शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

चारगाव धरणाच्या जागेवर बेकायदेशीर वहिवाट

By admin | Updated: December 10, 2015 01:22 IST

चारगाव धरणाच्या गाळपेळ जमिनीवर कुठल्याही प्रकारे मशागत करुन पिके घेवू नये, असा आदेश पाटबंधारे विभागाने दिल्यानंतरही अनेकांनी आंतर मशागत करुन बेकायदेशीर वहिवाट सुरू केली आहे.

पाटबंधारे विभागाचा आदेश धुडकावला : प्रकल्पग्रस्त वहिवाटीपासून वंचितवरोरा : चारगाव धरणाच्या गाळपेळ जमिनीवर कुठल्याही प्रकारे मशागत करुन पिके घेवू नये, असा आदेश पाटबंधारे विभागाने दिल्यानंतरही अनेकांनी आंतर मशागत करुन बेकायदेशीर वहिवाट सुरू केली आहे. त्यामुळे ज्यांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत, ते प्रकल्पग्रस्त वहिवाट करण्यापासून वंचित झाले आहेत.सन १९७६ मध्ये चारगाव धरणाकरिता वरोरा तालुक्यातील राळेगाव, चारगाव, अकोला, सावरी, उमरी आदी गावातील जमिनी पाटबंधारे विभागाने त्यावेळी मोबदला देवून ताब्यात घेतल्या. चारगाव धरण प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गाळयुक्त जमिन रब्बी हंगामामध्ये वहिवाट करण्याकरीता प्रकल्पग्रस्तांना देण्याचा शासन निर्णय झाला आहे. परंतु, काही शेतकरी मुजोरीने गाळमुक्त जमिनीवर मागील कित्येक वर्षांपासून पीके घेत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने गाळयुक्त जमिनीवर कुणीही वहिवाट करु नये, असे आदेशही बजाविले आहे. तरीपण या जमिनीवर पीके घेणे सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. गाळयुक्त जमिनी वहिवाट करण्याकरीता देण्याच्या मागणीकरीता प्रकल्पग्रस्त शेतकरी अधिकारी व प्रतिनिधींना साकडे घालीत आहे. परंतु त्यांंना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त व गाळयुक्त जमिनीची वहिवाट करणाऱ्यांमध्ये भविष्यात संघर्ष होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चारगाव धरणातील गाळयुक्त जमीन प्रकल्पग्रस्तांना रब्बी हंगामामध्ये वहिवाट करण्याकरीता देण्यात यावा असा शासन निर्णय झाला आहे. परंतु, या जमिनीचे वाटप महसूल विभाग की पाटबंधारे विभाग करणार, असा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी संकटात सापडले आहेत. इतर शेतकऱ्यांनी मात्र या जमिनीवर अतिक्रमण करून पीक लागवडीसाठी वहिवाट सुरू केली आहे. (तालुका प्रतिनिधी)