शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

जिवतीवासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:22 IST

जिवती शहरात सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना या दूषित पाण्यामुळे शरिराला खाज सुटली असून यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही याकडे नगर पंचायत दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देनालीद्वारे विहिरीत पाण्याचा भरणा : नालीत मृत जनावरे

शंकर चव्हाण/ संघरक्षीत तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : जिवती शहरात सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना या दूषित पाण्यामुळे शरिराला खाज सुटली असून यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही याकडे नगर पंचायत दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून जिवतीसाठी जलस्वराज्य योजनेअंतर्गत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी शहराच्या बाहेर विहीर आहे. या विहिरीत सध्या तलावातील पाणी नालीद्वारे सोडण्यात येत आहे. ज्या नालीद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. ती नाली पूर्णत: उघडी असून या नालीत मृत जनावरांचे मृतदेह आढळून आले आहे. एवढेच नाही तर अनेक जनावरे या नालीतून ये जा करतात. नालीत बसतात आणि याच नालीतून तलावातील गढूळ पाणी विहिरीत सोडले जाते आणि नंतर विहिरीतून नळाद्वारे नागरिकांपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. मात्र नागरिकांपर्यंत येत असलेले पाणी पूर्णत: गढूळ असून ते पाणी नागरिकांना वापरण्यायोग्य नाही. या दूषित पाण्याने अनेकांना शरिराला खाज सुटली आहे. ही बाब अनेकांनी नगर पंचायतीला लक्षात आणून दिली असली तरी याकडे नगरपंचायतिचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.ज्या नालीतून पाणीपुरवठा केला जात आहे, त्या नालीत चक्क जनावर मरून आहे. ही बाब न. प. च्या लक्षात का येत नाही, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.विकासाची भाषा करणारे नगरसेवक लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत तर या दूषित पाण्याने अनेकांना खाज सुटली असून दवाखान्यात दाखवावे लागत आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यातशहरात केवळ दूषित पाणी पुरवठाच नाही तर अनेक वार्डात रस्ते नाल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी जागोजागी पाहायला मिळते. सध्या पावसाळा सुरू असून नाल्याअभावी पाणी वार्डातच साचून असते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत असून जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. वार्डात पाणी साचून असल्याने लोकांना ये-जा करणे कठीण झाले आहे.जिवती शहराला दूषित पाणी पुरवठा होत आहे, ही शोकांतिका आहे. अनेकदा सांगूनही नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरात अनेक समस्या असून त्या समस्या सोडविण्यात नगरपंचायतीला अपयश आले आहे.-विकास डसाने, नागरिक, जिवतीनळयोजनेद्वारे येत असलेले पाणी पूर्णत: खराब येत असून मला या दूषित पाण्याने खूप खाज सुटली. शेवटी मला दवाखान्यात जावे लागले. ही बाब न. प. ला लक्षात आणून दिली. पण त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे- राजू जाधव, नागरिक, जिवती