शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आॅक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:16 IST

चंद्रपूर जिल्हा सध्या तीव्र पाणी टंचाईच्या सावटात आहे. जून महिना आता संपायला आला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील सर्व अकराही सिंचन प्रकल्प सध्या आॅक्सीजनवर आहेत. अकरापैकी चंदई व नलेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई प्रकल्पातही २८.५० टक्के जलसाठा आहे. उर्वरित आठ प्रकल्पात १५ टक्क्याहून कमी पाणी आहे. जुलै महिन्यात दमदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडणार आहे.

ठळक मुद्देचंदई, नलेश्वर प्रकल्प कोरडे : उर्वरित प्रकल्पातही १५ टक्क्यांहून कमी जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या तीव्र पाणी टंचाईच्या सावटात आहे. जून महिना आता संपायला आला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील सर्व अकराही सिंचन प्रकल्प सध्या आॅक्सीजनवर आहेत. अकरापैकी चंदई व नलेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई प्रकल्पातही २८.५० टक्के जलसाठा आहे. उर्वरित आठ प्रकल्पात १५ टक्क्याहून कमी पाणी आहे. जुलै महिन्यात दमदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत फारच अल्प पाऊस पडला. त्यामुळे जलसाठ्या पाहिजे तसा पाण्याचा साठा होऊ शकला नाही. त्यानंतर मार्च महिन्याच्या दुसºया पंधरवाड्यापासून जूनच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत जिल्ह्यात सूर्याने आग ओकली. पारा ४८ अंशापर्यंत पोहचला. या तीव्र उन्हामुळे जलसाठे झपाट्याने आटू लागले. मे महिन्यातच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प चिंताजनक स्थितीत आले होते. केवळ इरई धरणात बºयापैकी जलसाठा होता. मात्र चंद्रपूर शहर व चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र यांना पाणी पुरविताना इरई धरणाचाही जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागला. या प्रकल्पात आता केवळ २८.५० टक्के जलसाठा आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील चंदई व नलेश्वर सिंचन प्रकल्पात शून्य टक्के पाणी आहे. म्हणजेच या धरणात सध्या ठणठणाट आहे. अमलनाला धरणात ११.८३ टक्के, लभानसराड प्रकल्पात ६.२९ टक्के, पकडीगुड्डम प्रकल्पात ९.३६ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात १४.१९ टक्के, घोडाझरी प्रकल्पात ७.४६ टक्के, चारगाव धरणात १५.५६ टक्के, लालनाला प्रकल्पात १५.०३ टक्के तर आसोलामेंढा प्रकल्पात २४.३८ टक्क़े जलसाठा आहे.आता शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकºयांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकºयांसाठी वरदान आहेत. मात्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. मामा तलावांची स्थिती चिंताजनक आहे.मामा तलावाची स्थितीही चिंताजनकचंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. मोठ्या तलावात ४१.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ मध्यम तलावात ३५ टक्के जलसाठा आहे तर उर्वरित ८८ लघू मामा तलावात केवळ १८ टक्के पाणी शिल्लक आहे.