शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सेनापती नसल्याने वृक्षतोडीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: February 13, 2015 01:26 IST

मध्य चांदा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या राजुरास्थित उपविभागीय वनाधिकाऱ्याचे पद ५ महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे या परिसरातील वनसंरक्षण व संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असून ...

राजुरा : मध्य चांदा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या राजुरास्थित उपविभागीय वनाधिकाऱ्याचे पद ५ महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे या परिसरातील वनसंरक्षण व संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असून वनाधिकाऱ्यांअभावी विविध कामे खोळंबली आहेत.राजुरा येथे कार्यरत उपविभागीय वनाधिकारी यांची पदोन्नतीवर बदली झाली. त्यानंतर येथे अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. राजुरा उप वनविभाग अतीसंवेदनशील, पहाडी भाग असुन आंध्र प्रदेश सीमेला लागून आहे. त्यामुळे वनाचे संरक्षण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना आवश्यक आहे. सध्या चंद्रपूर येथील सहाय्यक वनसंरक्षकाकडे येथील पदभार असल्यामुळे ते येथे पुर्णवेळ देत नाही. त्याचा परिणाम वनाचे संरक्षण, संवर्धन, अवैध वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार, रेतीची अवैध वाहतुक, वन हक्काचे प्रकरणे आदी बाबीवर दुर्लक्ष होत आहे. तर वेळेवर कामे पुर्ण होत नसल्यामुळे अनेक कार्यालयीन कामे प्रलंबीत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. कनिष्ठ वन कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने ते सुद्धा सुस्तावले आहे. याची दखल घेवून वनाधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. याकडे लक्ष देऊन तत्काळ कार्यवाही करावी. (तालुका प्रतिनिधी)