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
20
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आॅक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:16 IST

चंद्रपूर जिल्हा सध्या तीव्र पाणी टंचाईच्या सावटात आहे. जून महिना आता संपायला आला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील सर्व अकराही सिंचन प्रकल्प सध्या आॅक्सीजनवर आहेत. अकरापैकी चंदई व नलेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई प्रकल्पातही २८.५० टक्के जलसाठा आहे. उर्वरित आठ प्रकल्पात १५ टक्क्याहून कमी पाणी आहे. जुलै महिन्यात दमदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडणार आहे.

ठळक मुद्देचंदई, नलेश्वर प्रकल्प कोरडे : उर्वरित प्रकल्पातही १५ टक्क्यांहून कमी जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या तीव्र पाणी टंचाईच्या सावटात आहे. जून महिना आता संपायला आला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील सर्व अकराही सिंचन प्रकल्प सध्या आॅक्सीजनवर आहेत. अकरापैकी चंदई व नलेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई प्रकल्पातही २८.५० टक्के जलसाठा आहे. उर्वरित आठ प्रकल्पात १५ टक्क्याहून कमी पाणी आहे. जुलै महिन्यात दमदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत फारच अल्प पाऊस पडला. त्यामुळे जलसाठ्या पाहिजे तसा पाण्याचा साठा होऊ शकला नाही. त्यानंतर मार्च महिन्याच्या दुसºया पंधरवाड्यापासून जूनच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत जिल्ह्यात सूर्याने आग ओकली. पारा ४८ अंशापर्यंत पोहचला. या तीव्र उन्हामुळे जलसाठे झपाट्याने आटू लागले. मे महिन्यातच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प चिंताजनक स्थितीत आले होते. केवळ इरई धरणात बºयापैकी जलसाठा होता. मात्र चंद्रपूर शहर व चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र यांना पाणी पुरविताना इरई धरणाचाही जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागला. या प्रकल्पात आता केवळ २८.५० टक्के जलसाठा आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील चंदई व नलेश्वर सिंचन प्रकल्पात शून्य टक्के पाणी आहे. म्हणजेच या धरणात सध्या ठणठणाट आहे. अमलनाला धरणात ११.८३ टक्के, लभानसराड प्रकल्पात ६.२९ टक्के, पकडीगुड्डम प्रकल्पात ९.३६ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात १४.१९ टक्के, घोडाझरी प्रकल्पात ७.४६ टक्के, चारगाव धरणात १५.५६ टक्के, लालनाला प्रकल्पात १५.०३ टक्के तर आसोलामेंढा प्रकल्पात २४.३८ टक्क़े जलसाठा आहे.आता शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकºयांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकºयांसाठी वरदान आहेत. मात्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. मामा तलावांची स्थिती चिंताजनक आहे.मामा तलावाची स्थितीही चिंताजनकचंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. मोठ्या तलावात ४१.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ मध्यम तलावात ३५ टक्के जलसाठा आहे तर उर्वरित ८८ लघू मामा तलावात केवळ १८ टक्के पाणी शिल्लक आहे.