शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा तालुक्यातील गायरान होत आहे नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST

गुरे चराईची मोठी समस्या : वेकोलीने नाले वळविल्याने चाऱ्याची उगवण क्षमता खुंटली नितिन मुसळे सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या ...

गुरे चराईची मोठी समस्या

:

वेकोलीने नाले वळविल्याने चाऱ्याची उगवण क्षमता खुंटली

नितिन मुसळे

सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या विस्तारीकरणामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी अधिग्रहीत केल्या गेल्या आहेत. शासकीय जमिनी अतिक्रमणाने ग्रासल्या आहेत. वन जमिनीवरसुद्धा अतिक्रमण करून तेथील हिरवळ नष्ट केल्या जात असल्यामुळे तसेच वेकोलीने परिसरातील नाले आपल्या सोईनुसार वळविल्यामुळे पाण्याअभावी गवताची किंवा हिरव्या चाऱ्याची उगवण क्षमता कमी होऊन तालुक्यातील गायरान नामशेष होत आहेत.

शेतकऱ्यांपुढे गुरे चाराईची नवी समस्या उद्‌भवली आहे.

राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध असून, तालुक्याचे नावलौकिक होत असले तरी या वेकोलीच्या विस्तारीकरणामुळे राजुरा तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांना बळी पडावे लागत आहे; परंतु यात मुक्या जनावरांनासुद्धा नाहक बळी जाण्याची वेळ येत आहे. अशाच औद्योगिकरणाची एक समस्या म्हणजे परिसरातील जमिनीचे होत असलेले अधिग्रहण. ज्यामुळे परिसरातील जनावरांना खाण्यासाठी चारा व पिण्यासाठी पाण्याची भटकंती करावी लागत असून, परिसरातील गायरान हद्दपार होत असल्याचे दिसून येत आहे.

वेकोलीने मोठ्या प्रमाणात जमिनी अधिग्रहीत केल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे गावठाण विस्ताराची गरज भासत आहे. प्रत्येकाला राहायला घर हवंच म्हणून गावात मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण केल्या जात आहे. अतिक्रमिकांनी शेकडो हेक्टर जमीन गिळंकृत केली आहे.

परिसरातीत मोठ्या प्रमाणात वन जमिनी होत्या; परंतु बऱ्याच दिवसांपासून या वन जमिनीवर कास्त करून त्या जमिनी धनदांडग्यांनी बळकावून घेतल्या आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने उभे होत असल्यामुळे मोकळ्या जमिनीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील जनावरांकरिता चराईसाठी गायराने शिल्लक राहिली नाही. वेकोली परिसरात वेकोलीने आपल्या सोईनुसार नाले वळविल्यामुळे संपूर्ण नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे परिसरात पाण्याची पातळी अत्यंत खालावल्याने या ठिकाणी गवत किंवा हिरव्या चाऱ्याची उगवण क्षमता नष्ट झाली आहे.

बॉक्स

शहरी भागात कचराच जनावरांचा चारा

शहरी भागात तर जनावरांना चारा मिळत नसल्यामुळे ते शहरात फेकलेल्या कचऱ्यावर जगत आहेत. कचऱ्यातील प्लास्टिक व कागद ही जनावरे मोठ्या प्रमाणात खात असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिक खाल्ल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत असला तरी याकडे लक्ष द्यायला कुणाला सवड नसल्याचे दिसते.