शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची महाराष्ट्रासाठी अभिनव खोज स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:06 IST

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला आपल्या कल्पक आयडीया मागितल्या आहेत.

ठळक मुद्देमुनगंटीवार यांचे मार्गदर्शनजनतेच्या नव्या कल्पनांना वाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला आपल्या कल्पक आयडीया मागितल्या आहेत. ३१ मार्चपर्यंत आपल्या संकल्पना आॅनलाईन, आॅफलाईन प्रशासनाकडे पाठविण्याची विनंती केली आहे. या अभिनव स्पर्धेत देशातील व महाराष्ट्रातील सर्व कल्पक नागरिकांना सहभागी होता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिली.महाराष्ट्राचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात या अभिनव स्पर्धचे आयोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यापूर्वी सामान्य जनतेच्या प्रशासनातील अडचणी सोडवता याव्यात, यासाठी मोबाईलवरुन प्रशासनाशी संवाद साधणारा ‘हॅलो चांदा’ हा उपक्रम जिल्ह्यात कमालीचा यशस्वी ठरला आहे. खोज अर्थात शोध नाविन्याचा ही स्पर्धा देखील शेती, उपजिविका विकास, पर्यटन व प्रशासन सुधारणा यामध्ये प्रशासनाने काय बदल करावेत, याच्या संकल्पना मागवणारी आहे. सामान्य व्यक्तीकडे अनेक भन्नाट कल्पना असतात. अशा अफलातून कल्पनांमुळे क्षणात मोठे बदल संभवतात. अशा बदलांना प्रशासनात उपयोगात आणण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.असे होता येणार सहभागीमहाराष्ट्रात प्रथमच एखाद्या जिल्ह्यात असा प्रयोग होत आहे. सर्व नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर या संदभार्तील लिंक देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबपोर्टलवरही याबाबतच्या सूचना व लिंक देण्यात आली आहे. डब्लूडब्लूडब्लू.महाराष्ट्र.एमवायजीओव्ही.इन या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पत्रकार, विचारवंत, डॉक्टर, वकील व सर्व क्षेत्रातील मान्यवरांना यामध्ये सहभागी होता येईल. सर्वोत्कृष्ट कल्पनांकरिता १ लाख २ हजार रुपयांची रोख बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. यासाठी ‘हॅलो चांदा’ या टोल फ्री क्रमांक १८००-२६६-४४०१ वर माहिती उपलब्ध आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार