शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी नहराचा तत्काळ उपसा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:12 IST

नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव शेतकºयांसाठी वरदान आहे. तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून घोडाझरीची ओळख आहे.

ठळक मुद्देसिंचन विभागाचे दुर्लक्ष : ५८ गावांतील शेतकºयांमध्ये संतापाची लाट

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा) : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव शेतकºयांसाठी वरदान आहे. तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून घोडाझरीची ओळख आहे. सुमारे सात हजार ५०० हेक्टर शेतजमीन घोडाझरी तलावाच्या पाण्याने सिंचित होते. ५८ गावातील शेतकरी या तलावावर अवलंबून आहेत. मात्र, नहर सोडण्याची वेळ जवळ येऊनही अजूनपर्यंत नहराची साफसफाई (उपसा) न झाल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.घोडाझरी तलावाचे दोन मुख्य कालवे आहेत. एक कालवा नवरगावकडे जातो तर एक कालवा तळोधी (बा.) कडे येतो. या दोन मुख्य कालव्याचे उपकालवे आहेत. नहर सोडण्यापूर्वी या कालव्याची साफसफाई होणे आवश्यक असते. उपसा करण्यासाठी सिंचन विभागाला शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कालव्याचा थातूरमातूर उपसा केला जातो व लाखो रुपयांचा निधी कंत्राटदाराच्या घशात जातो. घोडाझरी नहराची एवढी दुरवस्था झाली आहे की नहर सोडल्यावर काही दिवसातच कुठूनतरी नहर फुटतो व ऐन शेतकºयाला पाण्याची गरज असताना शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. घोडाझरी नहराच्या उपसा नसल्याने शेवटच्या शेतकºयांचे धानपीक पाण्याअभावी करपले जाते. नहरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे तयार झाली आहेत. त्या झाडांची मुळे खोलवर रुजल्याने नहराला भेगा पडून नहर कमजोर होत आहे. याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नहरावर काही ठिकाणी अतिक्रमण केले गेले आहे. मात्र, हे अतिक्रमण सिंचाई विभागाकडून अजूनपर्यंत काढण्यात आले नाही.यावर्षी सुरुवातीला पावसाने शेतकºयांना दगा दिला. अधून-मधून झालेल्या पावसाने रोवणी झाली. नवरगाव परिसरातील काही भागात तर आतापर्यंत रोवणी झाली. घोडाझरी तलावात अंदाजे १४ फुट पाणी आहे. काही दिवसात नहर सोडला जाणार आहे. मात्र, घोडाझरीचे पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत पोहचणार की नाही, याची शाश्वती वाटत नाही. नहराला काही ठिकाणी मोठे भगदाड पडले असून, नहर कमजोर झाला आहे. नहराच्या उपकालव्याचा लाखो रुपयांचा खर्च दाखविला जातो. मात्र, प्रत्यक्षात काम केले जात नाही. त्यामुळे शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. नहर सोडण्याच्या काही दिवसांपूर्वी थातूरमातूर नहर साफ केला जातो. एकूणच घोडाझरी नहराकडे संबंधित विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. पाणी असूनही शेतकºयांना पाणी मिळणार की नाही, अशी भीती असून नहर साफ न केल्याने शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित विभागाने नहराची लवकरात लवकर साफसफाई करावी, अशी मागणी केली जात आहे.