शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

ग्रामपंचायतींची तिजोरी रिकामी

By admin | Updated: January 6, 2016 01:05 IST

कारभार सांभाळण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत नावाची संस्था स्थापन केली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

अत्यल्प उत्पन्नात खर्च मात्र अवाढव्य : गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्षमंगेश भांडेकर चंद्रपूरकारभार सांभाळण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत नावाची संस्था स्थापन केली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, अत्यावश्यक सेवाही पुरविण्यास ग्रामपंचायती सक्षम नसल्याची गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची झाली आहे. ‘उत्पन्न कमी आणि खर्च जास्त’ असा प्रकार अनेक ग्रामपंचायतीत सुरू असल्याने जिल्ह्यातील ८३७ ग्रामपंचायतींच्या तिजोऱ्यात ठणठणाठ आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गावातील ग्रामपंचायतीला मोठे महत्त्व आहे. राज्य शासन विविध उपक्रम राबवून उपक्रमात भाग घेणाऱ्या व चांगले कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना लाखो रूपयांचा निधी देतो. तर गृह कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती आदींच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांकडून करवसूली करीत असते. मात्र उत्पन्न कमी आणि खर्चच जास्त असल्याने अनेक ग्रामपंचायतींजवळ आवश्यक सुविधा पुरविण्यासाठीही निधी शिल्लक नाही. गावात रस्ते बांधणे, गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे, सार्वजनिक स्वच्छता ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे, बाजार, जत्रा, उत्सव यांची व्यवस्था ठेवण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाला करावे लागते. या माध्यमातून लाखो रूपयांचा महसूल ग्रामपंचायतीला मिळत असते. मात्र या उत्पन्नानंतरही अनेक ग्रामपंचायतींचे भागत नसल्याची स्थिती आहे. केवळ मोठ्या ग्रामपंचायतींकडे निधीजिल्ह्यात ८३७ ग्रामपंचायती आहेत. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला जिल्ह्यातील ८३७ ग्रामपंचायतींकडे केवळ २ लाख २७ हजार १११ रूपयाचा निधी शिल्लक होता. वर्षभरात सर्व ग्रामपंचायतींना ८३ लाख ९० हजार ९५९ रूपयाचा महसूल मिळाला. यातून ५३ लाख १७ हजार ७७१ रूपयाचा निधी विविध कामांवर वर्षभरात खर्च झाला आहे. आता केवळ मोठ्या ग्रामपंचायतींकडे निधी शिल्लक असून लहान ग्रामपंचायतींच्या तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत. उत्पन्न कमी, खर्च जास्तअनेक ग्रामपंचायती उत्पन्न कमी असतानाही खर्च अधिक करीत असल्याने अत्यावश्यक सेवांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. पोंभुर्णा तालुक्यात ३१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना वार्षिक उत्पन्न ८७ हजार ९ रूपये मिळाले. मात्र यानंतरही ग्रामपंचायतींनी प्रारंभीच्या शिल्लक उत्पन्नातून ९३ हजार ४५ रूपयाचा खर्च केला आहे. तसेच कोरपना तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींना ७६ हजार ५६९ रूपये उत्पन्न मिळाले. या ग्रामपंचायतींनी ७८ हजार रूपयाचा खर्च केला आहे. थकीत करामुळे वाढला भारग्रामपंचायत प्रशासनाकडून दरवर्षी कर वसूली केली जाते. मात्र अनेक नागरिक वेळेवर कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकांकडे तीन ते चार वषाचे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाचे कर थकीत असते. मात्र अशा नागरिकांवर ग्रामपंचायत प्रशासनन बरेचदा कारवाई करीत नाही. कर वसूली दरवर्षी योग्यरित्या झाली तर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडून आर्थिक ताण कमी होऊ शकतो.