शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी सभागृहात पार पडल्या इच्छुकांच्या मुलाखती

By admin | Updated: March 29, 2017 01:48 IST

मनपा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामांकन दाखल करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे.

१७ प्रभागासाठी दोन गटात निरीक्षकांनी घेतली उमेदवाराची परीक्षा चंद्रपूर : मनपा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामांकन दाखल करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाने १७ प्रभागातील ६६ उमेदवार निवडण्यासाठी येथील राजीव गांधी सभागृहात मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यासाठी पक्षाच्या निरीक्षकांनी १७ प्रभागासाठी दोन गटात उमेदवारांची परीक्षा घेतली. काँग्रेसचे येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून आलेले माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया, डॉ.वजाहत मिर्झा, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, नंदू नागरकर, गजानन गावंडे, युवा नेते राहूल पुगलिय यांनी प्रभाग क्रमांक ९ ते १७ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचप्रमाणे येथील प्रभाग क्रमांक १ ते ८ मधील इच्छुक उमेदवारांची परीक्षा गोंदियाचे आमदार व निरीक्षक गोपालदास अग्रवाल, नितीन कुंभलकर, किशोर जिचकार, जिया पटेल, गिरीश पांडव, शकुर नागाणी, प्रमोद तितरमारे, डॉ.आसावरी देवतळे यांच्या पॅनलने घेतली. आजच्या मुलाखतीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांनी समर्थकांसह राजीव गांधी सभागृहात मोठी गर्दी केली. शेकडोवर इच्छुकांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून निरीक्षकांना आर्जव केली. विद्यमान नगरसेवक उषा धांडे, सकीना अंसारी, मीना खनके, सुनिता लोढिया यांच्यासह प्रवीण पडवेकर, अशोक नागापूरे, प्रशांत दानव यांचा उमेदवारी मागणाऱ्यात समावेश होता. काही तरुण कार्यकर्त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखतीला हजेरी लावली. (स्थानिक प्रतिनिधी) काँग्रेसची एकता कायम राहणार काय? अलीकडेच नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली. राजुरा नगरपालिका वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसला यश आले नाही. त्या निवडणुकीत काँग्रेसचे सुत्र ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पॅनलकडे सोपविण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मानपानाचे नाटक घडले. आजच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात पार पडल्या. यावेळी सर्वच नेते गटतट विसरून एकाच ठिकाणी आले. अपवाद फक्त आमदार वडेट्टीवार यांचा होता. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत साऱ्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी वज्रमुठ बांधली, तर सत्ताधारी पक्षाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसची आजची एकता निवडणुकीपर्यंत कायम राहणार काय? असा प्रश्न मतदारात चर्चिला जात आहे.