शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

भटक्या जमातीच्या आश्रमशाळातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: April 25, 2016 00:42 IST

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलामुलींसाठी राज्यात जवळपास सातशे आश्रमशाळा आहेत.

वरिष्ठांनी लक्ष द्यावे : दोन वर्षांपासून अनुदान रखडलेराजुरा : विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलामुलींसाठी राज्यात जवळपास सातशे आश्रमशाळा आहेत. मात्र या आश्रम शाळांना गत दोन वर्षांपासून अनुदान योग्य पद्धतीने न दिल्यामुळे आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. २०१४ मध्ये विद्यार्थ्यांना ६० टक्के अनुदान देण्यात आले. २०१५ मध्ये मात्र केवळ एक लाखाचे अनुदान देण्यात आले. आता वर्ष संपत आले. परंतु २०१६ चे अनुदान अजूनपर्यंत मिळालेले नाही. विमुक्त भटक्या जमातीच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. मात्र योग्य वेळी अनुदान न दिल्यामुळे आश्रमशाळा चालविणे कठीण होत असल्याचा आरोप, अनंता चटप यांनी केला आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रातील विमुक्त भटक्या जमातीच्या आश्रमशाळेत वर्ग पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी निवासी राहतात. दुर्गम भागातील मुले- मुली या आश्रमशाळेत शिक्षण घेण्याकरिता येत असतात. परंतु शासन या गरीब मुलाच्या सोई-सवलतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. एका संस्थेचे एक करोडच्यावर अनुदान मिळालेले नाही. शिक्षणाचा झरा शेवटच्या माणसापर्यंत पोहचला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असताना या विभागात कार्यरत अधिकारी मात्र निर्बंध आणत आहे. ज्याप्रमाणे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेला सातवीनंतर आठ ते दहावीपर्यंत परवानगी दिली. त्याच धर्तीवर विमुक्त जाती जमातीच्या आश्रमशाळांनासुद्धा आठवी ते दहावीपर्यंत वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे. आश्रमशाळा वाचविण्यासाठी शासनाने त्वरित अनुदान देण्याची मागणी, अनंता चटप यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)