शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST

कोरोनामुळे मागील वर्षीच्या इयत्तेतील गुण तसेच सुरू असलेल्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन याद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत ...

कोरोनामुळे मागील वर्षीच्या इयत्तेतील गुण तसेच सुरू असलेल्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन याद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल मोठ्या प्रमाणात लागला आहे. सर्वच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले; परंतु, काही विद्यार्थ्यी असंतुष्ट दिसत आहेत. मला कमी आणि त्याला कसे जास्त, अशी आपआपसांत चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

परीक्षा नाही आणि पूनर्मूल्यांकनही नाही

कोरोनामुळे २०२०-२१ व त्यानंतर २१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गुणांकनाबाबत असमाधान आहे. अशांना पुनर्मूल्यांकनाचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही.

बॉक्स

मी त्याच्यापेक्षा हुशार मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?

बारावी हा विद्यार्थ्यांचा आयुष्याचा टर्निंग पाॅईंट समजला जातो. त्यामुळे विद्यार्थी बारावीसाठी कसून अभ्यास करत असतात तसेच त्यानंतर ज्या अभ्यासक्रमांची निवड करणार आहेत. त्याची तयारी करत असतात परंतु, यंदा बारावीची परीक्षाविनाच पास करण्यात आले आहे. त्यामुळे कोणाला कमी तर कोणाला अधिक गुण मिळाले आहेत. अशावेळी हुशार विद्यार्थी माझ्यापेक्षा तुला जास्त गुण कसे मिळाले, असा प्रश्न विचारताना दिसून येत आहेत.

बॉक्स

निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...

परीक्षा न घेताच मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. प्रत्येकालाच भरघोस गुण मिळाले आहे. मात्र, अशा मूल्यांकनावरून विद्यार्थ्यांची खरी क्षमता कळू शकत नाही.

रूपेश कोसनकार पालक

------

ऑनलाईन शिक्षण सुरू होते तरी हुशार विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास केला. याव्यतिरिक्त ज्या उनाड मुलांनी अभ्यास केला नाही, त्यांनासुद्धा या पद्धतीने चांगले गुण मिळाल्याने हुशार मुलांचे नुकसान झाले.

प्रशांत रायपुरे, पालक

------

विद्यार्थी म्हणतात...

ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने व कॉलेज बंद असल्याने अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळाला. प्रामाणिक अभ्यास केला; परंतु, परीक्षाच झाली नाही. त्यामुळे स्वत:ची क्षमताच कळू शकली नाही.

- संजना परमार, विद्यार्थी

बारावीत सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले आहेत. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी गोंधळ निर्माण झाला आहे. सगळ्यांनाच समान गुण असल्याने हुशार विद्यार्थी गोंधळात आहे.

रंजू नागापुरे, विद्यार्थी