शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या जमातीच्या आश्रमशाळातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: April 25, 2016 00:42 IST

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलामुलींसाठी राज्यात जवळपास सातशे आश्रमशाळा आहेत.

वरिष्ठांनी लक्ष द्यावे : दोन वर्षांपासून अनुदान रखडलेराजुरा : विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलामुलींसाठी राज्यात जवळपास सातशे आश्रमशाळा आहेत. मात्र या आश्रम शाळांना गत दोन वर्षांपासून अनुदान योग्य पद्धतीने न दिल्यामुळे आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. २०१४ मध्ये विद्यार्थ्यांना ६० टक्के अनुदान देण्यात आले. २०१५ मध्ये मात्र केवळ एक लाखाचे अनुदान देण्यात आले. आता वर्ष संपत आले. परंतु २०१६ चे अनुदान अजूनपर्यंत मिळालेले नाही. विमुक्त भटक्या जमातीच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. मात्र योग्य वेळी अनुदान न दिल्यामुळे आश्रमशाळा चालविणे कठीण होत असल्याचा आरोप, अनंता चटप यांनी केला आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रातील विमुक्त भटक्या जमातीच्या आश्रमशाळेत वर्ग पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी निवासी राहतात. दुर्गम भागातील मुले- मुली या आश्रमशाळेत शिक्षण घेण्याकरिता येत असतात. परंतु शासन या गरीब मुलाच्या सोई-सवलतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. एका संस्थेचे एक करोडच्यावर अनुदान मिळालेले नाही. शिक्षणाचा झरा शेवटच्या माणसापर्यंत पोहचला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असताना या विभागात कार्यरत अधिकारी मात्र निर्बंध आणत आहे. ज्याप्रमाणे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेला सातवीनंतर आठ ते दहावीपर्यंत परवानगी दिली. त्याच धर्तीवर विमुक्त जाती जमातीच्या आश्रमशाळांनासुद्धा आठवी ते दहावीपर्यंत वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे. आश्रमशाळा वाचविण्यासाठी शासनाने त्वरित अनुदान देण्याची मागणी, अनंता चटप यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)