शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

ग्रामसेवकांनो, शेतकऱ्यांबाबत खबरदारी घ्याच

By admin | Updated: January 19, 2016 00:41 IST

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषिक्षेत्राचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे.

कल्पना बोरकर यांचा सल्ला : बल्लारपुरात कृषी विभागाची आढावा सभाबल्लारपूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषिक्षेत्राचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. शेती उत्पादनात वाढ होणे क्रमप्राप्त आहे. यासाठी कृषी क्षेत्रात नियोजनपूर्वक विकासाची गरज आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या योजना सांगून त्याची अंमलबजावणी करावी, ग्रामसेवकांनो, शेतकऱ्याबाबत खबरदारी घ्याच, असा निर्वाणीचा सल्ला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी सभापती कल्पना बोरकर यांनी शनिवारी येथील कृषी विभागाच्या आढावा सभेत दिला.बल्लारपूर पंचायत समितीच्या कृषी विभागाने येथील सभागृहात आढावा सभा घेतली. सभेला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी यांच्याकडून कृषी विभागाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.सभेच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती अनेकश्वर मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरु, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रविण देशमुख, सहायक गट विकास अधिकारी संध्या दिकोंडवार, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, किन्ही येथील सरपंच जीवनकला आलाम यांची उपस्थिती होती. दरम्यान, कल्पना बोरकर यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करुन चंद्रकला बोबाटे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजनाची माहिती घेण्यात आली. विशेष म्हणजे, सदर योजनेतील लाभार्थ्यांचे सन २०१५-१६ चे लक्षांक ८० शेतकरी असताना प्रत्यक्षात केवळ १८ शेतकऱ्यांनीच अर्ज सादर केल्याने प्रविण देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. लक्षांक पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी पंचायत कृषी विभागाला दिले. तालुक्यातील ६ हजार ३०८ शेतकऱ्यांची संख्या असताना लाभार्थी शेतकरी कसे मिळत नाही, असेही त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना सुनावले. संचालन पंचायत कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी केले. आभार पंचायत विस्तार अधिकारी अमोल उघडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)