शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

ग्रामपंचायतींची तिजोरी रिकामी

By admin | Updated: January 6, 2016 01:05 IST

कारभार सांभाळण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत नावाची संस्था स्थापन केली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

अत्यल्प उत्पन्नात खर्च मात्र अवाढव्य : गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्षमंगेश भांडेकर चंद्रपूरकारभार सांभाळण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत नावाची संस्था स्थापन केली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, अत्यावश्यक सेवाही पुरविण्यास ग्रामपंचायती सक्षम नसल्याची गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची झाली आहे. ‘उत्पन्न कमी आणि खर्च जास्त’ असा प्रकार अनेक ग्रामपंचायतीत सुरू असल्याने जिल्ह्यातील ८३७ ग्रामपंचायतींच्या तिजोऱ्यात ठणठणाठ आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गावातील ग्रामपंचायतीला मोठे महत्त्व आहे. राज्य शासन विविध उपक्रम राबवून उपक्रमात भाग घेणाऱ्या व चांगले कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना लाखो रूपयांचा निधी देतो. तर गृह कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती आदींच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांकडून करवसूली करीत असते. मात्र उत्पन्न कमी आणि खर्चच जास्त असल्याने अनेक ग्रामपंचायतींजवळ आवश्यक सुविधा पुरविण्यासाठीही निधी शिल्लक नाही. गावात रस्ते बांधणे, गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे, सार्वजनिक स्वच्छता ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे, बाजार, जत्रा, उत्सव यांची व्यवस्था ठेवण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाला करावे लागते. या माध्यमातून लाखो रूपयांचा महसूल ग्रामपंचायतीला मिळत असते. मात्र या उत्पन्नानंतरही अनेक ग्रामपंचायतींचे भागत नसल्याची स्थिती आहे. केवळ मोठ्या ग्रामपंचायतींकडे निधीजिल्ह्यात ८३७ ग्रामपंचायती आहेत. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला जिल्ह्यातील ८३७ ग्रामपंचायतींकडे केवळ २ लाख २७ हजार १११ रूपयाचा निधी शिल्लक होता. वर्षभरात सर्व ग्रामपंचायतींना ८३ लाख ९० हजार ९५९ रूपयाचा महसूल मिळाला. यातून ५३ लाख १७ हजार ७७१ रूपयाचा निधी विविध कामांवर वर्षभरात खर्च झाला आहे. आता केवळ मोठ्या ग्रामपंचायतींकडे निधी शिल्लक असून लहान ग्रामपंचायतींच्या तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत. उत्पन्न कमी, खर्च जास्तअनेक ग्रामपंचायती उत्पन्न कमी असतानाही खर्च अधिक करीत असल्याने अत्यावश्यक सेवांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. पोंभुर्णा तालुक्यात ३१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना वार्षिक उत्पन्न ८७ हजार ९ रूपये मिळाले. मात्र यानंतरही ग्रामपंचायतींनी प्रारंभीच्या शिल्लक उत्पन्नातून ९३ हजार ४५ रूपयाचा खर्च केला आहे. तसेच कोरपना तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींना ७६ हजार ५६९ रूपये उत्पन्न मिळाले. या ग्रामपंचायतींनी ७८ हजार रूपयाचा खर्च केला आहे. थकीत करामुळे वाढला भारग्रामपंचायत प्रशासनाकडून दरवर्षी कर वसूली केली जाते. मात्र अनेक नागरिक वेळेवर कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकांकडे तीन ते चार वषाचे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाचे कर थकीत असते. मात्र अशा नागरिकांवर ग्रामपंचायत प्रशासनन बरेचदा कारवाई करीत नाही. कर वसूली दरवर्षी योग्यरित्या झाली तर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडून आर्थिक ताण कमी होऊ शकतो.