शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

बीजभांडवल कर्ज भरण्यास दुर्लक्ष

By admin | Updated: July 3, 2015 01:27 IST

सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

उद्योग केंद्राला फटका : कर्जफेडीबाबत कर्जदार उदासीनचंद्रपूर : सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. विविध विभागांसोबत उद्योग केंद्रामार्फतही बेरोजगारांना लघु व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. मात्र, घेतलेले कर्ज परत देण्यासाठी बेरोजगारांची टाळाटाळ सुरु आहे. यामुळे उद्योग केंद्राला लाखोंचा चुना लागत आहे. प्रत्येकांना नोकरी मिळणे कठीण झाले असून नोकरी सोडून सुशिक्षित बेरोजगार छोट्या-मोठ्या उद्योगांच्या मागे लागले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र आहे. या केंद्राच्या माध्यमातून बेरोजगारांना उद्योग उभारणी, कर्ज, मार्गदर्शन करण्याचे काम सुरु आहे. या केंद्राचे पंतप्रधान रोजगार निर्मिती आणि बीजभांडवल, असे रोजगाराचे दोन उपक्रम आहेत. पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या माध्यमातून बेरोजगारांना बँकेतून व्यवसायासाठी थेट कर्ज मिळते. कर्जाची ही पद्धत क्लिष्ट आहे. छोटे व्यवसाय करता यावे, यासाठी बीजभांडवल योजना आहे. याअंतर्गत एकूण कर्जाच्या १५ टक्के रक्कम जिल्हा उद्योग केंद्र देते.१९९३-९४ पासून ही योजना सुरु आहे. बीजभांडवल योजनेतून आतापर्यंत १६१ सुशिक्षित बेरोजगारांनी छोट्या उद्योगांसाठी कर्ज घेतले. या कर्जातून अनेकांनी आपले व्यवसाय सुरु केले. व्यवसाय स्थिरावल्यानंतर कर्जाची ही रक्कम सहा टक्क्यांच्या दराने पाच वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला परत करावी लागते. मात्र, कर्ज परतफेडीचा विसर सुशिक्षित बेरोजगारांना पडत आहे.बोटावर मोजण्याइतकेच कर्जदार नियमितपणे कर्ज फेडत असल्याची माहिती आहे. कर्जासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या पायऱ्या चढणारे आता त्याच्या परतफेडीसाठी वेगवेगळी कारणे पुढे करीत असून कर्ज थकीत आहे. या वेगवेगळ्या कारणांमुळे जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षकही त्रस्त झालेत. आता तर त्यांची कर्ज परत मिळण्याची आशाही सोडल्याचे ते सांगतात. (स्थानिक प्रतिनिधी)