शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

गॅस सिलिंडरचे वाढविले २२५ अन्‌ कमी केले १० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST

घरगुती गॅसधारक महिन्याकाठी सिलिंडरची उचल करतात. उज्ज्वला योजनेंतर्गत शेकडो लाभार्थी आहेत; मात्र आता गॅसचे दर परवडत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा ...

घरगुती गॅसधारक महिन्याकाठी सिलिंडरची उचल करतात. उज्ज्वला योजनेंतर्गत शेकडो लाभार्थी आहेत; मात्र आता गॅसचे दर परवडत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा सरपण गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मार्च महिन्यामध्ये ८०० रुपयांवर घरगुती गॅस सिलिंडरचे भाव गेले होते. त्यामुळे ग्राहकांच्या संतापात आणखीच भर पडली.

कोरोनामुळे यावर्षी जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या हातचा रोजगार गेला. त्यामुळे जगण्याचा प्रश्न कायम आहे. मागील तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये थेट २२५ रुपयांचे गॅस सिलिंडरचे दर वाढले आहे. दरम्यान, १ एप्रिलपासून सिलिंडरचे नवे दर लागू करण्यात आले आहे. यात केवळ दहा रुपयांनी सिलिंडर स्वस्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अनुदानही बंद झाले आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घरगुती सिलिंडर ६५० रुपयांपर्यंत मिळत होते. त्यामध्ये वाढ होत आज ८८० रुपयांवर सिलिंडरचे भाव पोहोचले आहे. वर्षभरात २२५ रुपयांनी सिलिंडरची दरवाढ झाली आहे. दरवाढ वेगाने झाली असताना केवळ १० रुपयांनी सिलिंडरचे दर कमी केले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कोट

घरगुती गॅस सिलिंडरचे भाव वाढवून गरिबांना जगणे कठीण केले आहे. हातावर आणून खाणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत, त्यामुळे शासनाने सिलिंडरचे भाव कमी करून दिलासा देणे गरजेचे आहे.

-प्रतिभा कोडापे

चंद्रपूर

कोट

मागील वर्षभरामध्ये २२५ रुपयांनी सिलिंडरचे दर वाढविले आहे. त्यामुळे गोरगरिबांना गॅस सिलिंडरवर स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. ज्या उद्देशासाठी उज्ज्वला गॅस वितरित केले, त्या उद्देशालाही हळताल फासला आहे. अनेकांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले आहे.

-रिना शहाने

चंद्रपूर

--

कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच गॅस सिलिंडरचे दर वाढले आहे; मात्र केवळ १० रुपयांनी कमी करून सामान्य नागरिकांच्या तोंडाला पाणे पुसली आहेत.

-मीनाक्षी मडावी

चंद्रपूर.

बाॅक्स

नोव्हेंबर २०२०-६६४

डिसेंबर २०२०-७१५

जानेवारी २०२१-७६०

फेब्रुवारी २०२१ ७८५

मार्च २०२१-८८०

एप्रिल २०२१-८७०

बाॅक्स

कोरोना संकट काळात जीवनावश्यक वस्तुंचे दर कमी होण्याऐवजी वाढले, त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. हातातला रोजगार गेला. अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले. एवढेच नाही तर मजुरीही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रत्येकांना जगण्याची चिंता आहे. असे असतानाही डिझेल, पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाई हाताच्या बाहेर गेली आहे. प्रत्येक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे आवक कमी आणि जावक जास्त, अशी अवस्था गरिबांची झाली आहे. त्यातच सिलिंडरचे दर वाढवून शासनाने गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचे दर कमी करून सामान्य ग्राहकांना दिलासा देणे गरजेचे आहे.