शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांनो, शेतकऱ्यांबाबत खबरदारी घ्याच

By admin | Updated: January 19, 2016 00:41 IST

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषिक्षेत्राचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे.

कल्पना बोरकर यांचा सल्ला : बल्लारपुरात कृषी विभागाची आढावा सभाबल्लारपूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषिक्षेत्राचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. शेती उत्पादनात वाढ होणे क्रमप्राप्त आहे. यासाठी कृषी क्षेत्रात नियोजनपूर्वक विकासाची गरज आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या योजना सांगून त्याची अंमलबजावणी करावी, ग्रामसेवकांनो, शेतकऱ्याबाबत खबरदारी घ्याच, असा निर्वाणीचा सल्ला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी सभापती कल्पना बोरकर यांनी शनिवारी येथील कृषी विभागाच्या आढावा सभेत दिला.बल्लारपूर पंचायत समितीच्या कृषी विभागाने येथील सभागृहात आढावा सभा घेतली. सभेला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी यांच्याकडून कृषी विभागाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.सभेच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती अनेकश्वर मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरु, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रविण देशमुख, सहायक गट विकास अधिकारी संध्या दिकोंडवार, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, किन्ही येथील सरपंच जीवनकला आलाम यांची उपस्थिती होती. दरम्यान, कल्पना बोरकर यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करुन चंद्रकला बोबाटे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजनाची माहिती घेण्यात आली. विशेष म्हणजे, सदर योजनेतील लाभार्थ्यांचे सन २०१५-१६ चे लक्षांक ८० शेतकरी असताना प्रत्यक्षात केवळ १८ शेतकऱ्यांनीच अर्ज सादर केल्याने प्रविण देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. लक्षांक पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी पंचायत कृषी विभागाला दिले. तालुक्यातील ६ हजार ३०८ शेतकऱ्यांची संख्या असताना लाभार्थी शेतकरी कसे मिळत नाही, असेही त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना सुनावले. संचालन पंचायत कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी केले. आभार पंचायत विस्तार अधिकारी अमोल उघडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)