शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

ग्रामसेवकांनो, शेतकऱ्यांबाबत खबरदारी घ्याच

By admin | Updated: January 19, 2016 00:41 IST

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषिक्षेत्राचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे.

कल्पना बोरकर यांचा सल्ला : बल्लारपुरात कृषी विभागाची आढावा सभाबल्लारपूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषिक्षेत्राचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. शेती उत्पादनात वाढ होणे क्रमप्राप्त आहे. यासाठी कृषी क्षेत्रात नियोजनपूर्वक विकासाची गरज आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या योजना सांगून त्याची अंमलबजावणी करावी, ग्रामसेवकांनो, शेतकऱ्याबाबत खबरदारी घ्याच, असा निर्वाणीचा सल्ला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी सभापती कल्पना बोरकर यांनी शनिवारी येथील कृषी विभागाच्या आढावा सभेत दिला.बल्लारपूर पंचायत समितीच्या कृषी विभागाने येथील सभागृहात आढावा सभा घेतली. सभेला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी यांच्याकडून कृषी विभागाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.सभेच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती अनेकश्वर मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरु, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रविण देशमुख, सहायक गट विकास अधिकारी संध्या दिकोंडवार, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, किन्ही येथील सरपंच जीवनकला आलाम यांची उपस्थिती होती. दरम्यान, कल्पना बोरकर यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करुन चंद्रकला बोबाटे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजनाची माहिती घेण्यात आली. विशेष म्हणजे, सदर योजनेतील लाभार्थ्यांचे सन २०१५-१६ चे लक्षांक ८० शेतकरी असताना प्रत्यक्षात केवळ १८ शेतकऱ्यांनीच अर्ज सादर केल्याने प्रविण देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. लक्षांक पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी पंचायत कृषी विभागाला दिले. तालुक्यातील ६ हजार ३०८ शेतकऱ्यांची संख्या असताना लाभार्थी शेतकरी कसे मिळत नाही, असेही त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना सुनावले. संचालन पंचायत कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी केले. आभार पंचायत विस्तार अधिकारी अमोल उघडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)