शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आॅक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:16 IST

चंद्रपूर जिल्हा सध्या तीव्र पाणी टंचाईच्या सावटात आहे. जून महिना आता संपायला आला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील सर्व अकराही सिंचन प्रकल्प सध्या आॅक्सीजनवर आहेत. अकरापैकी चंदई व नलेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई प्रकल्पातही २८.५० टक्के जलसाठा आहे. उर्वरित आठ प्रकल्पात १५ टक्क्याहून कमी पाणी आहे. जुलै महिन्यात दमदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडणार आहे.

ठळक मुद्देचंदई, नलेश्वर प्रकल्प कोरडे : उर्वरित प्रकल्पातही १५ टक्क्यांहून कमी जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या तीव्र पाणी टंचाईच्या सावटात आहे. जून महिना आता संपायला आला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील सर्व अकराही सिंचन प्रकल्प सध्या आॅक्सीजनवर आहेत. अकरापैकी चंदई व नलेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई प्रकल्पातही २८.५० टक्के जलसाठा आहे. उर्वरित आठ प्रकल्पात १५ टक्क्याहून कमी पाणी आहे. जुलै महिन्यात दमदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत फारच अल्प पाऊस पडला. त्यामुळे जलसाठ्या पाहिजे तसा पाण्याचा साठा होऊ शकला नाही. त्यानंतर मार्च महिन्याच्या दुसºया पंधरवाड्यापासून जूनच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत जिल्ह्यात सूर्याने आग ओकली. पारा ४८ अंशापर्यंत पोहचला. या तीव्र उन्हामुळे जलसाठे झपाट्याने आटू लागले. मे महिन्यातच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प चिंताजनक स्थितीत आले होते. केवळ इरई धरणात बºयापैकी जलसाठा होता. मात्र चंद्रपूर शहर व चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र यांना पाणी पुरविताना इरई धरणाचाही जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागला. या प्रकल्पात आता केवळ २८.५० टक्के जलसाठा आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील चंदई व नलेश्वर सिंचन प्रकल्पात शून्य टक्के पाणी आहे. म्हणजेच या धरणात सध्या ठणठणाट आहे. अमलनाला धरणात ११.८३ टक्के, लभानसराड प्रकल्पात ६.२९ टक्के, पकडीगुड्डम प्रकल्पात ९.३६ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात १४.१९ टक्के, घोडाझरी प्रकल्पात ७.४६ टक्के, चारगाव धरणात १५.५६ टक्के, लालनाला प्रकल्पात १५.०३ टक्के तर आसोलामेंढा प्रकल्पात २४.३८ टक्क़े जलसाठा आहे.आता शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकºयांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकºयांसाठी वरदान आहेत. मात्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. मामा तलावांची स्थिती चिंताजनक आहे.मामा तलावाची स्थितीही चिंताजनकचंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. मोठ्या तलावात ४१.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ मध्यम तलावात ३५ टक्के जलसाठा आहे तर उर्वरित ८८ लघू मामा तलावात केवळ १८ टक्के पाणी शिल्लक आहे.