शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांचें मानधन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:33 IST

देवाडा : राजुरा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन मागील दोन महिन्यांपासून रखडल्याने लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...

देवाडा : राजुरा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन मागील दोन महिन्यांपासून रखडल्याने लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकार पुरस्कृत संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ, वयोवृद्ध, अपंग इत्यादी लोककल्याणकारी योजना शासनाने सुरू केल्या. परंतु, संबंधित लाभार्थ्यांचे मानधन दोन महिन्यांपासून मिळाले नसल्याने चूल पेटविणे कठीण झाले आहे. लाभार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी राजुरा येथे बँकेत जावे लागते. बँकांमध्ये गेले तर पैसे आले नाहीत, असे उत्तर दिले जाते. तहसील कार्यालयात जाऊन विचारा असे म्हटले तर नाईलाजाने आपल्या घरी रिकाम्या हाताने परत यावे लागते. महिन्यात दोन-चार चकरा माराव्या लागतात. मात्र, निराधार लाभार्थ्यांचे मानधन काही बँकेत जमा केले जात नाही. विशेष म्हणजे, शासनाकडून मिळत असलेल्या तुटपुंज्या रकमेच्या भरवशावर लाभार्थ्यांना महिनाभर सांभाळून खर्च करावा लागतो. मात्र, दोन महिन्यांचे मानधन मिळेल व पोळा सण साजरा करता येईल, असे लाभार्थ्यांना वाटले होते. परंतु तसे झाले नाही. उसनवारी करून दवाखाना, औषधोपचार करावा लागत आहे. निराधारांची ही अडचण दूर करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.