शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पतीचा अपघात नसून हत्या केली

By admin | Updated: September 5, 2015 01:12 IST

तालुक्यातील उचली (कालेता) येथे ३० आॅगस्टला माझे पती शालिकराम ढोरे यांची गावालगत रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास हत्या करुन मारेकरी पसार झाले.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : शालिनी ढोरे यांचा पत्रकार परिषदेत आरोपब्रह्मपुरी : तालुक्यातील उचली (कालेता) येथे ३० आॅगस्टला माझे पती शालिकराम ढोरे यांची गावालगत रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास हत्या करुन मारेकरी पसार झाले. ब्रह्मपुरी पोलिसांनी हे प्रकरण अपघात म्हणून नोंदविले आहे. तेव्हा माझ्या पतीचा अपघात झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली, आरोपींचा पोलिसांनी शोध घ्यावा. दडपलेले प्रकरण नव्याने चौकशी करुन गुन्हेगारांना अटक करण्याची करावी, अशी मागणी मृताची पत्नी शालिनी ढोरे यांनी पत्रकार परिषदेतून केली. माहिती देताना त्या म्हणाल्या, पती शालिकराम मिस्त्री काम करीत होते. यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरू होता. मृत शालिकराम हे सकाळी काही कामानिमित्ताने धानोली (पवनी) येथे गेले होते. ते दुपारी परत आले. पुन्हा ३ ते ४ वाजताच्या दरम्यान काहालीला गेले व पुन्हा ब्रह्मपुरीला मुलांच्या दाखल्यासाठी गेले. नंतर ७ वाजता उचलीला घरी आले व लगेच कामानिमित्ताने काहालीला गेले. सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान उचली-काहाली मार्गावर शालिकराम आपल्या मोटरसायकलने प्रचार करणाऱ्या महिलांना पडलेले ेदिसले व मोठमोठ्याने वाचवा म्हणून ओरडत होते. लगेच मला माहिती मिळताच घटनास्थळ गाठून त्यांना ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने ते बेशुद्ध होते. त्यामुळे त्यांना बोलता येत नव्हते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी नागपूरला हलविण्याचे सांगितल्याने नागपूर येथे नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे पत्नीने सांगितले.माझ्या पतीची हत्या नातेसंबंधातील व्यक्तीने केली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. परंतु मारेकऱ्यांनीच अपघात झाल्याची खोटी तक्रार ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला दिली होती. मी पतीच्या उपचारासाठी धडपडत असताना मारेकऱ्यांनीच खोटी तक्रार दिल्याने ब्रह्मपुरी पोलिसांनी हा प्रकार अपघात म्हणून बंद केला आहे. ज्यावेळेस ही घटना घडली, तेव्हा माझ्या पतीच्या दुचाकीचे साधे लाईट फूटले नव्हते, मारेकऱ्यांची सायकल तेथे नव्हती. परंतु दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पंचनामा केला असता मोटरसायकल व सायकलची तुटफूट असल्याचे दाखविण्यात आले आहे. अपघाताचा हा केवळ देखावा केला आहे, असे त्या म्हणाल्या.काही साक्षदाराचे बयाण ही हत्येच्या बाजूने नोंदविले असूनही तुमच्याकडे ठोस पुरावा नाही म्हणून हे प्रकरण ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक गुंडाळून हत्यारांना अभय देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी आहे. हत्याऱ्यांकडून मला व माझ्या कुटुंबांना धोका असून त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक करण्याची मागणी व न्याय न मिळाल्यास या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद मागणार असल्याचे शालिनी ढोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रपरिषदेला गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)