शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ग्रामीण विद्यार्थ्यांनो स्पर्धेसाठी सक्षम व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:18 IST

शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात आमुलाग्र बदल होतो. अलिकडे बदलत्या शिक्षण पध्दतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. शिक्षणामुळे ज्ञानवंतच नव्हे तर सामाजिक भान जोपासणारी पिढी तयार व्हावी, याकरिता शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक सुविधांमध्ये वाढ

शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात आमुलाग्र बदल होतो. अलिकडे बदलत्या शिक्षण पध्दतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. शिक्षणामुळे ज्ञानवंतच नव्हे तर सामाजिक भान जोपासणारी पिढी तयार व्हावी, याकरिता शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. यामुळे शिक्षणापासून वंचित असणारी ग्रामीण भागातील मुले मुख्य प्रवाहात येऊ लागली आहेत. प्राथमिक शिक्षण दर्जेदार असेल तर विद्यार्थ्यांच्या जीवनावर दीर्घकालीन परिणाम होतो. जिल्ह्यातील शिक्षणाची परिस्थिती बदलत आहे. याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आता स्पर्धेसाठी सक्षम झाले पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती कृष्णा सहारे यांनी मकरसंक्रातीनिमित्त लोकमतशी बोलताना व्यक्त केले.बहुतेक पालकांचा कल कॉन्हेंट शिक्षणाकडे वाढू लागला आहे. मुलांवर अपेक्षांचे ओझे लादून आर्थिक क्षमता नसतानाही कॉन्हेंट संस्कृतीला बळी पडत आहेत. हा बदल लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षणाच्या पायाभुत सुविधांमध्ये वाढ केली आहे. ज्ञानसंरचनावाद या संकल्पनेवर शिक्षण विभागाने भर दिला असून मुलांच्या बौध्दिक प्रगतीसाठी उपक्रम राबविल्या जात आहे.विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ व्हावी, यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असते. स्पर्धेच्या युगातील विद्यार्थी अविरत टेंशनमध्ये असतात. अशावेळी त्यांना सकारात्मक विचाराचे बळ सातत्याने देणे पालकांचे कर्तव्य आहे. ते त्यांनीही पार पाडावे, असेही सहारे यांनी सांगितले.