शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या प्रतिसादसह वाढल्या मुक्कामी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

कोरोनामुळे मागील वर्षी पहिल्यादांच बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर, रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. आता पूर्ण ...

कोरोनामुळे मागील वर्षी पहिल्यादांच बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर, रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. मात्र, शाळा बंद असल्याने मानव विकासच्या, तसेच ग्रामीण भागातील मुक्कामी असणाऱ्या अनेक बसफेऱ्या बंद होत्या, परंतु मागील महिन्यात माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे प्रवासी वर्गाच्या मागणीनुसार जिल्ह्यात मुक्कामी बस सुरू करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील आगारात असलेल्या एकूण ५४ मुक्कामी बसपैकी ४० बस सुरू करण्यात आल्या आहेत. चिमूर तालुक्यात विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मानव विकासच्या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जसजशी प्रवाशांची मागणी वाढणार, असे तसतशा बसफेऱ्याही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली.

बॉक्स

ग्रामीण भागातील गाळीतही जागा मिळेना

बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्या, तरी अद्यापही पूर्वीप्रमाणे बस सुरू नाही. ग्रामीण भागात मोजक्याच बसफेऱ्या धावत आहेत. सायंकाळच्या सुमारासच्या बसफेऱ्या अद्यापही बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एक किंवा दोनच बस धावत आहेत. परिणामी, या बसमध्ये प्रवाशांना पाय ठेवण्यासाठीही जागा नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे बसफेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

सायंकाळच्या सुमारासच्या बसफेऱ्या बंद

पूर्वी आगारातून मोठ्या प्रमाणात बसफेऱ्या धावत होत्या. आता काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्या असल्या, तरी सायंकाळच्या सुमारासच्या बसफेऱ्या अद्यापही बंदच आहेत. चंद्रपूरवरून गडचिरोली जाण्यासाठी पूर्वी ९.१५ वा.ची शेवटची बस होती. मात्र, कोरोनामुळे ही बस बंद करण्यात आली आहे. आता ७ वाजतानंतरही गडचिरोलीसाठी एकही बस नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सायंकाळी ८.३०, रात्री ९.१५ वाजताची गडचिरोलीसाठी बसफेरी सुरू करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

बॉक्स

१४ मुक्कामी गाड्यांचे काय

पूर्वी जिल्ह्यातून चारही आगारातून ५४ मुक्कामी बसफेऱ्या धावत होत्या. मात्र, कोरोनाने मुक्कामी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता माध्यमिक शाळा सुरू झाल्याने ४० मुक्कामी गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही १४ मुक्कामी गाड्या बंद आहेत. प्रवाशांची मागणी वाढल्यास या बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

-------

बस सुरू झाल्या आहेत. मात्र, पूर्वीच्या तुलनेत कमी बस आहेत. त्यामुळे प्रवास करण्यास मोठी अडचण जाते. सर्वच सुरळीत झाले आहे. त्यामुळे महामंडळाने पूर्वीसारख्याच बसफेऱ्या सुरू कराव्या.

अजित गेडाम, प्रवासी.

-----

चंद्रपूरवरून पूर्वी गडचिरोली जाण्यासाठी शेवटची बस ९.१५ वाजताची होती. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी काम करायला येणाऱ्यांना काम आटोपून गावाला जाण्यास सोईचे होते. मात्र, आता ती बस बंद केली असून, सायंकाळी ७ वाजताची शेवटची बस आहे. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बसफेरी सुरू करण्याची मागणी आहे.

- अमित दुधे, प्रवासी.

------

मुक्कामी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्या, तरी अनेक ठिकाणच्या बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे सकाळच्या सुमारास शहरात जायचे असल्यास मोठी अडचण होत आहे. आता व्यवहार सुरळीत झाले असल्याने शहरात कामासाठी जावे लागते. त्यामुळे सर्वच बस सुरू करण्यात याव्या.

- अमोल गेडाम, प्रवासी.