शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

४१ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : तालुक्यात ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ५६ पैकी ४१ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागभीड : तालुक्यात ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ५६ पैकी ४१ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या. पुरेशी गणपूर्ती हे यामागील कारण आहे. परिणामी प्रथमच ग्रामसभेला सामोरे नवनियुक्त सरपंचांचा चांगलाच हिरमोड झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांना शिथिलता देण्यात आल्यानंतर दीड वर्षांनी प्रथमच ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी नागभीड तालुक्यात ग्रामसभा होणार होत्या. मात्र पुरेशा गणपूर्ती अभावी या ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या. नागभीड तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. सहा महिन्यांपूर्वी यातील ४३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या ग्रामपंचायतींच्या बहुतेक सरपंचांना ग्रामसभा विषयी उत्सुकता होती. यात २१ महिला सरपंचांचा ही समावेश होता.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामसभांचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरून त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची तरतुद आहे. मात्र कोरोनामुळे ग्रामसभा घेण्यास निर्बंध घालण्यात आले होते.

आता कोरोनाचे रूग्ण कमी झाल्यानंतर शासनाकडून अनेक बाबींवरील निर्बंध हटविण्यात आले. यात ग्रामसभांचा ही समावेश होता. विविध अटी आणि शर्तीचे पालन करून ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घ्याव्यात अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार या ग्रामसभा ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी होणार होत्या. मात्र पुरेशा गणपूर्ती अभावी या ग्रामसभा तहकूब कराव्या लागल्या. आता या तहकूब ग्रामसभा सप्टेंबर महिन्यात पार पडतील.

कोट

तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. सर्वच ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे आयोजन केले होते. यातील १५ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा परिपूर्ण गणपूर्ती झाल्याने संपन्न झाल्या. बाकीच्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा गणपूर्ती अभावी होऊ शकल्या नाही. त्या ७ दिवसांचे आत घेण्यात येतील.

- संजय पुरी, गटविकास अधिकारी नागभीड.