शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
2
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
3
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
4
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
5
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
6
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
7
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
8
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
9
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
10
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
11
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
12
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
13
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
14
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
15
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
16
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
17
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
18
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
19
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
20
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 

अनियमित वेतनाचा कर्मचाऱ्यांना वैताग

By admin | Updated: February 1, 2016 00:53 IST

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर असूनसुद्धा या शाळांकरिता शासनाकडून नियमित वेतन निधी मिळत नाही.

लांबलेली प्रतीक्षा : अनेकदा रखडले जाते वेतननितीन मुसळे सास्तीआदिवासी उपयोजना क्षेत्रातील माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर असूनसुद्धा या शाळांकरिता शासनाकडून नियमित वेतन निधी मिळत नाही. अशा शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन अनेकदा रखडले जात आहे. मागील तीन महिन्यांपासून येथील कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. नियमित वेतन मिळणार कधी, हा कर्मचाऱ्यांचा प्रश्न अद्यापही कुणी सोडवू शकला नाही.आदिवासी जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता व आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, याकरिता आदिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शासनाने शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. आदिवासी क्षेत्रात असलेल्या शाळांचा दर्जा सुधारावा व माध्यमिक शिक्षणाचा समतोल विकास साधता यावा व विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या माध्यमिक शाळांना अनुदान मिळणे सुलभ व्हावे, याकरिता या शाळांची तपासणी करून १०० टक्के अनुदानास पात्र म्हणून ठरविले. शाळा अनुदानास पात्र ठरल्यामुळे बऱ्याच वर्षापासून पगाराविना काम करणाऱ्या येथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. मात्र अनुदानास पात्र ठरविलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शाळांना नियमित वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे चेहरे पुन्हा कोमेजले असून नियमित वेतन मिळत नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.शासनाने ३० मे २००८ व ११ फेब्रुवारी २००९ च्या शासन निर्णयान्वये अनुदानास पात्र ठरविलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शाळांना अजूनही नियमित अनुदान प्राप्त होत नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचे वेतन नेहमीच अनियमित म्हणजेच पाच ते सहा महिन्यापर्यंत मिळत नाही. आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता मोठ्या सवलती सुरू करणारे शासन मात्र या शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. आदिवासी क्षेत्रातील अनुदानास पात्र ठरलेल्या या शाळांना अनुदान लागू करणे शासनाचा स्वेच्छाधिकार असून निधीच्या उपलब्धतेनुसार शासन निकषपात्र शाळांना अनुदान लागू करेल, असा उल्लेख अनुदान पत्रात केला आहे. यामुळे येथील कर्मचारी शासन स्तरावर आपला हक्कही मागू शकत नाही. त्यामुळे मिळेल तेव्हा पगार घ्यायचा, असा नित्यक्रम सुरू असून नियमित पगार केव्हा मिळेल, हा प्रश्न आजही त्यांच्यासमोर कायम आहे. शासनाने आॅक्टोबरपासून या शाळांना वेतन निधी न दिल्यामुळे येथील कर्मचारी वेतनाविना आहेत. तीन महिन्यांपासून पगार नसल्याने येथील कर्मचारी आर्थिक संकटात सापडला असून त्यांच्यावर व त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. मागील अनेक वर्षापासून या आदिवासी क्षेत्रातील शाळा निधीच्या तरतुदीसाठी नियमित करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे बिकट स्थिती निर्माण होत असून याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.वित्तमंत्र्यांकडून कर्मचाऱ्यांना आशाशाळा २००८ पासून अनुदानावर आल्या असून मागील आठ वर्षापासून या शाळांना वेतन निधी नियमित मिळत नाही. अनेकदा वेतन रखडले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाला समोरे जावे लागत आहे. आदिवासी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. परंतु या शाळातील कर्मचाऱ्यांवर मात्र अन्याय होत असून राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांनी केली आहे.