शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

माथाडी कामगारांवर अन्याय

By admin | Updated: March 8, 2016 00:51 IST

शासनाचा माथाडी कामगार कायदा १९६९ हा चंद्रपूरला सन २००४ मध्ये लागू झाला. या कायद्याची अंमलबजावणी वखार मंडळे, शासकीय गोदामे, सिमेंट गोदामे, रेल्वे माल धक्का या ठिकाणी चालू आहे.

कामावर घ्या : राष्ट्रीय कष्टकरी पंचायतीची मागणीचंद्रपूर : शासनाचा माथाडी कामगार कायदा १९६९ हा चंद्रपूरला सन २००४ मध्ये लागू झाला. या कायद्याची अंमलबजावणी वखार मंडळे, शासकीय गोदामे, सिमेंट गोदामे, रेल्वे माल धक्का या ठिकाणी चालू आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती व भात गिरण्यात या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. तिथे माथाडी कामगारांवर अन्यायच केला जात असल्याचा आरोप राष्ट्रीय कष्टकरी पंचायतीने केला आहे.मागील ११ वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथील माथाडी नोंदीत कामगारांनी या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, याकरिता सतत मोर्चे, आंदोलने, उपोषण, धरणे आदी करुन शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शासनाने वारंवार प्रशासनाला या कायद्याची अंमलबजावणीचे आदेश व निर्देश दिले.काही लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा अंमलबजावणी करा अन्यथा आंदोलन करु, असे स्पष्ट निर्देश दिले होते. परंतु सत्ता येताच त्यांनाही स्वत:च्या निर्वाचन क्षेत्रातील कष्टकरी कामगारांचा विसर पडला आहे. वारंवारच्या विनंतीची दखल घेऊन फक्त चार ओळींचे पत्र देऊन कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू आहे. प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी अनेक सभा, बैठकीद्वारे अंमलबजावणीचे निर्देश दिले. त्यांच्याही आदेशाला न जुमानता बाजार समिती प्रशासनाने दखल घेतली नाही. याबाबत सूचित केले असता जिल्हाधिकारी दर बैठकीला एका आठवड्यात न्याय देण्याची कबुली देतात. त्यालाही सहा महिन्याचा काळ लोटतो. माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीकरिता माथाडी कामगारांनी मरणांतक उपोषण केले असता ३१ जानेवारीपर्यंत अंमलबजावणी करण्यात येईल, अशी हमी देणारे तहसीलदार व माथडी मंडळ संप मिटताच बेजबाबदार झाले आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे प्रशासक व सचिवांनी माथाडी कामगारांनाच कामावरुन बेदखल करुन नोंदीत नवीन कामगारांना कामावर लावून माथाडी कामगारावर उपासमारीची पाळी आणली आहे. या प्रकारे अधिकृत कामगारांना डावलून अनधिकृत कामगाराद्वारे शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे. या माथाडी कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, माथाडी कामगारांना प्राधान्याने आधी कामे द्या, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परंतु बाजार समिती प्रशासक, सचिवांनी याची अद्यापही दखल घेतली नाही. माथाडी कामगारांना काम देणारच नाही, अशी भूमिका घेतली आहे. पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी राष्ट्रीय कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष रमजान खान पठाण अशरफी यांनी केली आहे.