शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बाप्पांच्या स्थापनेसाठी दीड हजारावर मंडळे सज्ज

By admin | Updated: September 15, 2015 01:19 IST

येत्या १७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून सार्वजनिक गणेश मंडळाकडून यासाठी सुरू असलेली

चंद्रपूर : येत्या १७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून सार्वजनिक गणेश मंडळाकडून यासाठी सुरू असलेली तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. मंडप उभारणी आणि सजावटींच्या कामाला वेग आहे. जिल्ह्यात दीड हजारावर सार्वजनिक गणपतीची स्थापना होणार असून १० हजारांपेक्षा अधिक घरगुती गणपतींची स्थापना करण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताजने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरवर्षीच चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही चंद्रपूर शहरातील गणेशोत्सव जिल्हाभरातील भक्तांच्या आकर्षणाचा विषय असतो. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तर जिल्ह्यातील भाविकांची अलोट गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्सवादरम्यान, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी तगड्या पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. उत्सवादरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही उपाययोजनाही पोलिसांनी आखल्या आहेत. यंदाचा गणेशोत्सव दारू विरहीत साजरा व्हावा, यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. गणेशाची स्थापना मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीत मद्यप्राशन करणाऱ्या भक्तावर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. जिल्ह्यात दारूबंदी असल्याने गणेशोत्सवादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारू तस्करी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उत्सवादरम्यानच्या नियमित ड्युटीसोबतच पोलिसांपुढे दारू तस्करी रोखण्याचे मोठे आव्हानही पेलावे लागणार आहे. (प्रतिनिधी)छेडखानींवर करडी नजर४चंद्रपूर शहरातून निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविक चंद्रपुरात दाखल होतात. शहरात मोठी गर्दी होते. याचाच फायदा घेत काही गुंडप्रवृत्तीचे विकृत तरूण या मिरवणुकीत दाखल होतात. त्यांच्याकडून युवतींची छेडखानी करण्याचे प्रकारही घडतात. या युवकांच्या बंदोबस्तासाठी महिला पोलीस शिपायी तैनात राहणार आहेत. विशेष म्हणजे या महिला पोलीस खासगी गणवेशात असतील. दारू रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक४गणेशोत्सवाच्या पर्वावर परजिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूची आयात केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दारू तस्कर व विक्रेते यांच्याविरुद्ध तगडी फिल्डींग लावली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यात एक अधिकारी व १० पोलीस शिपाई कार्यरत राहतील. हे पथक डोळ्यात तेल घालून दारू विक्री व तस्करीवर नियंत्रण ठेवतील. तगडा पोलीस बंदोबस्त४गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासाठी १५० पोलीस अधिकारी, दोन हजार ७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तात राहणार आहे. यासोबतच गृहरक्षक दलाचे ७०० जवान तैनात राहणार आहेत. त्यात ६०० पुरूष व १०० महिलांचा समावेश आहे. आटीबीपीची तुकडीही येणार४चंदपूर जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष बंदोबस्तासाठी आयटीबीपी (इंदौर तिबेटीयन बॉर्डर पोलीस) ची एक तुकडीही तैनात असणार आहे. उत्सवाच्या दहाही दिवस ही तुकडी स्थानिक पोलिसांच्या मदतीला राहणार आहे.