शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

दुर्लक्षितपणामुळे घुग्घुसचा विकास खुंटला

By admin | Updated: June 28, 2014 23:30 IST

गावाचे रूपांतर शहरात होत आहे. तसेच औद्योगिक गाव म्हणून कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे कामगार घुग्घुसमध्ये असल्याने घुग्घुसची मोठ्या शहरात गणना केली जाते. उद्योगांमुळे घुग्घुस गावाचे

घुग्घुस : गावाचे रूपांतर शहरात होत आहे. तसेच औद्योगिक गाव म्हणून कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे कामगार घुग्घुसमध्ये असल्याने घुग्घुसची मोठ्या शहरात गणना केली जाते. उद्योगांमुळे घुग्घुस गावाचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे व लोकसंख्या सुद्धा सतत वाढत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे घुग्घुसचा विकास खुंटला आहे.या वाढत्या लोकसंख्येला त्यांच्या हक्काच्या मुलभुत सोई सुविधा उपलब्ध होत नसेल तर गावाचा विकास खुंटल्यासारखा वाटतो. एकीकडे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोज एक नगर निर्माण होत असून जमिनीचे भावसुद्धा गगनाला भिडले आहे. भविष्यात लोकसंख्या वाढीचे व शहरीकरणामुळे पाणी टंचाई, वीज टंचाई, रस्ते, पार्किंगसारख्या समस्या नागरिकांना भेडसावत आहे. ही समस्या भेडसावल्याच्या आधीच नियोजन होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी उदासीन झाले आहे. गावात शासनाच्या महत्वाच्या ज्या योजना आहे, त्यात निर्मल ग्राम स्वच्छता, अनुदानावर शौचालय, राजीव गांधी जीवन दायी योजना इंदिरा आवास योजना, अशा बऱ्याच योजना ज्या नागरिकांच्या हिताच्या आहे. त्या राबविणे, गावाचे टाऊन प्लॉनींग हे भविष्याकरिता अत्यंत महत्वाचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष आहे. गावातील आतील-बाहेरील अतिक्रमण वाढले आहे. आज घुग्घुसची लोकसंख्या ५० हजारापर्यंत पोहचत आहे. या ५० हजाराच्या नागरिकांना मुलभुत सोई पुरविणे हे देखील गरजेचे आहे.जुन्या घुग्घुस गावापेक्षा आज सीमा वाढल्या आहेत. तीन ते चार कि.मी. पर्यंत नविन नगरे तयार झालीत व पुढेही तयार होऊन सीमा पुन्हा वाढतील. शहराचे विस्तारीकरण हीसुद्धा गरज आहे. मुलभूत सोईकरीता लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्याकरीता प्रशासनाने नियोजन करणे गरजेचे झाले आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात घुग्घुसचा विकास, गावातील रस्ते झाले. काही प्रमाणात पाणी पुरवठा योजना राबविल्या गेली. परंतु गेल्या १० वर्षात घुग्घुसचा विकास खुंटला असल्याचीी खंत सुुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहे.आज घुग्घुसच्या नागरिकांना पाणी समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. चार-पाच दिवसातून एकदा पााणी पुरवठा होतो. हाकेच्या अंतरावर दोन मोठ्या नद्या आहे, तरी घुग्घुस गाव पाण्याविना तहानलेलेच आहे. पाण्याची योजना आहे. ती कुचकामी ठरत आहे. तसेच आठवडी बाजारातील व गावातील केरकचरा यांची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रा.पं. विडों कंपोस्टींग हा कचऱ्याला वेगळा करणारा व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्प जसा भद्रावती न.प. उभारला त्या धरतीवर राबविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.घुग्घुस ग्रामपंचायत १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. निवडून दिलेल्या जनप्रतिनिधीनी गावाच्या विकासाकरिता एकत्र येणे हीसुद्धा गरज झाली आहे. आज घुग्घुसची ओळख सर्वत्र आहे. परंतु विकासापासून आजही कोसो दूर आहे. तेव्हा या नागरिकांच्या मुलभूत सोई चांगल्याप्रकारे कशा उपलब्ध करून देता येईल. याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. (वार्ताहर)