शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

वरोरा मतदार संघात उद्योग आले; परंतु बेरोजगारी व प्रदूषणात वाढ

By admin | Updated: December 13, 2015 00:48 IST

१० वर्षापासून वरोरा विधानसभा मतदार संघात उद्योग आले. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना चांगला दिलासा मिळाला.

प्रवीण खिरटकर वरोरा१० वर्षापासून वरोरा विधानसभा मतदार संघात उद्योग आले. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना चांगला दिलासा मिळाला. उद्योगांना आपल्या पिढ्यान्पिढ्यान कसणाऱ्या शेत्याही दिल्या. एका पाठोपाठ एक असे सहा उद्योग सुरू झाले. परंतु या उद्योगाचा नागरिकांना लाभ झाला नाही तर बेरोजगारीच्या संख्येत वाढ व प्रदूषणाने आरोग्य व शेतातील पिके दरवर्षी धोक्यात येत आहे. या उद्योगामुळे नागरिक भयभीत झाले असल्याचे दिसून येत आहे.वरोरा विधानसभा मतदार संघात मोहबाळा गावानजिक १९९२ च्या सुमारास महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने शेतकऱ्यांकडून जागा घेतली. त्यानंतर कित्येक वर्ष या परिसरात एकही उद्योग आला नाही. दहा वर्षापूर्वी सदर जागेत वर्धा पॉवर, जीएमआर हे वीज निर्मितीचे उद्योग सुरू झाले तर भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा नावाने खुली कोळसा खदान सुरू झाली. वरोरा तालुक्यातील नागरी गावाजवळ आय.एस.एम.टी. नावाचा वीज निर्मिती प्रकल्प सुरू झाला. सदर प्रकल्प काही वर्ष चालल्यानंतर सध्या तो बंद आहे. वरोरा तालुक्यात सनफ्लॅग कंपनीची भूमीगत कोळसा खदान व बी.एस. इस्पात कंपनी सालोरी येन्सा ब्लॉकमध्ये सुरू आहे. बी.एस. इस्पात कंपनीच्या धुरामुळे परिसरातील पिके दरवर्षी धोक्यात येतात. त्यामुळे पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शेतकरी नेहमी आंदोलन करीत असतात. धुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर मनुष्याच्या आरोग्यावर किती विपरित परिणाम होईल, हे दिसून येत आहे. सनफ्लॅग कंपनीने सोडलेल्या पाण्यामुळे तसेच कोळशाच्या वाहतुकीने परिसरातील शेतकरी मागील कित्येक दिवसांपासून काही ना काही तक्रारी करीत आहेत. परंतु आजतागत कायम स्वरूपी तोडगा काढण्यात आला नाहीे. वर्धा पॉवर कंपनी व जी.एम.आर. कंपनीच्या धुरामुळे अनेक गावकरी त्रस्त आहेत. स्थानिकांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी अनेकदा राजकीय पक्षांनी आंदोलने उभी केली. आंदोलन झाले की काही स्थानिकांना उद्योगात अस्थायी स्वरूपाची कंत्राटदाराकडे नोकरी दिली जाते. काही दिवसांनी त्यांची हकालपट्टी केली जाते. कर्नाटक एम्टा कंपनी सध्या बंद असल्याने त्याच्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. कंपनी केव्हा सुरू होणार याबाबत कुणीही काहीही सांगण्यास तयार नसल्याने कामगार संकटात सापडले आहे. याही उद्योगातून जमिनी गेलेल्या स्थानिकांना नोकरीपासून डावलले जात असल्याने कंपनीबाबत स्थानिकांमध्ये चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे. परिसरातील काही उद्योग वगळता उद्योग क्षेत्रात येणाऱ्या गावामध्ये सामाजिक बांधीलकी योजनेतून थातुर-मातूर प्रकल्प राबवून नागरिकांची बोळवण केली जात आहे. अशाप्रकारे सर्वकाही सुरू असल्याने उद्योग येवूनही बाजारपेठेतील उलाढालीत फारसी काहा बदल झाला नसल्याचे व्यापारी आजही सांगत आहे. उद्योग आल्याने आनंदी झालेल्या वरोरा मतदार संघातील नागरिकांमध्ये दिवसागणिक नाराजी पसरत आहे. उद्योगामधून निघणाऱ्या धुरामुळे जनजीवन येत्या काही दिवसात विस्कळीत होण्याची चिन्ह दिसत आहे. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने व शासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची निश्चितच गरज निर्माण झाली आहे.