शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST

कोरोनामुळे मागील वर्षीच्या इयत्तेतील गुण तसेच सुरू असलेल्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन याद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत ...

कोरोनामुळे मागील वर्षीच्या इयत्तेतील गुण तसेच सुरू असलेल्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन याद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल मोठ्या प्रमाणात लागला आहे. सर्वच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले; परंतु, काही विद्यार्थ्यी असंतुष्ट दिसत आहेत. मला कमी आणि त्याला कसे जास्त, अशी आपआपसांत चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

परीक्षा नाही आणि पूनर्मूल्यांकनही नाही

कोरोनामुळे २०२०-२१ व त्यानंतर २१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गुणांकनाबाबत असमाधान आहे. अशांना पुनर्मूल्यांकनाचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही.

बॉक्स

मी त्याच्यापेक्षा हुशार मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?

बारावी हा विद्यार्थ्यांचा आयुष्याचा टर्निंग पाॅईंट समजला जातो. त्यामुळे विद्यार्थी बारावीसाठी कसून अभ्यास करत असतात तसेच त्यानंतर ज्या अभ्यासक्रमांची निवड करणार आहेत. त्याची तयारी करत असतात परंतु, यंदा बारावीची परीक्षाविनाच पास करण्यात आले आहे. त्यामुळे कोणाला कमी तर कोणाला अधिक गुण मिळाले आहेत. अशावेळी हुशार विद्यार्थी माझ्यापेक्षा तुला जास्त गुण कसे मिळाले, असा प्रश्न विचारताना दिसून येत आहेत.

बॉक्स

निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...

परीक्षा न घेताच मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. प्रत्येकालाच भरघोस गुण मिळाले आहे. मात्र, अशा मूल्यांकनावरून विद्यार्थ्यांची खरी क्षमता कळू शकत नाही.

रूपेश कोसनकार पालक

------

ऑनलाईन शिक्षण सुरू होते तरी हुशार विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास केला. याव्यतिरिक्त ज्या उनाड मुलांनी अभ्यास केला नाही, त्यांनासुद्धा या पद्धतीने चांगले गुण मिळाल्याने हुशार मुलांचे नुकसान झाले.

प्रशांत रायपुरे, पालक

------

विद्यार्थी म्हणतात...

ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने व कॉलेज बंद असल्याने अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळाला. प्रामाणिक अभ्यास केला; परंतु, परीक्षाच झाली नाही. त्यामुळे स्वत:ची क्षमताच कळू शकली नाही.

- संजना परमार, विद्यार्थी

बारावीत सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले आहेत. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी गोंधळ निर्माण झाला आहे. सगळ्यांनाच समान गुण असल्याने हुशार विद्यार्थी गोंधळात आहे.

रंजू नागापुरे, विद्यार्थी