शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

कृषी विभागाची माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: March 5, 2016 00:53 IST

भ्रष्टाचाराची प्रकरणे उजागर करण्याकरिता माहिती अधिकारातून माहिती मागण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला. अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती देणे अनिवार्य असतानाही ...

माहिती अधिकाराची अवहेलना : छायांकित प्रतीसाठी निधीच नसल्याचे कारणनवरगाव : भ्रष्टाचाराची प्रकरणे उजागर करण्याकरिता माहिती अधिकारातून माहिती मागण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला. अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती देणे अनिवार्य असतानाही सिंदेवाही पंचायत समितीच्या कृषी विभागाने ३० दिवस लोटूनही माहिती दिली नसल्याने माहिती अधिकाराची अवहेलना झाली आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायद्यासाठी तीव्र लढा दिला. शासनस्तरावरून माहिती अधिकाराचा कायदा करण्यास भाग पाडले आणि माहिती अधिकाराचा कायदा २००५ मध्ये अंमलात आला. परंतु अनेक प्रशासकीय अधिकारी आपले पितळ उघडे पडू नये म्हणून माहिती दडविण्याचा प्रयत्न करतात. याचाच प्रत्यय सिंदेवाही पंचायत समितीच्या कृषी विभागाअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या बैलजोडीसंबधी सन २०१२ ते २०१५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या योजनेसंदर्भात टी.एस.पी., ओ.टी.एस.पी. व विशेष घटक योजनेअंतर्गत वाटप केलेल्या लाभार्थ्यांची यादी संदर्भात माहिती अधिकारात अमर बुध्दारपवार यांनी माहिती मागितली असता महिना लोटूनही माहिती देण्यात आली नाही. उलट कृषी अधिकारी यांनी जनमाहिती अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी यांना पत्र दिले. सदर माहितीच्या प्रती अंदाजे १९१० असुन याकरिता कृषी विभाग पं.स. सिंदेवाहीकडे छायांकित प्रती काढण्याकरिता आर्थिक तरतूद नसल्याचे पत्र दिले व त्याची प्रतिलिपी माहिती मागणारे अमर बुध्दापवार यांना देऊन माहिती अधिकाराची खिल्ली उडविली. त्याचप्रमाणे सदर माहिती विभागाच्या अधिकाऱ्याला प्रत्यक्ष भेट घेवून तुमच्याकडे निधी उपलब्ध नसल्याने लेखी पद्धतीनुसार लाभ दिलेल्या बैलजोडी लाभार्थ्यांची नोंद असलेल्या रजिस्टरच्या सत्यप्रती मागितल्या असता पुन्हा माहितीच्या अधिकाराचा अर्ज द्या व एका महिन्याने माहिती मिळेल, असा सल्ला देण्यात आला. त्यामुळे या विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच त्यांनी माहिती पुरविण्याबाबत दुसऱ्याचे पत्र माहिती मागणाऱ्याच्या लिफाफ्यात टाकून एवढे पैसे भरा असे पत्र देवून आपल्या कर्तव्य तत्परतेचा नमुना या विभागाने दिला. अशा पद्धतीने माहितीची लपवा-छपवी होत असल्याने बैलजोडी वाटपाचा गैरव्यवहार उघड होवू नये म्हणून हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (वार्ताहर)