शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

बल्लारपूर तालुक्यात औद्योगिक विकास खुंटला

By admin | Updated: August 14, 2016 00:32 IST

चंद्रपूर तालुक्याचे विभाजन २५ वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यानंतर बल्लारपूर तालुका १४ मार्च २००२ ला अस्तित्वात आला.

प्रशासनाचे दुर्लक्ष : एमआयडीसी वसाहत नाहीअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरचंद्रपूर तालुक्याचे विभाजन २५ वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यानंतर बल्लारपूर तालुका १४ मार्च २००२ ला अस्तित्वात आला. तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसी वसाहत होणे गरजेचे आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षितपणाच्या धोरणामुळे बल्लारपूर तालुक्यात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली नाही. परिणामी तालुक्याचा औद्योगिक विकास मंदावला असून बेरोजगारीचे संकट वाढले आहे.बल्लारपूर शहरात जागतिक दर्जाचा पेपर मिल उद्योग, वेकोलिच्या कोळसा खाणी, पाईप उद्योग, साग लाकडाचे आगार, खर्डा उद्योगाच्या माध्यमातून कामगारांना रोजगार मिळत आहे. यातील बरेच उद्योग डबघाईस आले आहेत. बल्लारपूर तालुक्यातील वीज औष्णिक केंद्र, प्लायवूड कंपनी, चुना फॅक्टरी कित्येक वर्षांपासून बंद झाले आहेत. उद्योगाचे पुनर्गठन करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी बल्लारशाह औष्णिक वीज केंद्राच्या तब्बल १०५ हेक्टर पडित जागेवर औद्योकि वसाहत उभी करण्याचे सुतोवाच जनप्रतिनिधीने केले होते. मात्र ती घोषणा हवेत विरली. यामुळे बल्लारपूर तालुक्यात बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.बल्लारपूर तालुका निर्मितीनंतर तालुक्यात शासन स्तरावरुन एमआयडीसी वसाहतीचे नियोजन करणे क्रमप्राप्त होते. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी औद्योगिक वसाहतीचे स्वप्न आजतागायत साकार झालेच नाही. यामुळे बेरोजगारीची समस्या कायम आहे. बल्लारपूर तालुका वनक्षेत्राला लागून आहे. महसूल प्रशासनाची जागा सैनिकी शाळा व काही बॉटनिकल गार्डन निर्माण करण्यासाठी आरक्षित करण्यात आली. त्यामुळे भविष्याचा वेध घेताना तालुक्यात एमआयडीसी निर्माण करण्यासाठी जागा शोधण्याची वेळ औद्योगिक विकास महामंडळावर येणार आहे.एमआयडीसी अस्तित्वात न आल्यामुळे लहान मोठे उद्योजक अडचणीत आले आहेत. शहरातील पाईप फॅक्टरीसारख्या उद्योगावर अवकळा आली आहे. एकमेव मोठा पेपर मिल उद्योग कच्च्या मालाअभावी संकटाच्या सावटात सापडला. काही उद्योग तालुक्यातून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी बल्लारपूर तालुक्यात राजकीय इच्छाशक्तीला जागृत करून एमआयडीसीची स्थापना होणे, काळाची गरज आहे.