शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
4
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
5
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
6
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
7
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
8
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
9
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
10
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
11
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
12
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
13
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
14
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
15
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
16
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
17
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
18
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
19
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
20
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय

बल्लारपूर तालुक्यात औद्योगिक विकास खुंटला

By admin | Updated: August 14, 2016 00:32 IST

चंद्रपूर तालुक्याचे विभाजन २५ वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यानंतर बल्लारपूर तालुका १४ मार्च २००२ ला अस्तित्वात आला.

प्रशासनाचे दुर्लक्ष : एमआयडीसी वसाहत नाहीअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरचंद्रपूर तालुक्याचे विभाजन २५ वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यानंतर बल्लारपूर तालुका १४ मार्च २००२ ला अस्तित्वात आला. तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसी वसाहत होणे गरजेचे आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षितपणाच्या धोरणामुळे बल्लारपूर तालुक्यात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली नाही. परिणामी तालुक्याचा औद्योगिक विकास मंदावला असून बेरोजगारीचे संकट वाढले आहे.बल्लारपूर शहरात जागतिक दर्जाचा पेपर मिल उद्योग, वेकोलिच्या कोळसा खाणी, पाईप उद्योग, साग लाकडाचे आगार, खर्डा उद्योगाच्या माध्यमातून कामगारांना रोजगार मिळत आहे. यातील बरेच उद्योग डबघाईस आले आहेत. बल्लारपूर तालुक्यातील वीज औष्णिक केंद्र, प्लायवूड कंपनी, चुना फॅक्टरी कित्येक वर्षांपासून बंद झाले आहेत. उद्योगाचे पुनर्गठन करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी बल्लारशाह औष्णिक वीज केंद्राच्या तब्बल १०५ हेक्टर पडित जागेवर औद्योकि वसाहत उभी करण्याचे सुतोवाच जनप्रतिनिधीने केले होते. मात्र ती घोषणा हवेत विरली. यामुळे बल्लारपूर तालुक्यात बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.बल्लारपूर तालुका निर्मितीनंतर तालुक्यात शासन स्तरावरुन एमआयडीसी वसाहतीचे नियोजन करणे क्रमप्राप्त होते. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी औद्योगिक वसाहतीचे स्वप्न आजतागायत साकार झालेच नाही. यामुळे बेरोजगारीची समस्या कायम आहे. बल्लारपूर तालुका वनक्षेत्राला लागून आहे. महसूल प्रशासनाची जागा सैनिकी शाळा व काही बॉटनिकल गार्डन निर्माण करण्यासाठी आरक्षित करण्यात आली. त्यामुळे भविष्याचा वेध घेताना तालुक्यात एमआयडीसी निर्माण करण्यासाठी जागा शोधण्याची वेळ औद्योगिक विकास महामंडळावर येणार आहे.एमआयडीसी अस्तित्वात न आल्यामुळे लहान मोठे उद्योजक अडचणीत आले आहेत. शहरातील पाईप फॅक्टरीसारख्या उद्योगावर अवकळा आली आहे. एकमेव मोठा पेपर मिल उद्योग कच्च्या मालाअभावी संकटाच्या सावटात सापडला. काही उद्योग तालुक्यातून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी बल्लारपूर तालुक्यात राजकीय इच्छाशक्तीला जागृत करून एमआयडीसीची स्थापना होणे, काळाची गरज आहे.