शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

राजीव गांधी सभागृहात पार पडल्या इच्छुकांच्या मुलाखती

By admin | Updated: March 29, 2017 01:48 IST

मनपा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामांकन दाखल करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे.

१७ प्रभागासाठी दोन गटात निरीक्षकांनी घेतली उमेदवाराची परीक्षा चंद्रपूर : मनपा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामांकन दाखल करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाने १७ प्रभागातील ६६ उमेदवार निवडण्यासाठी येथील राजीव गांधी सभागृहात मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यासाठी पक्षाच्या निरीक्षकांनी १७ प्रभागासाठी दोन गटात उमेदवारांची परीक्षा घेतली. काँग्रेसचे येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून आलेले माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया, डॉ.वजाहत मिर्झा, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, नंदू नागरकर, गजानन गावंडे, युवा नेते राहूल पुगलिय यांनी प्रभाग क्रमांक ९ ते १७ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचप्रमाणे येथील प्रभाग क्रमांक १ ते ८ मधील इच्छुक उमेदवारांची परीक्षा गोंदियाचे आमदार व निरीक्षक गोपालदास अग्रवाल, नितीन कुंभलकर, किशोर जिचकार, जिया पटेल, गिरीश पांडव, शकुर नागाणी, प्रमोद तितरमारे, डॉ.आसावरी देवतळे यांच्या पॅनलने घेतली. आजच्या मुलाखतीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांनी समर्थकांसह राजीव गांधी सभागृहात मोठी गर्दी केली. शेकडोवर इच्छुकांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून निरीक्षकांना आर्जव केली. विद्यमान नगरसेवक उषा धांडे, सकीना अंसारी, मीना खनके, सुनिता लोढिया यांच्यासह प्रवीण पडवेकर, अशोक नागापूरे, प्रशांत दानव यांचा उमेदवारी मागणाऱ्यात समावेश होता. काही तरुण कार्यकर्त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखतीला हजेरी लावली. (स्थानिक प्रतिनिधी) काँग्रेसची एकता कायम राहणार काय? अलीकडेच नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली. राजुरा नगरपालिका वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसला यश आले नाही. त्या निवडणुकीत काँग्रेसचे सुत्र ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पॅनलकडे सोपविण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मानपानाचे नाटक घडले. आजच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात पार पडल्या. यावेळी सर्वच नेते गटतट विसरून एकाच ठिकाणी आले. अपवाद फक्त आमदार वडेट्टीवार यांचा होता. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत साऱ्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी वज्रमुठ बांधली, तर सत्ताधारी पक्षाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसची आजची एकता निवडणुकीपर्यंत कायम राहणार काय? असा प्रश्न मतदारात चर्चिला जात आहे.