शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

अहो, कुणी कर्ज देता का कर्ज?

By admin | Updated: November 11, 2015 00:39 IST

नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे,...

बेरोजगारांचा टाहो : बँकांकडून केली जाते थट्टागुंजेवाही : नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी पंतप्रधान रोजगार योजनेसह अनेक योजना अंमलात आल्या. प्रत्यक्षात मात्र या योजना बेरोजगार तरुणांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणारे सिंदेवाही तालुक्यातील अनेक बेरोजगार बँकांच्या पायऱ्या झिजवून थकलेले आहेत. मात्र त्यांची वनवन भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘अहो, कुणी कर्ज देता का कर्ज’ असा टाहो बेरोजरागार फोडत आहेत. जास्तीत जास्त लघु उद्योजकांनी व सुशिक्षित बेरोजगारांनी शासनाच्या विविध योजनेखाली कर्ज घेवून स्वावलंबी व्हावे तसेच शासनाचे निर्देश असताना काही बँका अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणामुळे कारागिर व सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज मिळण्यास जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. तसेच बँकेचे उंबरे झिजवावे लागत आहेत. शासनाने सुशिक्षित बेरोरजगारांसाठी अनेक योजना शासनाने अंमलात आणल्या. बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी बँकेचे कर्ज घेवून स्वावलंबी व्हावे व सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा मुळ उद्देश आहे.परंतु या योजनेकरिता व कर्जाकरिता लागणारी कागदपत्रे आणि मंजुर करून घेण्याकरिता संबंधितांना द्यावी लागणारी पाच टक्के रक्कम आणि पायपीट यातच सुशिक्षितच बेरोजगार व कारागीर थकून जात आहेत. संबंधीत अधिकारी लाभार्थी निवडून मोठ्या लाभार्थ्यांना एक ते दोन लाख, मध्यम ५० ते ६० हजार, अधिक गरीब लाभार्थ्याला २० ते ३५ हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. दुसरे कोणतेही साधन नसल्याने गरीब लाभार्थ्यांना एक लाख रुपयाची अपेक्षा असतानाही २० ते ३५ हजार रुपयापर्यंत कर्ज घेण्यासाठी तयार लाभार्थ्यांना जवळजवळ सहा ते सात महिन्यांपर्यंत चकरा माराव्या लागतात. अडवणुकीचे धोरण अवलंबविणाऱ्या बँकांकडून सबब पुढे करून सुशिक्षित बेरोजगारांना व कारागीरांना त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार बंद करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)