शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
3
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
4
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
5
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
6
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
7
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
8
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
9
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
10
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
12
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
13
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
14
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
15
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
16
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
17
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
18
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
19
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
20
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

ग्राम सडक योजनेला निधी कमी पडू देणार नाही

By admin | Updated: January 25, 2016 01:28 IST

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात ३० हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्हयात या

चंद्रपूर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात ३० हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्हयात या वर्षी ७४ किलोमीटर तर पुढील वर्षी ९२ किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात येणार आहे. या योजनेतील रस्त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जिल्ह्यातील विविध विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज शनिवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार नाना शामकुळे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा पालक सचिव प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांचा दर्जा व गुणवत्ता उत्तम असावी यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा नियोजनांतर्गत निधी वाटपासाठी असलेली कोअर, नॉनकोअर मर्यादा शिथील करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. हुमन प्रकल्प लवकर सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बाबुपेठ उड्डाण पुलाची सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यासाठी त्यांनी नगर विकास खात्याच्या सचिवांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.या बैठकीत जलयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती, महानगर पालिका अंतर्गत विविध कामांचा आढावा, महानगरपालिका-नगरपालिका पायाभूत सोई-सुविधा विशेष निधी, बाबुपेठ उड्डाण पुल, दाताळा येथे म्हाडातर्फे ब्रिज बांधणे, जिल्हा वार्षिक योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प इत्यादी विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती प्राधान्याने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. दुरुस्तीसंदर्भातील शासन निर्णयामध्ये असलेल्या त्रुटी तत्काळ दूर कराव्यात अशा सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पालक सचिवांना दिल्या. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील २१८ गावांची निवड करण्यात आली असून या गावात ४ हजार २२९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर ८३१ कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित ३ हजार ८२७ कामे मार्चअखेर पूर्ण करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. जलयुक्त शिवारच्या पूर्ण झालेल्या कामातून १४ हजार ४७४ टिसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून ३ हजार १६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र झाले आहे. पुढील वर्षी २६३ गावांची निवड करण्यात येणार असून यामध्ये जनवन योजनेतील ५० गावांचा समावेश करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)