शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पतीचा अपघात नसून हत्या केली

By admin | Updated: September 5, 2015 01:12 IST

तालुक्यातील उचली (कालेता) येथे ३० आॅगस्टला माझे पती शालिकराम ढोरे यांची गावालगत रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास हत्या करुन मारेकरी पसार झाले.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : शालिनी ढोरे यांचा पत्रकार परिषदेत आरोपब्रह्मपुरी : तालुक्यातील उचली (कालेता) येथे ३० आॅगस्टला माझे पती शालिकराम ढोरे यांची गावालगत रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास हत्या करुन मारेकरी पसार झाले. ब्रह्मपुरी पोलिसांनी हे प्रकरण अपघात म्हणून नोंदविले आहे. तेव्हा माझ्या पतीचा अपघात झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली, आरोपींचा पोलिसांनी शोध घ्यावा. दडपलेले प्रकरण नव्याने चौकशी करुन गुन्हेगारांना अटक करण्याची करावी, अशी मागणी मृताची पत्नी शालिनी ढोरे यांनी पत्रकार परिषदेतून केली. माहिती देताना त्या म्हणाल्या, पती शालिकराम मिस्त्री काम करीत होते. यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरू होता. मृत शालिकराम हे सकाळी काही कामानिमित्ताने धानोली (पवनी) येथे गेले होते. ते दुपारी परत आले. पुन्हा ३ ते ४ वाजताच्या दरम्यान काहालीला गेले व पुन्हा ब्रह्मपुरीला मुलांच्या दाखल्यासाठी गेले. नंतर ७ वाजता उचलीला घरी आले व लगेच कामानिमित्ताने काहालीला गेले. सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान उचली-काहाली मार्गावर शालिकराम आपल्या मोटरसायकलने प्रचार करणाऱ्या महिलांना पडलेले ेदिसले व मोठमोठ्याने वाचवा म्हणून ओरडत होते. लगेच मला माहिती मिळताच घटनास्थळ गाठून त्यांना ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने ते बेशुद्ध होते. त्यामुळे त्यांना बोलता येत नव्हते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी नागपूरला हलविण्याचे सांगितल्याने नागपूर येथे नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे पत्नीने सांगितले.माझ्या पतीची हत्या नातेसंबंधातील व्यक्तीने केली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. परंतु मारेकऱ्यांनीच अपघात झाल्याची खोटी तक्रार ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला दिली होती. मी पतीच्या उपचारासाठी धडपडत असताना मारेकऱ्यांनीच खोटी तक्रार दिल्याने ब्रह्मपुरी पोलिसांनी हा प्रकार अपघात म्हणून बंद केला आहे. ज्यावेळेस ही घटना घडली, तेव्हा माझ्या पतीच्या दुचाकीचे साधे लाईट फूटले नव्हते, मारेकऱ्यांची सायकल तेथे नव्हती. परंतु दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पंचनामा केला असता मोटरसायकल व सायकलची तुटफूट असल्याचे दाखविण्यात आले आहे. अपघाताचा हा केवळ देखावा केला आहे, असे त्या म्हणाल्या.काही साक्षदाराचे बयाण ही हत्येच्या बाजूने नोंदविले असूनही तुमच्याकडे ठोस पुरावा नाही म्हणून हे प्रकरण ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक गुंडाळून हत्यारांना अभय देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी आहे. हत्याऱ्यांकडून मला व माझ्या कुटुंबांना धोका असून त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक करण्याची मागणी व न्याय न मिळाल्यास या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद मागणार असल्याचे शालिनी ढोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रपरिषदेला गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)