शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मनपाद्वारे इरई धरणातील पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: June 6, 2016 01:57 IST

चंद्रपूर महानगरपालिकेकडून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इरई धरणातून पाण्याची उचल करीत

दुर्गापूर : चंद्रपूर महानगरपालिकेकडून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इरई धरणातून पाण्याची उचल करीत आहे. याकरिता टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यावरील एअर व्हॉल्व्हमधून आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या गळत्या बंद करण्यासाठी वीज केंद्राने वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र महानगरपालिकेने याकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने गेल्या कित्येक वर्षापासून येथून संततधार पाणी वाहत आहे.चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात पाणी आणि कोळश्याच्या आधारावर विजेची निर्मिती केली जाते. वीज केंद्राला विजेच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. याकरिता वीज केंद्राने खास इरई धरणाचे बांधकाम केले आहे. येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील सात संच व ऊर्जानगर वसाहतीला पुरेल एवढे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या धरणात आहे. हे धरण केवळ पावसाळ्यात आलेल्या पावसाच्या भरवशावर भरल्या जाते. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे त्यात अनेकदा जलसाठा होेत नाही. धरण तुडुंब भरो किंवा न भरो यातून चंद्रपूर शहराला पाणी देणे बंधनकारक आहे. यासाठी धरणापासून तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १५ ते १८ किलोमिटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. यावर ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. येथून पाण्याचा पुरवठा होत असताना हवेसोबत काही प्रमाणात सतत पाणी बाहेर फेकल्या जाते. मात्र कोयना गेटपासून तुकूम येथील खत्री कॉलेजपर्यंतच्या या तीन किलोमिटरपर्यंतच्या जलवाहिनीवर सहा ते सात एअर व्हॉल्व्ह आहेत. यामधून गेल्या अनेक वर्षापासून सतत आवश्यकतेपेक्षा कितीतरी पट जास्त प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.वीज केंद्राला अविरत वीज निर्मिती करण्यासाठी थेंब-थेंब पाण्याची बचत करावी लागते. त्यामुळे त्यांच्या जलवाहिनीवरील गळत्या ते तात्काळ बंद करतात. उन्हाळ्यात धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी खालावते. हे थांबविणे फार कठीण आहे. मात्र गळत्या बंद करून धरणातील पाण्याची सहज बचत करता येते. बाष्पीभवनाद्वारे निर्माण होणारी पाण्याची तुट जलवाहिनीवरील गळत्या बंद करून भरून काढता येते. मात्र हे महानगरपालिकेच्या अद्यापही डोक्यात आले नाही. याबाबत वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे यांची भेट घेतली असता, या गळत्या बंद करण्याबाबत आयुक्तांना पत्र देऊन जलवाहिनीवर मीटर बसविण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या मिटरमुळे धरणातून चंद्रपूर शहराला किती पाण्याचा पुरवठा होत आहे, याची माहिती मिळते. याशिवाय गळत्यांमधून किती पाण्याचा अपव्यय होत आहे. याची सुद्धा माहिती जाणून घेता येते. यावरून गळत्या बंद करून पाण्याचा अपव्यय टोळता येतो. मात्र महानगरपालिका याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत आहे. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे कोणत्याही क्षणी वीज केंद्राला फटका बसण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)