शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

जिवतीतील कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी

By admin | Updated: February 1, 2015 22:54 IST

अतिदुर्गम व मागास समजल्या जाणाऱ्या जीवती तालुक्यातील शासकीय कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी न राहता ‘अप-डाऊन’ करीत असल्याने तालुक्यातील विकासाला खीळ बसली आहे.

जिवती: अतिदुर्गम व मागास समजल्या जाणाऱ्या जीवती तालुक्यातील शासकीय कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी न राहता ‘अप-डाऊन’ करीत असल्याने तालुक्यातील विकासाला खीळ बसली आहे. तालुक्याच्या निर्मितीला १३ वर्षे लोटली आहेत. मात्र जिवती तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात विकास कामे झाली नाहीत. तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयातील विविध विभागातील पदे रिक्त आहेत. त्यातच कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. यामुळे विकासाला गती मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून जनतेला नियमित सेवा द्यावी, वेळेवर जनतेची कामे व्हावीत, यासाठी शासनाने प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश जारी केले असले तरी कुठल्याच विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची स्थिती आहे. याला कार्यालयातील मुख्य अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप होत आहेत. स्वत: अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने कर्मचारी मुख्यालयी कसे राहतील, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तालुक्यातील महसूल विभागात तहसीलदार, अन्न पुरवठा अधिकारी व एक-दोन लिपीक व शिपाई वगळता अन्य कोणतेच कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. बांधकाम विभाग, वनविभाग, कृषी विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पंचायत समिती, तलाठी व ग्रामसेवकांची कार्यालये असली तरी कोणत्याच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे जनतेची कामे वेळेवर कधीच होत नाहीत. परिणामी नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. अनेक अधिकारी कर्मचारी तर मिटींगच्या नावाखाली वारंवार सुट्या घेतात. आठवडा-आठवडा कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबून राहतात. आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य केंद्रातही हीच परिस्थिती आहे. कधी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही तर कधी परिचारिका बेपत्ता असते. हा प्रकार नेहमीचाच असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात शिक्षण विभागही मागे नाही. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्यासह शिक्षकही मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवितात. परिणामी तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता ढासाळली आहे. महिनोगंती अधिकारी शाळा भेटीसाठी येत नाहीत. त्यामुळे शिक्षकांवर कुणाचेही नियंत्रण नाही. ते शिकविण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. डाक पोहोचविणे, मिटिंग इत्यादी कामाचा बहाणा करुन निघून जातात. त्यामुळे अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता येत नाही, कधी पालक भेटीही होत नाही. (तालुका प्रतिनिधी)