शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

राजुरा तालुक्यातील गायरान होत आहे नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST

गुरे चराईची मोठी समस्या : वेकोलीने नाले वळविल्याने चाऱ्याची उगवण क्षमता खुंटली नितिन मुसळे सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या ...

गुरे चराईची मोठी समस्या

:

वेकोलीने नाले वळविल्याने चाऱ्याची उगवण क्षमता खुंटली

नितिन मुसळे

सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या विस्तारीकरणामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी अधिग्रहीत केल्या गेल्या आहेत. शासकीय जमिनी अतिक्रमणाने ग्रासल्या आहेत. वन जमिनीवरसुद्धा अतिक्रमण करून तेथील हिरवळ नष्ट केल्या जात असल्यामुळे तसेच वेकोलीने परिसरातील नाले आपल्या सोईनुसार वळविल्यामुळे पाण्याअभावी गवताची किंवा हिरव्या चाऱ्याची उगवण क्षमता कमी होऊन तालुक्यातील गायरान नामशेष होत आहेत.

शेतकऱ्यांपुढे गुरे चाराईची नवी समस्या उद्‌भवली आहे.

राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध असून, तालुक्याचे नावलौकिक होत असले तरी या वेकोलीच्या विस्तारीकरणामुळे राजुरा तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांना बळी पडावे लागत आहे; परंतु यात मुक्या जनावरांनासुद्धा नाहक बळी जाण्याची वेळ येत आहे. अशाच औद्योगिकरणाची एक समस्या म्हणजे परिसरातील जमिनीचे होत असलेले अधिग्रहण. ज्यामुळे परिसरातील जनावरांना खाण्यासाठी चारा व पिण्यासाठी पाण्याची भटकंती करावी लागत असून, परिसरातील गायरान हद्दपार होत असल्याचे दिसून येत आहे.

वेकोलीने मोठ्या प्रमाणात जमिनी अधिग्रहीत केल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे गावठाण विस्ताराची गरज भासत आहे. प्रत्येकाला राहायला घर हवंच म्हणून गावात मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण केल्या जात आहे. अतिक्रमिकांनी शेकडो हेक्टर जमीन गिळंकृत केली आहे.

परिसरातीत मोठ्या प्रमाणात वन जमिनी होत्या; परंतु बऱ्याच दिवसांपासून या वन जमिनीवर कास्त करून त्या जमिनी धनदांडग्यांनी बळकावून घेतल्या आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने उभे होत असल्यामुळे मोकळ्या जमिनीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील जनावरांकरिता चराईसाठी गायराने शिल्लक राहिली नाही. वेकोली परिसरात वेकोलीने आपल्या सोईनुसार नाले वळविल्यामुळे संपूर्ण नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे परिसरात पाण्याची पातळी अत्यंत खालावल्याने या ठिकाणी गवत किंवा हिरव्या चाऱ्याची उगवण क्षमता नष्ट झाली आहे.

बॉक्स

शहरी भागात कचराच जनावरांचा चारा

शहरी भागात तर जनावरांना चारा मिळत नसल्यामुळे ते शहरात फेकलेल्या कचऱ्यावर जगत आहेत. कचऱ्यातील प्लास्टिक व कागद ही जनावरे मोठ्या प्रमाणात खात असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिक खाल्ल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत असला तरी याकडे लक्ष द्यायला कुणाला सवड नसल्याचे दिसते.