शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

By admin | Updated: July 15, 2015 01:10 IST

शेतीचा पीक विमा काढणाऱ्या कबाल इन्शुरन्स कंपनीने मागील हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३.४६ टक्के विम्याची रक्कम परतावा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

केवळ ३.४६ टक्के विमा : २ हजार ९९९ शेतकऱ्यांना नाममात्र लाभसावली : शेतीचा पीक विमा काढणाऱ्या कबाल इन्शुरन्स कंपनीने मागील हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३.४६ टक्के विम्याची रक्कम परतावा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.शासनाच्या कृषी पत धोरणानुसार प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार दरवर्षी शेतकऱ्यांकडून पीक विमा काढला जातो. मागील वर्षीच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याबदल्यात कबाल इंश्युरन्स कंपनीने हेक्टरी केवळ ५२० रुपये विम्यापोटी सानुग्रह मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. सावली तालुक्यातील २ हजार ९९९ शेतकऱ्यांनाच या विमा योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र प्रत्येक शेतकऱ्याने पीक विम्याकरिता जेवढी रक्कम भरली. त्यापेक्षाही कमी रक्कम विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गतवर्षीच्या हंगामात ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी असुनही प्रत्यक्षात ३.४६ टक्केच विमा परतावा केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी जेवढी रक्कम पीक विम्यासाठी भरतो, तेवढीच रक्कम शासनाकडूनसुद्धा भरली जाते.सावली: कबाल इन्शुरन्स कंपनीने एकरी केवळ २०८ रुपये जमा केले आहेत. यावरुन शासनाचे शेतकऱ्याविषयाचे उदासीन धोरण स्पष्ट होत आहे. हेक्टरी १५ हजार रुपये उत्पन्नाची मर्यादा लक्षात घेऊन त्यानुसारच पीक विमा काढला जातो. त्या धोरणानुसारच कबाल इन्शुरन्स कंपनीने ५२० रुपये (३.४६ टक्के) विमा परतावा केल्याचे स्पष्ट होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांच्याच बँक खात्यात सदर पीक विम्याची तटपुंजी रक्कम जमा झाली आहे. यातही इतर शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. संपूर्ण सावली तालुक्याची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असतानाही केवळ सावली परिसरातीलच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साधारणपणे सावली तालुक्यात १५ ते १७ हजार शेतकरी कुटुंब असताना केवळ दोन हजार ९९९ शेतकरी कुटुंबानाच पीक विम्याची नाममात्र रक्कम देऊन शासनाला कोणता हेतू साध्य करायचा आहे, याबद्दल शेतकऱ्यामध्ये सांशकता आहे. (तालुका प्रतिनिधी)