शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

राजीव गांधी सभागृहात पार पडल्या इच्छुकांच्या मुलाखती

By admin | Updated: March 29, 2017 01:48 IST

मनपा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामांकन दाखल करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे.

१७ प्रभागासाठी दोन गटात निरीक्षकांनी घेतली उमेदवाराची परीक्षा चंद्रपूर : मनपा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामांकन दाखल करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाने १७ प्रभागातील ६६ उमेदवार निवडण्यासाठी येथील राजीव गांधी सभागृहात मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यासाठी पक्षाच्या निरीक्षकांनी १७ प्रभागासाठी दोन गटात उमेदवारांची परीक्षा घेतली. काँग्रेसचे येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून आलेले माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया, डॉ.वजाहत मिर्झा, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, नंदू नागरकर, गजानन गावंडे, युवा नेते राहूल पुगलिय यांनी प्रभाग क्रमांक ९ ते १७ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचप्रमाणे येथील प्रभाग क्रमांक १ ते ८ मधील इच्छुक उमेदवारांची परीक्षा गोंदियाचे आमदार व निरीक्षक गोपालदास अग्रवाल, नितीन कुंभलकर, किशोर जिचकार, जिया पटेल, गिरीश पांडव, शकुर नागाणी, प्रमोद तितरमारे, डॉ.आसावरी देवतळे यांच्या पॅनलने घेतली. आजच्या मुलाखतीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांनी समर्थकांसह राजीव गांधी सभागृहात मोठी गर्दी केली. शेकडोवर इच्छुकांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून निरीक्षकांना आर्जव केली. विद्यमान नगरसेवक उषा धांडे, सकीना अंसारी, मीना खनके, सुनिता लोढिया यांच्यासह प्रवीण पडवेकर, अशोक नागापूरे, प्रशांत दानव यांचा उमेदवारी मागणाऱ्यात समावेश होता. काही तरुण कार्यकर्त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखतीला हजेरी लावली. (स्थानिक प्रतिनिधी) काँग्रेसची एकता कायम राहणार काय? अलीकडेच नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली. राजुरा नगरपालिका वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसला यश आले नाही. त्या निवडणुकीत काँग्रेसचे सुत्र ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पॅनलकडे सोपविण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मानपानाचे नाटक घडले. आजच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात पार पडल्या. यावेळी सर्वच नेते गटतट विसरून एकाच ठिकाणी आले. अपवाद फक्त आमदार वडेट्टीवार यांचा होता. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत साऱ्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी वज्रमुठ बांधली, तर सत्ताधारी पक्षाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसची आजची एकता निवडणुकीपर्यंत कायम राहणार काय? असा प्रश्न मतदारात चर्चिला जात आहे.