शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST

चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्बंध कमी करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात विशेष रेल्वे धावत आहेत. ...

चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्बंध कमी करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात विशेष रेल्वे धावत आहेत. परंतु, या रेल्वेसाठी केवळ तिकीट आरक्षित केलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना १५० रुपये अतिरिक्त देऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी जवळचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

मार्च महिन्यामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. पहिल्यांदाच सर्व रेल्वे सेवा बंद करण्यात आली. सुमारे पाच ते सहा महिन्यानंतर विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. परंतु, अद्यापही लोकल तसेच अन्य रेल्वे सुरु करण्यात आल्या नाही.

त्यामुळे रेल्वेने जवळचा प्रवास करायचा असेल तरी विशेष रेल्वेचाच वापर करावा लागत आहे. या रेल्वेमध्ये स्थानकावरील स्पॅाट तिकीट देणे बंद आहे. प्रवाशांना एक दिवसाअगोदर ॲानलाईन किंवा स्थानकावर जाऊन तिकीट आरक्षित करणे गरजेचे आहे. परंतु, यासाठी प्रवाशांना दीडशे रुपये अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही लूट थांबवण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

बॉक्स

आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी

कोरोनाच्या पूर्वी रेल्वेच्या १६० फेऱ्या व्हायच्या. मात्र कोरोनाने केवळ विशेष ट्रेन सुरु असून २० ट्रेनच्या ४० फेऱ्या होत आहे. परंतु, यासाठी केवळ आरक्षित तिकीट घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त स्पॉट तिकीट देणे बंद आहे.

रेल्वेने वर्धा, नागपूर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. परंतु, आता या प्रवाशांसाठी लोकल ट्रेन नसल्याने त्यांना विशेष रेल्वेनेच प्रवास करावा लागत आहे. मात्र त्यासाठी १५० रुपये अतिरिक्त द्यावे लागत आहे. त्यामुळे आरक्षणाची सक्ती बंद करावी, अशी मागणी आहे.

बॉक्स

तिकिटात फरक किती ?

रेल्वेचे तिकीट कमी असल्याचे अनेकजण रेल्वेने प्रवास करायचे. मात्र आता केवळ विशेष रेल्वे सुरु असून दीडशे रुपये अतिरिक्त देऊन प्रवास करावा लागत आहे.

बॉक्स

जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे

नवजीवन एक्स्प्रेस

तामिळनाडू एक्स्प्रेस,

जीटी एक्स्प्रेस,

हमसफर एक्स्प्रेस, सिकंदराबाद एक्स्प्रेस,

दक्षिण रेल्वे,

नवजीवन एक्स्प्रेस,

तामिळनाडू एक्स्प्रेस,

तेलंगणा एक्स्प्रेस

बॉक्स

प्रवाशी म्हणतात....

वर्धा, नागपूर येथे जाण्यासाठी प्रवाशांना रेल्वे सोयीची होती. मात्र आता केवळ विशेष रेल्वे सुरु असून प्रवाशांना १५० रुपये अतिरिक्त देऊन तिकीट आरक्षित करावी लागत आहे. भुर्दंड बसत असल्याने तिकीट आरक्षण रद्द करणे गरजेचे आहे.

- सागर राऊत, बल्लारपूर

-------

कोरोनाने लोकल रेल्वे बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना अडचण जात आहे. विशेष रेल्वे सुरु केल्या असून त्याची तिकीट आरक्षणाची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे.

- राकेश कांबळे, बल्लारपूर