शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:29 IST

काँग्रेस कमिटीचे तहसीलदारांना निवेदन राजुरा : राजुरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील कापूस, ...

काँग्रेस कमिटीचे तहसीलदारांना निवेदन

राजुरा : राजुरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील कापूस, सोयाबीन, तूर, धान अशा अनेक शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अनेक नागरिकांच्या राहत्या घरात पावसाचे पाणी जाऊन घरातील जीवनावश्यक वस्तूंची नासधूस झाली. अनेक ठिकाणी राहती घरे कोसळली. जनावरांना क्षती पोहोचली, त्यांचा चारासुद्धा खराब झाला. वेकोलीच्या कोळसा खाणीच्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे, तसेच नाले प्रभावित झाल्यामुळे परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचले व मोठी हानी झाली. नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन देऊन केली.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व खरीप शेतीचे तातडीने पिकांचे पंचनामे करून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषावर शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. आधीच शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पिकांची लागवड केली होती. पिकेही चांगली होती; परंतु निसर्गाने शेतकऱ्यांना पुन्हा चिंतेच्या आणि कर्जाच्या खाईत लोटले आहे, तसेच अनेकांच्या घरांचे, जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. जनावरे पुरामध्ये वाहून गेली. अशा स्थितीत सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी, तसेच पुरामुळे रस्ते, छोटे पूल क्षतिग्रस्त झाले आहेत त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी राजुराचे तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भातील एक निवेदन तालुका कृषी अधिकारी राजुरा यांनाही देण्यात आले आहे. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेसच्या शिष्टमंडळात नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरनुले, पं.स. सदस्य कुंदा जेणेकर, तुकाराम माणुसमारे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेविका संध्या चांदेकर, हरिचंद्र जुनघरी, शिवराम लांडे, अविनाश जेनेकर, रामभाऊ ढुमने, कवडू सातपुते, विकास देवाडकर आदी उपस्थित होते.

260721\img-20210726-wa0183.jpg

फोटो