शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जाळ्यात अडकून शेकडो पाखरांचा मृत्यू

By admin | Updated: March 9, 2016 01:56 IST

सूर्यफुलाचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी गोंडपिपरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मासे पकडण्याच्या जाळ्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असून ...

वन विभागाची टोलवाटोलवी : सूर्यफुलाच्या संरक्षणासाठी मासेमारीचे जाळेचंद्रपूर : सूर्यफुलाचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी गोंडपिपरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मासे पकडण्याच्या जाळ्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असून यामुळे गेल्या महिन्याभरात विविध जातीच्या व दुर्मिळ अशा ५०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला. ही बाब वन विभागाने अद्यापही गांभिर्याने घेतली नसून वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जात आहे. यासंदर्भात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या निसर्ग सखा या संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतरही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात न आल्याने पक्ष्यांचे मृत्युसत्र अद्यापही सुरूच आहे. गोंडपिपरी तालुक्यात ५०० पेक्षा अधिक हेक्टरवर यंदा शेकडो शेतकऱ्यांनी सूर्यफुलांची लागवड केली आहे. तालुक्यातील विठ्ठलवाडा, भंगाराम (तळोधी), तारसा, नवेगाव, नांदगाव, येनबोधला, तांडा खराटपेठ, सालेझरी, आदी गाव परिसरातील ७० ते ८० शेतांमध्ये शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केली असून सूर्यफुलाच्या संरक्षणासाठी मासेमारी करण्याचे जाळे जमीनीपासून १५ फुट उंच बांबूच्या सह्यायाने पसरविले आहे. मागील महिन्यांपासून सूर्यफुल बियांवर आले आहे. सूर्यफुलाचे बी खाण्यासाठी संबंधित शेती परिसरात मोठ्या संख्येने पक्षी घिरट्या घालत असतात. पिकावर नॉयलनचे जाळे पसरविण्यात आल्याने त्यात हे नि:ष्पाप जीव अडकून मृत्युमुखी पडत आहे. त्यात शिखरा, गरुड, पोपट, वेडाराघू, रानचिमणी, लावा, कवडी, लालबुळ्या, बुलबुल, टिटवी, करकोचा, वटवाघूळ आदी पक्ष्यांचा समावेश आहे. ही बाब गोंडपिपरी येथील निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे यांना माहिती होताच, त्यांनी ६ मार्च रोजी विठ्ठलवाडा परिसरातील नानाजी पुप्पलवार, संतोष कुंदोजवार, पोतराजे, गणपती वाग्दरकर यांच्या शेताची पाहणी केली असता, या शेतकऱ्यांच्या शेतात लावलेल्या जाळ्यामध्ये विविध जातीचे ४७ पक्षी मृत्युमुखी पडल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वांढरे यांनी यासंदर्भात मध्य चांदा वन विभागाचे डीएफो गजेंद्र हिरे यांना दूरध्वनीवरून याबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच संबंधिक कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर जाण्याचे फर्मानही सोडले. परंतु अद्यापही पिकावर लावलेले जीवघेणे जाळे काढण्यात आले नाहीत. (प्रतिनिधी)