शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

अहो, कुणी कर्ज देता का कर्ज?

By admin | Updated: November 11, 2015 00:39 IST

नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे,...

बेरोजगारांचा टाहो : बँकांकडून केली जाते थट्टागुंजेवाही : नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी पंतप्रधान रोजगार योजनेसह अनेक योजना अंमलात आल्या. प्रत्यक्षात मात्र या योजना बेरोजगार तरुणांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणारे सिंदेवाही तालुक्यातील अनेक बेरोजगार बँकांच्या पायऱ्या झिजवून थकलेले आहेत. मात्र त्यांची वनवन भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘अहो, कुणी कर्ज देता का कर्ज’ असा टाहो बेरोजरागार फोडत आहेत. जास्तीत जास्त लघु उद्योजकांनी व सुशिक्षित बेरोजगारांनी शासनाच्या विविध योजनेखाली कर्ज घेवून स्वावलंबी व्हावे तसेच शासनाचे निर्देश असताना काही बँका अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणामुळे कारागिर व सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज मिळण्यास जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. तसेच बँकेचे उंबरे झिजवावे लागत आहेत. शासनाने सुशिक्षित बेरोरजगारांसाठी अनेक योजना शासनाने अंमलात आणल्या. बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी बँकेचे कर्ज घेवून स्वावलंबी व्हावे व सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा मुळ उद्देश आहे.परंतु या योजनेकरिता व कर्जाकरिता लागणारी कागदपत्रे आणि मंजुर करून घेण्याकरिता संबंधितांना द्यावी लागणारी पाच टक्के रक्कम आणि पायपीट यातच सुशिक्षितच बेरोजगार व कारागीर थकून जात आहेत. संबंधीत अधिकारी लाभार्थी निवडून मोठ्या लाभार्थ्यांना एक ते दोन लाख, मध्यम ५० ते ६० हजार, अधिक गरीब लाभार्थ्याला २० ते ३५ हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. दुसरे कोणतेही साधन नसल्याने गरीब लाभार्थ्यांना एक लाख रुपयाची अपेक्षा असतानाही २० ते ३५ हजार रुपयापर्यंत कर्ज घेण्यासाठी तयार लाभार्थ्यांना जवळजवळ सहा ते सात महिन्यांपर्यंत चकरा माराव्या लागतात. अडवणुकीचे धोरण अवलंबविणाऱ्या बँकांकडून सबब पुढे करून सुशिक्षित बेरोजगारांना व कारागीरांना त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार बंद करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)