शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

प्रशासनाला आणखी किती हवे मृत्यू ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी मृत्यूचा कर्दनकाळ ठरलेल्या येथील वरोरा नाका चौकामध्ये उड्डाणपुलाला समांतर असा दुसरा उड्डाणपूल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी मृत्यूचा कर्दनकाळ ठरलेल्या येथील वरोरा नाका चौकामध्ये उड्डाणपुलाला समांतर असा दुसरा उड्डाणपूल बांधण्यात आला. याद्वारे अपघातांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच चौकामध्ये नागपूरकडून चंद्रपूर शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजक लावण्यात आले. त्यासाठी सिमेंटचे मोठमोठे दगड रस्त्याच्या अगदी मधोमध लावण्यात आले आहेत. मात्र, हे दगड विस्कळीत झाले असून, या दगडांमुळे अपघात होत आहेत. दररोज वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधी या रस्त्याने जातात, मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या चौकात प्रशासन पुन्हा एकदा मृत्यू होण्याची वाट तर बघत नाही ना, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील नगर परिषदेचे आता महापालिकेमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. शहरात विकासकामेही झपाट्याने सुरु आहेत. मात्र, या कामामध्ये प्रशासन काही चुकाही करत आहे. अशीच चूक वरोरा नाका चौकामध्येही करण्यात आली आहे. यामुळे अपघात होत असून, भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जनता काॅलेज चौकातून शहरात जाणाऱ्या रस्त्यावर वरोरा नाका परिसरातील रस्त्यावर दुभाजक लावण्यात आले असून, यासाठी मोठमोठे सिमेंटचे दगड ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सर्वत्र रस्त्यावर ते विस्कळीत झाले आहेत. त्यामुळे रात्री-बेरात्री अपघात होत आहेत. या रस्त्यावरील सिमेंटचे दगड हटवून पक्के दुभाजक बांधून त्यावर रेडियम लावावे, अशी मागणी होत आहे.

बाॅक्स

अधिकारी, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

या रस्त्याने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच शहरातील लोकप्रतिनिधीही जातात. मात्र, त्यातील एकाचेही याकडे लक्ष जाऊ नये, ही शहरवासियांसाठी शोकांतिकाच आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी किमान आता तरी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.