शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षितपणामुळे घुग्घुसचा विकास खुंटला

By admin | Updated: June 28, 2014 23:30 IST

गावाचे रूपांतर शहरात होत आहे. तसेच औद्योगिक गाव म्हणून कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे कामगार घुग्घुसमध्ये असल्याने घुग्घुसची मोठ्या शहरात गणना केली जाते. उद्योगांमुळे घुग्घुस गावाचे

घुग्घुस : गावाचे रूपांतर शहरात होत आहे. तसेच औद्योगिक गाव म्हणून कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे कामगार घुग्घुसमध्ये असल्याने घुग्घुसची मोठ्या शहरात गणना केली जाते. उद्योगांमुळे घुग्घुस गावाचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे व लोकसंख्या सुद्धा सतत वाढत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे घुग्घुसचा विकास खुंटला आहे.या वाढत्या लोकसंख्येला त्यांच्या हक्काच्या मुलभुत सोई सुविधा उपलब्ध होत नसेल तर गावाचा विकास खुंटल्यासारखा वाटतो. एकीकडे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोज एक नगर निर्माण होत असून जमिनीचे भावसुद्धा गगनाला भिडले आहे. भविष्यात लोकसंख्या वाढीचे व शहरीकरणामुळे पाणी टंचाई, वीज टंचाई, रस्ते, पार्किंगसारख्या समस्या नागरिकांना भेडसावत आहे. ही समस्या भेडसावल्याच्या आधीच नियोजन होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी उदासीन झाले आहे. गावात शासनाच्या महत्वाच्या ज्या योजना आहे, त्यात निर्मल ग्राम स्वच्छता, अनुदानावर शौचालय, राजीव गांधी जीवन दायी योजना इंदिरा आवास योजना, अशा बऱ्याच योजना ज्या नागरिकांच्या हिताच्या आहे. त्या राबविणे, गावाचे टाऊन प्लॉनींग हे भविष्याकरिता अत्यंत महत्वाचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष आहे. गावातील आतील-बाहेरील अतिक्रमण वाढले आहे. आज घुग्घुसची लोकसंख्या ५० हजारापर्यंत पोहचत आहे. या ५० हजाराच्या नागरिकांना मुलभुत सोई पुरविणे हे देखील गरजेचे आहे.जुन्या घुग्घुस गावापेक्षा आज सीमा वाढल्या आहेत. तीन ते चार कि.मी. पर्यंत नविन नगरे तयार झालीत व पुढेही तयार होऊन सीमा पुन्हा वाढतील. शहराचे विस्तारीकरण हीसुद्धा गरज आहे. मुलभूत सोईकरीता लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्याकरीता प्रशासनाने नियोजन करणे गरजेचे झाले आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात घुग्घुसचा विकास, गावातील रस्ते झाले. काही प्रमाणात पाणी पुरवठा योजना राबविल्या गेली. परंतु गेल्या १० वर्षात घुग्घुसचा विकास खुंटला असल्याचीी खंत सुुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहे.आज घुग्घुसच्या नागरिकांना पाणी समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. चार-पाच दिवसातून एकदा पााणी पुरवठा होतो. हाकेच्या अंतरावर दोन मोठ्या नद्या आहे, तरी घुग्घुस गाव पाण्याविना तहानलेलेच आहे. पाण्याची योजना आहे. ती कुचकामी ठरत आहे. तसेच आठवडी बाजारातील व गावातील केरकचरा यांची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रा.पं. विडों कंपोस्टींग हा कचऱ्याला वेगळा करणारा व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्प जसा भद्रावती न.प. उभारला त्या धरतीवर राबविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.घुग्घुस ग्रामपंचायत १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. निवडून दिलेल्या जनप्रतिनिधीनी गावाच्या विकासाकरिता एकत्र येणे हीसुद्धा गरज झाली आहे. आज घुग्घुसची ओळख सर्वत्र आहे. परंतु विकासापासून आजही कोसो दूर आहे. तेव्हा या नागरिकांच्या मुलभूत सोई चांगल्याप्रकारे कशा उपलब्ध करून देता येईल. याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. (वार्ताहर)