शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST

कोरोनामुळे मागील वर्षीच्या इयत्तेतील गुण तसेच सुरू असलेल्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन याद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत ...

कोरोनामुळे मागील वर्षीच्या इयत्तेतील गुण तसेच सुरू असलेल्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन याद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल मोठ्या प्रमाणात लागला आहे. सर्वच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले; परंतु, काही विद्यार्थ्यी असंतुष्ट दिसत आहेत. मला कमी आणि त्याला कसे जास्त, अशी आपआपसांत चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

परीक्षा नाही आणि पूनर्मूल्यांकनही नाही

कोरोनामुळे २०२०-२१ व त्यानंतर २१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गुणांकनाबाबत असमाधान आहे. अशांना पुनर्मूल्यांकनाचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही.

बॉक्स

मी त्याच्यापेक्षा हुशार मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?

बारावी हा विद्यार्थ्यांचा आयुष्याचा टर्निंग पाॅईंट समजला जातो. त्यामुळे विद्यार्थी बारावीसाठी कसून अभ्यास करत असतात तसेच त्यानंतर ज्या अभ्यासक्रमांची निवड करणार आहेत. त्याची तयारी करत असतात परंतु, यंदा बारावीची परीक्षाविनाच पास करण्यात आले आहे. त्यामुळे कोणाला कमी तर कोणाला अधिक गुण मिळाले आहेत. अशावेळी हुशार विद्यार्थी माझ्यापेक्षा तुला जास्त गुण कसे मिळाले, असा प्रश्न विचारताना दिसून येत आहेत.

बॉक्स

निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...

परीक्षा न घेताच मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. प्रत्येकालाच भरघोस गुण मिळाले आहे. मात्र, अशा मूल्यांकनावरून विद्यार्थ्यांची खरी क्षमता कळू शकत नाही.

रूपेश कोसनकार पालक

------

ऑनलाईन शिक्षण सुरू होते तरी हुशार विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास केला. याव्यतिरिक्त ज्या उनाड मुलांनी अभ्यास केला नाही, त्यांनासुद्धा या पद्धतीने चांगले गुण मिळाल्याने हुशार मुलांचे नुकसान झाले.

प्रशांत रायपुरे, पालक

------

विद्यार्थी म्हणतात...

ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने व कॉलेज बंद असल्याने अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळाला. प्रामाणिक अभ्यास केला; परंतु, परीक्षाच झाली नाही. त्यामुळे स्वत:ची क्षमताच कळू शकली नाही.

- संजना परमार, विद्यार्थी

बारावीत सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले आहेत. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी गोंधळ निर्माण झाला आहे. सगळ्यांनाच समान गुण असल्याने हुशार विद्यार्थी गोंधळात आहे.

रंजू नागापुरे, विद्यार्थी