शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

कृषी कर्जावर व्याज आकारणी

By admin | Updated: July 3, 2015 01:18 IST

शासनाच्या धोरणानुसार एक लाख रुपयापर्यंत कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बीन व्याजी कर्ज देण्याचे धोरण आले.

शेतकरी त्रस्त : राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांची फसवणूकसावली : शासनाच्या धोरणानुसार एक लाख रुपयापर्यंत कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बीन व्याजी कर्ज देण्याचे धोरण आले. मात्र राष्ट्रीयकृत बँका कृषी कर्जावर प्रत्यक्ष सात टक्के व्याज आकारुण शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार बीन बोभाटपणे सुरु आहे. शासनाने ठरविलेल्या कृषी पत धोरणानुसार एक लाख रुपयापर्यंत कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून कोणत्याच प्रकारचे व्याज घेण्यात येणार नाही, असा फतवा जारी करण्यात आला. परंतु राष्ट्रीयकृत बँकांकडून शासन निर्णयाचे उल्लंघन केले जात आहे. या विरोधात आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधींने आवाज उठविला नाही, ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यांना सबसीडी देण्याच्या नावावर त्यांची शुद्ध फसवणूक केली जात आहे. राष्ट्रीयकृत बँका कृषी कर्ज दिल्यानंतर सात टक्के व्याजाची आकारणी करीत आहेत आणि शासनाकडून आल्यानंतर आम्ही ते व्याज परत करु, असे ते सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात दोन ते तीन टक्के व्याजाची रक्कम आजपर्यंत कृषी कर्ज धारकांना परत केल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर कृषी कर्ज धारकांकडून प्रक्रिया शुल्क म्हणून प्रत्येकी एक ते दीड हजार रुपये वसुल केले जात असल्याने शेतकऱ्यांवर नाहक भुर्दंड पडत आहे. एकीकडे बिनव्याजी कर्ज देण्याचा शासनाचा कांगावा आणि दुसरीकडे बँकांकडून व्याजाच्या नावाने वसुली, यात शेतकरी भरडला जात आहे. याशिवाय कृषी कर्जासोबतच पीक विम्याचाही हप्ता वसुल केला जात असला, तरी १९९८ नंतर आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला विम्याचे संरक्षण मिळाले नाही, हे विशेष. शासकीय अहवालानुसार ५० टक्के पेक्षा कमी आणेवारी असताना सुद्धा शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहीले आहेत. त्यामुळे एकूण कृषी कर्जाच्या प्रक्रियेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)