शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळाचा तडाखा

By admin | Updated: April 30, 2016 00:49 IST

गतवर्षीच्या कोरड्या दुष्काळाची झळ जिल्ह्यातील अनेक शेतकरी व नागरिक सध्या सोसत आहेत.

चंद्रपूर : गतवर्षीच्या कोरड्या दुष्काळाची झळ जिल्ह्यातील अनेक शेतकरी व नागरिक सध्या सोसत आहेत. मात्र निसर्गाची अवकृपा अद्यापही दूर झालेली नाही. नववर्षापासून चार महिन्यांत सतत अवकाळी पावसाचा फटका शेतकरी व नागरिक सहन करीत असताना गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात चक्रीवादळाचा कहर सुरू आहे. त्यामुळे वीज कंपनीसह अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पावसाने हजेरी लावली. तर गुरूवारीही चंद्रपूर शहरासह अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली. तर वीज कंपनीच्या खांबावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे चंद्रपूर शहराचा वीज पुरवठा सुमारे एक तास खंडीत होता. तर अनेक गावातील वीज रात्रभर गूल होती. गोवरी गावाला वादळाचा तडाखाराजुरा तालुुक्यातील गोवरी येथे गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळाने गावातील बहुतांश घरांचे छप्पर उडाले. अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब तुटल्याने राजुरा-गोवरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गोवरी येथील बंडू बोरकुटे, भास्कर गंधमवार, शंकर गंधमवार, भाऊराव जुनघरी यांचा घरांची छप्परे उडाली तर प्रभाकर जुनघरी, डॉ. वासुदेव लोहे, पैकन बल्की, नवनाथ पाचभाई, रुपेश पाचभाई यांच्या गोठ्यातील टिनाचे पत्रे वाऱ्याच्या जबरदस्त तडाख्यात उडून गेली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घराच्या छप्परांचा सांगाडाच ५०० फुटापर्यंत दूर फेकल्या गेला. यात अनेकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शंकर गंधमवार यांचा घरातील सर्व सदस्य सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास जेवण करण्याच्या तयारीत असतानाच अचानक आलेल्या वादळाने त्यांच्या घराचे संपूर्ण छप्पर उडवून नेले. काही कळायचा क्षणार्धात सर्व कुटुंब आभाळाखाली आले. जीवीत हाणी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे.येन्सा येथे घरांचे नुकसानयेन्सा : येन्सा परिसराला बुधवारी सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला. वादळासह पाऊस झाल्याने येन्सा येथील सुधाकर तानबा निकुरे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. छत उडाल्याने त्यांना रात्री पावसातच दुसरीकडे आसरा घ्यावा लागला. सकाळी तहीलदार, तलाठी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. महिला जखमीगोवरी येथील ६५ वर्षीय महिला बेबी मुंजमवार ही अंगणात बकरी बांधायला गेली होती. तेवढ्यात प्रचंड चक्रीवादळ आला. यात मुंजमवार यांचा घरावर ठेवलेला १५ किलोचा दगड बेबीताईच्या पायावर पडला. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. सुदैवाने हा दगड तिच्या डोक्यावर पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता.धानपिकाचे नुकसानपाथरी : यावर्षी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने गोसेखुर्द धरणाचे पाणी आसोलामेंढा तलावात पाडून पााथरी येथील शेतकऱ्यांना उन्हाळी धान घेण्याची संधी मिळवून दिली. त्यामुळे परिसरातील अनेकांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. आजपर्यंत धान पीक जोमाने येवून भरपूर उत्पन्न होईल, अशी आशा होती. परंतु, बुधवार व गुरुवारी झालेला अवकाळी व वादळी पावसाने धानपीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वीज पडून म्हैस ठारभेजगाव : मूल तालुक्यातील येसगाव येथे बुधवारी झालेल्या वादळी पावसात वीज कोसळून म्हैस ठार झाल्याची घटना घडली. परिसरात वादळी पाऊस झाला.