शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST

चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्बंध कमी करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात विशेष रेल्वे धावत आहेत. ...

चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्बंध कमी करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात विशेष रेल्वे धावत आहेत. परंतु, या रेल्वेसाठी केवळ तिकीट आरक्षित केलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना १५० रुपये अतिरिक्त देऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी जवळचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

मार्च महिन्यामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. पहिल्यांदाच सर्व रेल्वे सेवा बंद करण्यात आली. सुमारे पाच ते सहा महिन्यानंतर विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. परंतु, अद्यापही लोकल तसेच अन्य रेल्वे सुरु करण्यात आल्या नाही.

त्यामुळे रेल्वेने जवळचा प्रवास करायचा असेल तरी विशेष रेल्वेचाच वापर करावा लागत आहे. या रेल्वेमध्ये स्थानकावरील स्पॅाट तिकीट देणे बंद आहे. प्रवाशांना एक दिवसाअगोदर ॲानलाईन किंवा स्थानकावर जाऊन तिकीट आरक्षित करणे गरजेचे आहे. परंतु, यासाठी प्रवाशांना दीडशे रुपये अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही लूट थांबवण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

बॉक्स

आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी

कोरोनाच्या पूर्वी रेल्वेच्या १६० फेऱ्या व्हायच्या. मात्र कोरोनाने केवळ विशेष ट्रेन सुरु असून २० ट्रेनच्या ४० फेऱ्या होत आहे. परंतु, यासाठी केवळ आरक्षित तिकीट घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त स्पॉट तिकीट देणे बंद आहे.

रेल्वेने वर्धा, नागपूर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. परंतु, आता या प्रवाशांसाठी लोकल ट्रेन नसल्याने त्यांना विशेष रेल्वेनेच प्रवास करावा लागत आहे. मात्र त्यासाठी १५० रुपये अतिरिक्त द्यावे लागत आहे. त्यामुळे आरक्षणाची सक्ती बंद करावी, अशी मागणी आहे.

बॉक्स

तिकिटात फरक किती ?

रेल्वेचे तिकीट कमी असल्याचे अनेकजण रेल्वेने प्रवास करायचे. मात्र आता केवळ विशेष रेल्वे सुरु असून दीडशे रुपये अतिरिक्त देऊन प्रवास करावा लागत आहे.

बॉक्स

जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे

नवजीवन एक्स्प्रेस

तामिळनाडू एक्स्प्रेस,

जीटी एक्स्प्रेस,

हमसफर एक्स्प्रेस, सिकंदराबाद एक्स्प्रेस,

दक्षिण रेल्वे,

नवजीवन एक्स्प्रेस,

तामिळनाडू एक्स्प्रेस,

तेलंगणा एक्स्प्रेस

बॉक्स

प्रवाशी म्हणतात....

वर्धा, नागपूर येथे जाण्यासाठी प्रवाशांना रेल्वे सोयीची होती. मात्र आता केवळ विशेष रेल्वे सुरु असून प्रवाशांना १५० रुपये अतिरिक्त देऊन तिकीट आरक्षित करावी लागत आहे. भुर्दंड बसत असल्याने तिकीट आरक्षण रद्द करणे गरजेचे आहे.

- सागर राऊत, बल्लारपूर

-------

कोरोनाने लोकल रेल्वे बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना अडचण जात आहे. विशेष रेल्वे सुरु केल्या असून त्याची तिकीट आरक्षणाची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे.

- राकेश कांबळे, बल्लारपूर