शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

जिवतीवासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:22 IST

जिवती शहरात सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना या दूषित पाण्यामुळे शरिराला खाज सुटली असून यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही याकडे नगर पंचायत दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देनालीद्वारे विहिरीत पाण्याचा भरणा : नालीत मृत जनावरे

शंकर चव्हाण/ संघरक्षीत तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : जिवती शहरात सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना या दूषित पाण्यामुळे शरिराला खाज सुटली असून यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही याकडे नगर पंचायत दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून जिवतीसाठी जलस्वराज्य योजनेअंतर्गत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी शहराच्या बाहेर विहीर आहे. या विहिरीत सध्या तलावातील पाणी नालीद्वारे सोडण्यात येत आहे. ज्या नालीद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. ती नाली पूर्णत: उघडी असून या नालीत मृत जनावरांचे मृतदेह आढळून आले आहे. एवढेच नाही तर अनेक जनावरे या नालीतून ये जा करतात. नालीत बसतात आणि याच नालीतून तलावातील गढूळ पाणी विहिरीत सोडले जाते आणि नंतर विहिरीतून नळाद्वारे नागरिकांपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. मात्र नागरिकांपर्यंत येत असलेले पाणी पूर्णत: गढूळ असून ते पाणी नागरिकांना वापरण्यायोग्य नाही. या दूषित पाण्याने अनेकांना शरिराला खाज सुटली आहे. ही बाब अनेकांनी नगर पंचायतीला लक्षात आणून दिली असली तरी याकडे नगरपंचायतिचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.ज्या नालीतून पाणीपुरवठा केला जात आहे, त्या नालीत चक्क जनावर मरून आहे. ही बाब न. प. च्या लक्षात का येत नाही, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.विकासाची भाषा करणारे नगरसेवक लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत तर या दूषित पाण्याने अनेकांना खाज सुटली असून दवाखान्यात दाखवावे लागत आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यातशहरात केवळ दूषित पाणी पुरवठाच नाही तर अनेक वार्डात रस्ते नाल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी जागोजागी पाहायला मिळते. सध्या पावसाळा सुरू असून नाल्याअभावी पाणी वार्डातच साचून असते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत असून जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. वार्डात पाणी साचून असल्याने लोकांना ये-जा करणे कठीण झाले आहे.जिवती शहराला दूषित पाणी पुरवठा होत आहे, ही शोकांतिका आहे. अनेकदा सांगूनही नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरात अनेक समस्या असून त्या समस्या सोडविण्यात नगरपंचायतीला अपयश आले आहे.-विकास डसाने, नागरिक, जिवतीनळयोजनेद्वारे येत असलेले पाणी पूर्णत: खराब येत असून मला या दूषित पाण्याने खूप खाज सुटली. शेवटी मला दवाखान्यात जावे लागले. ही बाब न. प. ला लक्षात आणून दिली. पण त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे- राजू जाधव, नागरिक, जिवती