शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

वरोरा मतदार संघात उद्योग आले; परंतु बेरोजगारी व प्रदूषणात वाढ

By admin | Updated: December 13, 2015 00:48 IST

१० वर्षापासून वरोरा विधानसभा मतदार संघात उद्योग आले. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना चांगला दिलासा मिळाला.

प्रवीण खिरटकर वरोरा१० वर्षापासून वरोरा विधानसभा मतदार संघात उद्योग आले. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना चांगला दिलासा मिळाला. उद्योगांना आपल्या पिढ्यान्पिढ्यान कसणाऱ्या शेत्याही दिल्या. एका पाठोपाठ एक असे सहा उद्योग सुरू झाले. परंतु या उद्योगाचा नागरिकांना लाभ झाला नाही तर बेरोजगारीच्या संख्येत वाढ व प्रदूषणाने आरोग्य व शेतातील पिके दरवर्षी धोक्यात येत आहे. या उद्योगामुळे नागरिक भयभीत झाले असल्याचे दिसून येत आहे.वरोरा विधानसभा मतदार संघात मोहबाळा गावानजिक १९९२ च्या सुमारास महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने शेतकऱ्यांकडून जागा घेतली. त्यानंतर कित्येक वर्ष या परिसरात एकही उद्योग आला नाही. दहा वर्षापूर्वी सदर जागेत वर्धा पॉवर, जीएमआर हे वीज निर्मितीचे उद्योग सुरू झाले तर भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा नावाने खुली कोळसा खदान सुरू झाली. वरोरा तालुक्यातील नागरी गावाजवळ आय.एस.एम.टी. नावाचा वीज निर्मिती प्रकल्प सुरू झाला. सदर प्रकल्प काही वर्ष चालल्यानंतर सध्या तो बंद आहे. वरोरा तालुक्यात सनफ्लॅग कंपनीची भूमीगत कोळसा खदान व बी.एस. इस्पात कंपनी सालोरी येन्सा ब्लॉकमध्ये सुरू आहे. बी.एस. इस्पात कंपनीच्या धुरामुळे परिसरातील पिके दरवर्षी धोक्यात येतात. त्यामुळे पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शेतकरी नेहमी आंदोलन करीत असतात. धुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर मनुष्याच्या आरोग्यावर किती विपरित परिणाम होईल, हे दिसून येत आहे. सनफ्लॅग कंपनीने सोडलेल्या पाण्यामुळे तसेच कोळशाच्या वाहतुकीने परिसरातील शेतकरी मागील कित्येक दिवसांपासून काही ना काही तक्रारी करीत आहेत. परंतु आजतागत कायम स्वरूपी तोडगा काढण्यात आला नाहीे. वर्धा पॉवर कंपनी व जी.एम.आर. कंपनीच्या धुरामुळे अनेक गावकरी त्रस्त आहेत. स्थानिकांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी अनेकदा राजकीय पक्षांनी आंदोलने उभी केली. आंदोलन झाले की काही स्थानिकांना उद्योगात अस्थायी स्वरूपाची कंत्राटदाराकडे नोकरी दिली जाते. काही दिवसांनी त्यांची हकालपट्टी केली जाते. कर्नाटक एम्टा कंपनी सध्या बंद असल्याने त्याच्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. कंपनी केव्हा सुरू होणार याबाबत कुणीही काहीही सांगण्यास तयार नसल्याने कामगार संकटात सापडले आहे. याही उद्योगातून जमिनी गेलेल्या स्थानिकांना नोकरीपासून डावलले जात असल्याने कंपनीबाबत स्थानिकांमध्ये चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे. परिसरातील काही उद्योग वगळता उद्योग क्षेत्रात येणाऱ्या गावामध्ये सामाजिक बांधीलकी योजनेतून थातुर-मातूर प्रकल्प राबवून नागरिकांची बोळवण केली जात आहे. अशाप्रकारे सर्वकाही सुरू असल्याने उद्योग येवूनही बाजारपेठेतील उलाढालीत फारसी काहा बदल झाला नसल्याचे व्यापारी आजही सांगत आहे. उद्योग आल्याने आनंदी झालेल्या वरोरा मतदार संघातील नागरिकांमध्ये दिवसागणिक नाराजी पसरत आहे. उद्योगामधून निघणाऱ्या धुरामुळे जनजीवन येत्या काही दिवसात विस्कळीत होण्याची चिन्ह दिसत आहे. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने व शासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची निश्चितच गरज निर्माण झाली आहे.