शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

ग्राम सडक योजनेला निधी कमी पडू देणार नाही

By admin | Updated: January 25, 2016 01:28 IST

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात ३० हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्हयात या

चंद्रपूर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात ३० हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्हयात या वर्षी ७४ किलोमीटर तर पुढील वर्षी ९२ किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात येणार आहे. या योजनेतील रस्त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जिल्ह्यातील विविध विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज शनिवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार नाना शामकुळे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा पालक सचिव प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांचा दर्जा व गुणवत्ता उत्तम असावी यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा नियोजनांतर्गत निधी वाटपासाठी असलेली कोअर, नॉनकोअर मर्यादा शिथील करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. हुमन प्रकल्प लवकर सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बाबुपेठ उड्डाण पुलाची सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यासाठी त्यांनी नगर विकास खात्याच्या सचिवांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.या बैठकीत जलयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती, महानगर पालिका अंतर्गत विविध कामांचा आढावा, महानगरपालिका-नगरपालिका पायाभूत सोई-सुविधा विशेष निधी, बाबुपेठ उड्डाण पुल, दाताळा येथे म्हाडातर्फे ब्रिज बांधणे, जिल्हा वार्षिक योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प इत्यादी विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती प्राधान्याने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. दुरुस्तीसंदर्भातील शासन निर्णयामध्ये असलेल्या त्रुटी तत्काळ दूर कराव्यात अशा सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पालक सचिवांना दिल्या. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील २१८ गावांची निवड करण्यात आली असून या गावात ४ हजार २२९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर ८३१ कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित ३ हजार ८२७ कामे मार्चअखेर पूर्ण करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. जलयुक्त शिवारच्या पूर्ण झालेल्या कामातून १४ हजार ४७४ टिसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून ३ हजार १६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र झाले आहे. पुढील वर्षी २६३ गावांची निवड करण्यात येणार असून यामध्ये जनवन योजनेतील ५० गावांचा समावेश करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)