शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ई-लर्निंग शाळेतून घडविला आदर्श

By admin | Updated: December 30, 2016 01:23 IST

बल्लारपूर तालुक्यातील जुनी दहेली या गावातील जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ८ वर्ग पर्यंतची १५० विद्यार्थी असलेल्या शाळेने एक आदर्श निर्माण केला आहे.

गावकऱ्यांचे सहकार्य : दहेलीची जिल्हा परिषद शाळा वसंत खेडेकर  बल्लारपूर बल्लारपूर तालुक्यातील जुनी दहेली या गावातील जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ८ वर्ग पर्यंतची १५० विद्यार्थी असलेल्या शाळेने एक आदर्श निर्माण केला आहे. येथील पहिला वर्ग वगळता बाकी सर्व वर्गामध्ये ई-लर्निंगची व्यवस्था, संगणक, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी, शाळेत त्यांचे मन रमावे व जुळावे अशा पद्धतीची शिक्षकांची कार्यप्रणाली, मध्यान्ह भोजनाची शिस्त अतिशय कौतुकास्पद आहे. हे सर्व पाहून शाळा परिवार, शिक्षण व शिक्षक असेच असावेत, असे आपुसक शब्द निघत असून विद्यार्थी व शिक्षकांनी एक नवा आदर्शच घडवून दिला आहे. शिस्त आणि आदर्शमय वातावरण केवळ या शाळेपुरतेच मर्यादित नाही तर गावकऱ्यांमध्ये पाल्यांच्या शिक्षणाबाबत आवड निर्माण होऊन या शाळेच्या सर्वांगीण विकासार्थ गावकरीही आवडीने पुढे आले आहेत. चांगले शिक्षण व शिस्त याबाबत सकारात्मक भावना शिक्षकंसोबतच गावकऱ्यांच्याही मनात निर्माण झाली की कसे आदर्शवत घडून येते, हे जुनी दहेलीतील या शाळेत बघायला मिळते. प्रत्यक्ष भेट दिली असता, गावकऱ्यांनी मनात आणले तर कसा चांगला बदल घडून येऊ शकतो, हे बघायला मिळाले. प्रस्तुत प्रतिनिधी शाळेत पोहचला त्या समयी मध्यान्ह भोजनाची वेळ झाली होती. सूचक घंटा वाजल्यानंतर विद्यार्थी रांगेने व शिस्तबद्ध वर्गातून बाहेर निघाले. हात धुवून चटईवर बसलेत. मसाला भात वाढलेले ताट त्यांचे पुढे आल्यानंतर सर्वांनी सामुदायिक प्रार्थना (श्लोक) केली. नंतर जेवायला सुरुवात ! हे सारे बघून असेच सर्वत्र साऱ्या शाळांमध्ये झाले तर? असा प्रश्न मनाला स्पर्शून गेला. मुख्याध्यापकपदी सुरेश गिलोरकर हे येथे बदलून आल्यानंतर या शाळेची स्थिती बदलविण्याकरिता गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून मिळालेल्या आर्थिक सहयोगाने संगणकांची दुरुस्ती केली. पुढे ई लर्निंग शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन लोक सहभागातून प्रत्येक वर्गात ई लर्निंग शिक्षणाची सोय केली. विद्यार्थी संगणक हाताळतात. स्वत: माऊस हातात घेऊन ई लर्निंगच्या माध्यमातून माहिती मिळवतात. या शाळेतील विद्यार्थी आधुनिक शिक्षणप्रणाली व तंत्रज्ञानाची असे जुळले गेले आहेत. बल्लारपूर येथील डॉ. अनिल वाढई (संचालक चंजिम बँक) यांचे हे जन्मगाव असून त्यांचे व शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश मोहितकर यांचे शाळेच्या सकारात्मक बदलात मोठे सहकार्य लाभत आले आहे, असे शिक्षक सांगतात. परिसर वृक्ष फुलांनी फुलविला असून विद्यार्थी व्यसनापासून दूर आहेत. भजन कार्यक्रमातून मदत निधी गोळा शाळेच्या मदत निधी संकलनाकरिता गावात एखादा स्टेज कार्यक्रम करण्याचे ठरले. काहींचे मत नाटकाचा प्रयोग करावा असे होते. पण, नाटकातून केवळ मनोरंजनच होईल. लोकांचे प्रबोधन व्हावे, या विचारातून भजन स्पर्धा घेण्याचे पक्के झाले आणि या भजन स्पर्धेतून बरीच मोठी निधी तर उभी झालीच, राष्ट्रसंताचे ग्रामविकासाचे विचारही लोकांपर्यंत पोहचले.