शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींचे अनुदान तातडीने द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST

भद्रावती : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विहिरींचे बांधकाम पूर्ण केले आहे. शासनाने विहिरींसाठी अनुदान जाहीर केले होते; मात्र अद्यापही अनुदान ...

भद्रावती : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विहिरींचे बांधकाम पूर्ण केले आहे. शासनाने विहिरींसाठी अनुदान जाहीर केले होते; मात्र अद्यापही अनुदान मिळाले नसल्याची ओरड आहे.

खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता

राजोली : गावातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत अहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

ग्रामसभेसाठी जनजागृती करणे गरजेचे

ब्रह्मपुरी : ग्रामीण भागात ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेला ग्रामस्थ अनेकवेळा पाठ फिरवतात. त्यामुळे गावातील निर्णय त्यांना माहीतच पडत नाहीत. ग्रामीण भागामध्ये ग्रामसभेसाठी जनजागृती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने केली जात आहे.

वजनाच्या नावाखाली दगडांचा वापर

जिवती : ग्राहकांना वस्तू मोजून देणे व वजनानुसार बरोबर पैसे घेणे, ही व्यवहाराची पद्धत आहे. पण पैसे बरोबर देऊनही वजनात तूट निर्माण होण्याच्या प्रकारामुळे ग्राहक लुटले जात आहेत. लहान-मोठ्या विक्रेत्यांकडून सर्रासपणे अशी लूट सुरू असून, वजन म्हणून तेवढ्या वजनाचे दगड दिसून येतात. यात अनेकदा ग्राहकांची फसगत होत आहे.

जात प्रमाणपत्र प्रकरणे प्रलंबित

जिवती : तालुक्यातील काही नागरिक मागील ४० ते ५० वर्षांपासून या ठिकाणी राहतात; मात्र अद्यापही अनेकांकडे जात प्रमाणपत्र नाही. प्रमाणपत्र मिळावे, यासाठी कागदपत्रांसह अर्ज सादर केले. मात्र, प्रकरणांचा निपटारा झाला नाही.

महामार्ग बनले मृत्यूमार्ग

कोरपना : तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यातील एकही रस्ता आजघडीला खड्ड्यांवाचून नाही. या मार्गावरून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

हिरापूर मार्गावरील खड्डे धोकादायक

नांदाफाटा : नांदाफाटा ते वणीकडे जाणाऱ्या आवारपूर-हिरापूर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. रस्त्याच्या दुरूस्तीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

प्लास्टिक पिशव्यांना आळा घाला

राजुरा : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात़. या पिशव्या कुठेही टाकून देण्याचे प्रकार वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे़.

एटीएममध्ये सुरक्षारक्षक नियुक्त करावे

वरोरा : शहरातील विविध भागांमध्ये बँकांनी एटीएम सेवा सुरू केली आहे. ग्राहक याचा लाभसुद्धा घेत आहे. मात्र काही ठिकाणी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकच नसल्याचे दिसून येत आहे. भविष्यात काही धोका झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे.

धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावले

भद्रावती : माजरी मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जात आहे. अनेक वाहने उघड्यावर कोळशाची वाहतूक करीत असल्याने या रस्त्यावर कोळशाच्या धुळीचा थर साचतो. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असून, अनेकांना श्वसनाचा आजारही जडला आहे. त्यामुळे कोळसा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.