शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी नहराचा तत्काळ उपसा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:12 IST

नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव शेतकºयांसाठी वरदान आहे. तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून घोडाझरीची ओळख आहे.

ठळक मुद्देसिंचन विभागाचे दुर्लक्ष : ५८ गावांतील शेतकºयांमध्ये संतापाची लाट

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा) : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव शेतकºयांसाठी वरदान आहे. तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून घोडाझरीची ओळख आहे. सुमारे सात हजार ५०० हेक्टर शेतजमीन घोडाझरी तलावाच्या पाण्याने सिंचित होते. ५८ गावातील शेतकरी या तलावावर अवलंबून आहेत. मात्र, नहर सोडण्याची वेळ जवळ येऊनही अजूनपर्यंत नहराची साफसफाई (उपसा) न झाल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.घोडाझरी तलावाचे दोन मुख्य कालवे आहेत. एक कालवा नवरगावकडे जातो तर एक कालवा तळोधी (बा.) कडे येतो. या दोन मुख्य कालव्याचे उपकालवे आहेत. नहर सोडण्यापूर्वी या कालव्याची साफसफाई होणे आवश्यक असते. उपसा करण्यासाठी सिंचन विभागाला शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कालव्याचा थातूरमातूर उपसा केला जातो व लाखो रुपयांचा निधी कंत्राटदाराच्या घशात जातो. घोडाझरी नहराची एवढी दुरवस्था झाली आहे की नहर सोडल्यावर काही दिवसातच कुठूनतरी नहर फुटतो व ऐन शेतकºयाला पाण्याची गरज असताना शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. घोडाझरी नहराच्या उपसा नसल्याने शेवटच्या शेतकºयांचे धानपीक पाण्याअभावी करपले जाते. नहरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे तयार झाली आहेत. त्या झाडांची मुळे खोलवर रुजल्याने नहराला भेगा पडून नहर कमजोर होत आहे. याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नहरावर काही ठिकाणी अतिक्रमण केले गेले आहे. मात्र, हे अतिक्रमण सिंचाई विभागाकडून अजूनपर्यंत काढण्यात आले नाही.यावर्षी सुरुवातीला पावसाने शेतकºयांना दगा दिला. अधून-मधून झालेल्या पावसाने रोवणी झाली. नवरगाव परिसरातील काही भागात तर आतापर्यंत रोवणी झाली. घोडाझरी तलावात अंदाजे १४ फुट पाणी आहे. काही दिवसात नहर सोडला जाणार आहे. मात्र, घोडाझरीचे पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत पोहचणार की नाही, याची शाश्वती वाटत नाही. नहराला काही ठिकाणी मोठे भगदाड पडले असून, नहर कमजोर झाला आहे. नहराच्या उपकालव्याचा लाखो रुपयांचा खर्च दाखविला जातो. मात्र, प्रत्यक्षात काम केले जात नाही. त्यामुळे शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. नहर सोडण्याच्या काही दिवसांपूर्वी थातूरमातूर नहर साफ केला जातो. एकूणच घोडाझरी नहराकडे संबंधित विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. पाणी असूनही शेतकºयांना पाणी मिळणार की नाही, अशी भीती असून नहर साफ न केल्याने शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित विभागाने नहराची लवकरात लवकर साफसफाई करावी, अशी मागणी केली जात आहे.