शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

By admin | Updated: July 15, 2015 01:10 IST

शेतीचा पीक विमा काढणाऱ्या कबाल इन्शुरन्स कंपनीने मागील हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३.४६ टक्के विम्याची रक्कम परतावा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

केवळ ३.४६ टक्के विमा : २ हजार ९९९ शेतकऱ्यांना नाममात्र लाभसावली : शेतीचा पीक विमा काढणाऱ्या कबाल इन्शुरन्स कंपनीने मागील हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३.४६ टक्के विम्याची रक्कम परतावा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.शासनाच्या कृषी पत धोरणानुसार प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार दरवर्षी शेतकऱ्यांकडून पीक विमा काढला जातो. मागील वर्षीच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याबदल्यात कबाल इंश्युरन्स कंपनीने हेक्टरी केवळ ५२० रुपये विम्यापोटी सानुग्रह मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. सावली तालुक्यातील २ हजार ९९९ शेतकऱ्यांनाच या विमा योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र प्रत्येक शेतकऱ्याने पीक विम्याकरिता जेवढी रक्कम भरली. त्यापेक्षाही कमी रक्कम विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गतवर्षीच्या हंगामात ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी असुनही प्रत्यक्षात ३.४६ टक्केच विमा परतावा केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी जेवढी रक्कम पीक विम्यासाठी भरतो, तेवढीच रक्कम शासनाकडूनसुद्धा भरली जाते.सावली: कबाल इन्शुरन्स कंपनीने एकरी केवळ २०८ रुपये जमा केले आहेत. यावरुन शासनाचे शेतकऱ्याविषयाचे उदासीन धोरण स्पष्ट होत आहे. हेक्टरी १५ हजार रुपये उत्पन्नाची मर्यादा लक्षात घेऊन त्यानुसारच पीक विमा काढला जातो. त्या धोरणानुसारच कबाल इन्शुरन्स कंपनीने ५२० रुपये (३.४६ टक्के) विमा परतावा केल्याचे स्पष्ट होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांच्याच बँक खात्यात सदर पीक विम्याची तटपुंजी रक्कम जमा झाली आहे. यातही इतर शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. संपूर्ण सावली तालुक्याची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असतानाही केवळ सावली परिसरातीलच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साधारणपणे सावली तालुक्यात १५ ते १७ हजार शेतकरी कुटुंब असताना केवळ दोन हजार ९९९ शेतकरी कुटुंबानाच पीक विम्याची नाममात्र रक्कम देऊन शासनाला कोणता हेतू साध्य करायचा आहे, याबद्दल शेतकऱ्यामध्ये सांशकता आहे. (तालुका प्रतिनिधी)