शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

दुर्लक्षितपणामुळे घुग्घुसचा विकास खुंटला

By admin | Updated: June 28, 2014 23:30 IST

गावाचे रूपांतर शहरात होत आहे. तसेच औद्योगिक गाव म्हणून कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे कामगार घुग्घुसमध्ये असल्याने घुग्घुसची मोठ्या शहरात गणना केली जाते. उद्योगांमुळे घुग्घुस गावाचे

घुग्घुस : गावाचे रूपांतर शहरात होत आहे. तसेच औद्योगिक गाव म्हणून कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे कामगार घुग्घुसमध्ये असल्याने घुग्घुसची मोठ्या शहरात गणना केली जाते. उद्योगांमुळे घुग्घुस गावाचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे व लोकसंख्या सुद्धा सतत वाढत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे घुग्घुसचा विकास खुंटला आहे.या वाढत्या लोकसंख्येला त्यांच्या हक्काच्या मुलभुत सोई सुविधा उपलब्ध होत नसेल तर गावाचा विकास खुंटल्यासारखा वाटतो. एकीकडे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोज एक नगर निर्माण होत असून जमिनीचे भावसुद्धा गगनाला भिडले आहे. भविष्यात लोकसंख्या वाढीचे व शहरीकरणामुळे पाणी टंचाई, वीज टंचाई, रस्ते, पार्किंगसारख्या समस्या नागरिकांना भेडसावत आहे. ही समस्या भेडसावल्याच्या आधीच नियोजन होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी उदासीन झाले आहे. गावात शासनाच्या महत्वाच्या ज्या योजना आहे, त्यात निर्मल ग्राम स्वच्छता, अनुदानावर शौचालय, राजीव गांधी जीवन दायी योजना इंदिरा आवास योजना, अशा बऱ्याच योजना ज्या नागरिकांच्या हिताच्या आहे. त्या राबविणे, गावाचे टाऊन प्लॉनींग हे भविष्याकरिता अत्यंत महत्वाचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष आहे. गावातील आतील-बाहेरील अतिक्रमण वाढले आहे. आज घुग्घुसची लोकसंख्या ५० हजारापर्यंत पोहचत आहे. या ५० हजाराच्या नागरिकांना मुलभुत सोई पुरविणे हे देखील गरजेचे आहे.जुन्या घुग्घुस गावापेक्षा आज सीमा वाढल्या आहेत. तीन ते चार कि.मी. पर्यंत नविन नगरे तयार झालीत व पुढेही तयार होऊन सीमा पुन्हा वाढतील. शहराचे विस्तारीकरण हीसुद्धा गरज आहे. मुलभूत सोईकरीता लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्याकरीता प्रशासनाने नियोजन करणे गरजेचे झाले आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात घुग्घुसचा विकास, गावातील रस्ते झाले. काही प्रमाणात पाणी पुरवठा योजना राबविल्या गेली. परंतु गेल्या १० वर्षात घुग्घुसचा विकास खुंटला असल्याचीी खंत सुुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहे.आज घुग्घुसच्या नागरिकांना पाणी समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. चार-पाच दिवसातून एकदा पााणी पुरवठा होतो. हाकेच्या अंतरावर दोन मोठ्या नद्या आहे, तरी घुग्घुस गाव पाण्याविना तहानलेलेच आहे. पाण्याची योजना आहे. ती कुचकामी ठरत आहे. तसेच आठवडी बाजारातील व गावातील केरकचरा यांची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रा.पं. विडों कंपोस्टींग हा कचऱ्याला वेगळा करणारा व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्प जसा भद्रावती न.प. उभारला त्या धरतीवर राबविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.घुग्घुस ग्रामपंचायत १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. निवडून दिलेल्या जनप्रतिनिधीनी गावाच्या विकासाकरिता एकत्र येणे हीसुद्धा गरज झाली आहे. आज घुग्घुसची ओळख सर्वत्र आहे. परंतु विकासापासून आजही कोसो दूर आहे. तेव्हा या नागरिकांच्या मुलभूत सोई चांगल्याप्रकारे कशा उपलब्ध करून देता येईल. याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. (वार्ताहर)