संजय अगडे तळोधीवैश्विक तापमान (ग्लोबल वार्मिग) चा फटका चंद्रपूर जिल्ह्यालादेखील बसलेला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात वाढत्या तापमानाने कहर केलेला आहे. ४६ अंश तापमान पशुपक्ष्यांना असहनीय असते. चारगाव तळोळी (बा.) येथील तलावात भरपूर पाणी आहे. त्यामुळे अनेक पाहुण्या पक्ष्यांनी येथे आश्रय घेतला आहे.नवोदय विद्यालयातील शिक्षक पक्षी अभ्यासक निरीक्षक व्ही.के. पवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की हिवाळ्यात उत्तर भारतातून व विदेशातून अनेक पाहुणे पक्षी आपल्या परिसरात स्थलांतर करतात व चार ते पाच महिने वास्तव्य करुन फेब्रुवारीत परतीचा प्रवास आरंभ करतात. एप्रिल महिन्यांचे तापमान ४० अशांवर पोहचले असून काही पाहुण्या पक्ष्यांनी चारगाव, तळोधी (बा.) येथील तलावात आश्रय घेतला आहे. पवार यांनी केलेल्या निरीक्षणानुसार कॉम्बडकर (नकटा), रुडी रोल्फक (चक्रवाक), ब्लॅक हेडेड आयबिम (पांढरा शरारी), बॅक आयबिस (काळाशराटी), रिव्हर टर्न (नदीसुरथ) सारखे पक्षी उच्च तापमान सहन करु शकत नाहीत. परंतु या तलावात त्यांना आवश्यक असलेले खाद्य पानगवत, वनस्पती, पानकिडे व जलचर, छोटे मासे विपूल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे रखरखत्या उन्हाळी पर्वा न करता ते येथे संचार करीत आहेत. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या पक्ष्यांचे आगमन झाले, तेव्हा ते पूर्णपणे वयस्क नसून आपल्या पालकांवर अवलंबून होते. सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांची पूर्णपणे वाढ झाली असून त्यांनी या परिसरातच आपले वास्तव्य केलेले आहे. सकाळी व सायंकाळी त्यांना उदरपोषण करताना पाण्यात मुक्त संचार करताना पाहता येते. दुपारी मात्र ते पाण्यात किंवा काठावर विश्रांती घेताना दृष्टीस पडतात. खरे तर दुपारच्या तीव्र उन्हात इतर पशुपक्षी व मानव कुणीही फिरताना दिसत नाहीेत. मात्र या पाहुण्या पक्ष्यांनी यावर मात केलेली दिसत आहे. पक्षी मित्र व अभ्यासकाकरिता ही जणू पर्वणीच म्हावी लागेल.
चारगाव येथे पाहुण्या पक्ष्यांचे वास्तव्य
By admin | Updated: April 27, 2016 00:47 IST