शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पाणी पुरवठ्याचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:44 IST

चंद्रपूरकरांवर सध्या पाणी संकट ओढविले आहे. काही ठिकाणी एक दिवसाआड तर काही ठिकाणी तीन-चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. यावर मात करण्यासाठी मनपाने वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरात पाणी आणण्याचे नियोजन केले होते. त्याचेही कामही सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने अपेक्षित वेळ निघून गेल्यानंतरही वाढीव पाणी पुरवठा सुरू झालेला नाही.

ठळक मुद्देचंद्रपूरकर पाण्यामुळे त्रस्त : आणखी एक महिना लागणार, अनेक भागात तीन-चार दिवसाआड पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरकरांवर सध्या पाणी संकट ओढविले आहे. काही ठिकाणी एक दिवसाआड तर काही ठिकाणी तीन-चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. यावर मात करण्यासाठी मनपाने वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरात पाणी आणण्याचे नियोजन केले होते. त्याचेही कामही सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने अपेक्षित वेळ निघून गेल्यानंतरही वाढीव पाणी पुरवठा सुरू झालेला नाही.चंद्रपूरची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात पोहचली आहे. चंद्रपूरकरांना महानगरपालिकेच्या माध्यमातून इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र सध्या इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. याच साठ्यातून चंद्रपूर वीज केंद्रासाठीही पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे सध्या शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. मात्र अनेक वॉर्डात तीन-चार दिवस नळाला पाणीच येत नसल्याची बोंब आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे चंद्रपूर येथील पाणी समस्येवर बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये चंद्रपूरचा पाणी पुरवठा सुरळीत ठेऊ, असे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. २४ एप्रिल २०१८ पासून वाढीव पाणी पुरवठा सुरु करू, असेही त्या बैठकीमध्ये सांगण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही.जोरगेवारांकडून पाहणीवाढीव पाणी पुरवठ्याला विलंब होत असल्याने शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी धानोरा नदीवरील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली असता हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक महिना कालावधी लागणार आहे, असे निदर्शनास आले. यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, अमोल शेंडे, इरफान शेख, हर्षद कानमपल्लीवार, राशीद हुसैन, विलास सोमलवार, विनोद अनंतवार, शंकर दंतुलवार, अशपाक खान, बादल हजारे, बबलू मेश्राम, यांची उपस्थिती होती. दरम्यान, जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता जगदाळे यांनी आतापर्यंत सहा कि.मी. अंतरा पर्यंत पाण्याची टेस्टिंग केली आहे, असे सांगितल्याचे किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. नदीच्या पात्रामध्ये पाणी नाही, तर चंद्रपूर येथील जनतेला कुठून पाणी देणार, असा प्रश्नही जोरगेवार यांनी उपस्थित केला आहे. इतक्या मोठ्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम नदीवर चालू आहे. पण कामाच्या ठिकाणी एकही अधिकारी किंवा कंत्राटदाराचे सुपरवायझर, इंजिनिअर कोणीही उपस्थित राहत नाही. केवळ चार ते पाच कामगारांच्या भरोशावर काम चालू आहे, असा आरोप किशोर जोरगेवार यांनी केला आहे. चंद्रपूरच्या जनतेला जून महिन्यापर्यंत सुरळीत पाणी मिळाले नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा जोरगेवार यांनी दिला आहे.