शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

घोडाझरी नहराचा तत्काळ उपसा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:12 IST

नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव शेतकºयांसाठी वरदान आहे. तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून घोडाझरीची ओळख आहे.

ठळक मुद्देसिंचन विभागाचे दुर्लक्ष : ५८ गावांतील शेतकºयांमध्ये संतापाची लाट

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा) : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव शेतकºयांसाठी वरदान आहे. तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून घोडाझरीची ओळख आहे. सुमारे सात हजार ५०० हेक्टर शेतजमीन घोडाझरी तलावाच्या पाण्याने सिंचित होते. ५८ गावातील शेतकरी या तलावावर अवलंबून आहेत. मात्र, नहर सोडण्याची वेळ जवळ येऊनही अजूनपर्यंत नहराची साफसफाई (उपसा) न झाल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.घोडाझरी तलावाचे दोन मुख्य कालवे आहेत. एक कालवा नवरगावकडे जातो तर एक कालवा तळोधी (बा.) कडे येतो. या दोन मुख्य कालव्याचे उपकालवे आहेत. नहर सोडण्यापूर्वी या कालव्याची साफसफाई होणे आवश्यक असते. उपसा करण्यासाठी सिंचन विभागाला शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कालव्याचा थातूरमातूर उपसा केला जातो व लाखो रुपयांचा निधी कंत्राटदाराच्या घशात जातो. घोडाझरी नहराची एवढी दुरवस्था झाली आहे की नहर सोडल्यावर काही दिवसातच कुठूनतरी नहर फुटतो व ऐन शेतकºयाला पाण्याची गरज असताना शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. घोडाझरी नहराच्या उपसा नसल्याने शेवटच्या शेतकºयांचे धानपीक पाण्याअभावी करपले जाते. नहरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे तयार झाली आहेत. त्या झाडांची मुळे खोलवर रुजल्याने नहराला भेगा पडून नहर कमजोर होत आहे. याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नहरावर काही ठिकाणी अतिक्रमण केले गेले आहे. मात्र, हे अतिक्रमण सिंचाई विभागाकडून अजूनपर्यंत काढण्यात आले नाही.यावर्षी सुरुवातीला पावसाने शेतकºयांना दगा दिला. अधून-मधून झालेल्या पावसाने रोवणी झाली. नवरगाव परिसरातील काही भागात तर आतापर्यंत रोवणी झाली. घोडाझरी तलावात अंदाजे १४ फुट पाणी आहे. काही दिवसात नहर सोडला जाणार आहे. मात्र, घोडाझरीचे पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत पोहचणार की नाही, याची शाश्वती वाटत नाही. नहराला काही ठिकाणी मोठे भगदाड पडले असून, नहर कमजोर झाला आहे. नहराच्या उपकालव्याचा लाखो रुपयांचा खर्च दाखविला जातो. मात्र, प्रत्यक्षात काम केले जात नाही. त्यामुळे शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. नहर सोडण्याच्या काही दिवसांपूर्वी थातूरमातूर नहर साफ केला जातो. एकूणच घोडाझरी नहराकडे संबंधित विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. पाणी असूनही शेतकºयांना पाणी मिळणार की नाही, अशी भीती असून नहर साफ न केल्याने शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित विभागाने नहराची लवकरात लवकर साफसफाई करावी, अशी मागणी केली जात आहे.