शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

खताचे वाढलेले दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:26 IST

राजुरा : कापूस पिकावर गेल्या तीन वर्षांपासून बोंडअळी येऊन पिकाचे नुकसान झाले आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकरी वैतागला ...

राजुरा : कापूस पिकावर गेल्या तीन वर्षांपासून बोंडअळी येऊन पिकाचे नुकसान झाले आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकरी वैतागला आहे. त्यातच कोरोनाने थैमान घातले आहे. शेतकरी कुटुंबातील कर्तेपुरुष मरण पावले. शेतकरी संकटात सापडला. अशा परिस्थितीत रासायनिक खताची केलेली दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे, असा आरोप आपचे राजुरा विधानसभा संयोजक प्रदीप बोबडे यांनी केला आहे.

खताच्या किमती दुपटीने वाढवून करोडो रुपये कमावून शेतकऱ्यांना भिकेला लावायचे आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजारांची भीक देऊन त्या भिकेला सन्मान हे नाव द्यायचे. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढणार आहे. शेतकऱ्यांचा सरकारने विचार करून खताची दरवाढ थांबवावी, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीचे राजुरा विधानसभा संयोजक प्रदीप बोबडे यांनी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, सचिव संतोष दोरखंडे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, संघटन प्रमुख परमजित सिंग झगडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. या वेळी आपचे रोशन येवले, मिलिंद गड्मवार, स्वप्निल कोहपरे, पवन ताकसांडे, अरविंद वांढरे, मारोती पुरी, गोविंद गोरे, सुनील राठोड, प्रतीक डाखरे, ऋषी वासेकर उपस्थित होते.