शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

जाळ्यात अडकून शेकडो पाखरांचा मृत्यू

By admin | Updated: March 9, 2016 01:56 IST

सूर्यफुलाचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी गोंडपिपरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मासे पकडण्याच्या जाळ्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असून ...

वन विभागाची टोलवाटोलवी : सूर्यफुलाच्या संरक्षणासाठी मासेमारीचे जाळेचंद्रपूर : सूर्यफुलाचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी गोंडपिपरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मासे पकडण्याच्या जाळ्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असून यामुळे गेल्या महिन्याभरात विविध जातीच्या व दुर्मिळ अशा ५०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला. ही बाब वन विभागाने अद्यापही गांभिर्याने घेतली नसून वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जात आहे. यासंदर्भात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या निसर्ग सखा या संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतरही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात न आल्याने पक्ष्यांचे मृत्युसत्र अद्यापही सुरूच आहे. गोंडपिपरी तालुक्यात ५०० पेक्षा अधिक हेक्टरवर यंदा शेकडो शेतकऱ्यांनी सूर्यफुलांची लागवड केली आहे. तालुक्यातील विठ्ठलवाडा, भंगाराम (तळोधी), तारसा, नवेगाव, नांदगाव, येनबोधला, तांडा खराटपेठ, सालेझरी, आदी गाव परिसरातील ७० ते ८० शेतांमध्ये शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केली असून सूर्यफुलाच्या संरक्षणासाठी मासेमारी करण्याचे जाळे जमीनीपासून १५ फुट उंच बांबूच्या सह्यायाने पसरविले आहे. मागील महिन्यांपासून सूर्यफुल बियांवर आले आहे. सूर्यफुलाचे बी खाण्यासाठी संबंधित शेती परिसरात मोठ्या संख्येने पक्षी घिरट्या घालत असतात. पिकावर नॉयलनचे जाळे पसरविण्यात आल्याने त्यात हे नि:ष्पाप जीव अडकून मृत्युमुखी पडत आहे. त्यात शिखरा, गरुड, पोपट, वेडाराघू, रानचिमणी, लावा, कवडी, लालबुळ्या, बुलबुल, टिटवी, करकोचा, वटवाघूळ आदी पक्ष्यांचा समावेश आहे. ही बाब गोंडपिपरी येथील निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे यांना माहिती होताच, त्यांनी ६ मार्च रोजी विठ्ठलवाडा परिसरातील नानाजी पुप्पलवार, संतोष कुंदोजवार, पोतराजे, गणपती वाग्दरकर यांच्या शेताची पाहणी केली असता, या शेतकऱ्यांच्या शेतात लावलेल्या जाळ्यामध्ये विविध जातीचे ४७ पक्षी मृत्युमुखी पडल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वांढरे यांनी यासंदर्भात मध्य चांदा वन विभागाचे डीएफो गजेंद्र हिरे यांना दूरध्वनीवरून याबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच संबंधिक कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर जाण्याचे फर्मानही सोडले. परंतु अद्यापही पिकावर लावलेले जीवघेणे जाळे काढण्यात आले नाहीत. (प्रतिनिधी)