शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

पोषण आहारात गरोदर महिला व बालकांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:32 IST

लाभार्थ्यांना दिला गेलेला हा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असून भेसळयुक्त असल्याचे पाहणीत दिसून आले. असा आहार आपल्या मुलांना ...

लाभार्थ्यांना दिला गेलेला हा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असून भेसळयुक्त असल्याचे पाहणीत दिसून आले. असा आहार आपल्या मुलांना कसा खाऊ घालू, असा सवाल वरोरा तालुक्यातील एकार्जूना येथील एका लाभार्थी महिलेने यावेळी केला. हा पोषण आहार आम्ही आहारात न वापरता जनावरांना खाऊ घालतो, असेही काही लाभार्थ्यांनी लोकमतला सांगितले.

१ ते ७ सप्टेंबर हा पोषण आहार सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहातच हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २,५६५ अंगणवाड्या तर मिनी अंगणवाडी ११९ अशा जिल्ह्यात २ हजार ८८४ अंगणवाड्या आहेत. लहान मुलांना पोषण आहार मिळावा, शाळेची ओढ लागावी म्हणून बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून या पोषण आहाराचा पुरवठा महाराष्ट्र कन्झुमर्स फेडरेशनतर्फे केला जातो. दर दोन महिन्यांनी हा आहार दिला जातो. यात तांदूळ (१९०० ग्रॅम), गहू (१९०० ग्रॅम), मिरची पावडर (२०० ग्रॅम), हळद (२०० ग्रॅम), मूगडाळ (१००० ग्रॅम), मीठ (४०० ग्रॅम), साखर (१०००ग्रॅम) दिले जाते. या वस्तूंबाबत काही लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची प्रत्यक्ष शहानिशा केली असता या तक्रारींमध्ये सत्यता आढळून आली. सर्वच अंगणवाडीतील हा प्रकार असल्याचे पुढे आले.

अंगणवाडी सेविकांवर दबाब

पुरवठादाराकडून पोषण आहाराचा जो पुरवठा करण्यात येतो तो पाकिट बंद असतो. तो तसाच लाभार्थ्यांना वाटप करावा लागतो. पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी काहीवेळा आल्या. याबाबत आम्ही वरिष्ठांना कळविले असता आमच्यावर दबाव आला.

- एक अंगणवाडी सेविका.

गहू निकृष्ट, चणा पाकिटत किडे

बिबी गावातील एका लाभार्थ्याकडे असलेली पोषण आहाराची पाकिटे फोडून बघितली असता गहू अतिशय निकृष्ट तर चणा पाकिटात किडे आढळून आले. तिखट, हळद व मिठात भेसळ असल्याचे दिसून आले. इतर ठिकाणीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. तिखटामध्ये बारीक माती दिसून आली.

लाभार्थी म्हणतात...

पोषण आहारामध्ये चणा, मूगडाळ, गहू, हळद, मीठ, तांदूळ येत आहे. तिखट, चणा व मूगडाळ याचा दर्जा निकृष्ट आहे. या वस्तू खाण्यायोग्य सुद्धा नाही. याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर हाेतो. तिखट तर फेकूनच देते. तेल मिळत होते. ते बंद झाले.

- सुप्रिया सुळे, लाभार्थी.

पोषण आहार वाटप केला जातो. त्याचा टेस्ट रिपोर्ट असतो. काही अंगणवाडीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जातात. पावसामुळे एखादठिकाणी होऊ शकते. ते आम्ही बदलून देतो. पोषण आहार निकृष्ट असल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत अद्याप आलेल्या नाही. तक्रारी असल्यास आम्ही तो बदलून देतो.

- प्रकाश भांडेकर, बालविकास अधिकारी (शहर), चंद्रपूर.