शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

निराधारांच्या अनुदानात वाढ करा

By admin | Updated: September 6, 2014 01:44 IST

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने उपेक्षित समाज घटकाला आधार देण्यासाठी विविध योजना राबवित आहे.

बल्लारपूर : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने उपेक्षित समाज घटकाला आधार देण्यासाठी विविध योजना राबवित आहे. मात्र, लाभार्थ्यांना अत्यल्प अनुदान देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव पंचायत समिती सदस्य अनेकश्वर मेश्राम यांनी समितीच्या मासिक सभेत ठेवला. बल्लारपूर पंचायत समितीने ठराव पारित करून शासनाकडे पाठविला आहे.बल्लारपूर पंचायत समितीची मासिक सभा सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. सभेला उपसभापती सुमन लोहे, पंचायत समिती सदस्य अनेकश्वर मेश्राम, चंद्रकला बोबाटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सभेत निराधार अनुदान योजनेवर चर्चा करण्यात आली. निराधार, दुर्बल व निरक्षर लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजनेतील अनुदान अल्प प्रमाणात आहे, यात त्वरीत वाढ करण्याची शिफारस जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे करण्यात आली आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गरिबांना दिलासा देण्यासाठी संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, सेवा राज्य निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, निवृत्तीवेतन, राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबवित आहे. या अनुदान योजनेनुसार लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये अनुदान वाटप केले जाते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईच्या काळात हे अनुदान नाममात्र आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेत अपंग, आजारग्रस्त यांना ६०० रुपयांऐवजी एक हजार रुपये व विधवांनादीड हजार ते दोन हजार रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव मांडला. (शहर प्रतिनिधी)