शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींची तिजोरी रिकामी

By admin | Updated: January 6, 2016 01:05 IST

कारभार सांभाळण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत नावाची संस्था स्थापन केली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

अत्यल्प उत्पन्नात खर्च मात्र अवाढव्य : गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्षमंगेश भांडेकर चंद्रपूरकारभार सांभाळण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत नावाची संस्था स्थापन केली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, अत्यावश्यक सेवाही पुरविण्यास ग्रामपंचायती सक्षम नसल्याची गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची झाली आहे. ‘उत्पन्न कमी आणि खर्च जास्त’ असा प्रकार अनेक ग्रामपंचायतीत सुरू असल्याने जिल्ह्यातील ८३७ ग्रामपंचायतींच्या तिजोऱ्यात ठणठणाठ आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गावातील ग्रामपंचायतीला मोठे महत्त्व आहे. राज्य शासन विविध उपक्रम राबवून उपक्रमात भाग घेणाऱ्या व चांगले कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना लाखो रूपयांचा निधी देतो. तर गृह कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती आदींच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांकडून करवसूली करीत असते. मात्र उत्पन्न कमी आणि खर्चच जास्त असल्याने अनेक ग्रामपंचायतींजवळ आवश्यक सुविधा पुरविण्यासाठीही निधी शिल्लक नाही. गावात रस्ते बांधणे, गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे, सार्वजनिक स्वच्छता ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे, बाजार, जत्रा, उत्सव यांची व्यवस्था ठेवण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाला करावे लागते. या माध्यमातून लाखो रूपयांचा महसूल ग्रामपंचायतीला मिळत असते. मात्र या उत्पन्नानंतरही अनेक ग्रामपंचायतींचे भागत नसल्याची स्थिती आहे. केवळ मोठ्या ग्रामपंचायतींकडे निधीजिल्ह्यात ८३७ ग्रामपंचायती आहेत. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला जिल्ह्यातील ८३७ ग्रामपंचायतींकडे केवळ २ लाख २७ हजार १११ रूपयाचा निधी शिल्लक होता. वर्षभरात सर्व ग्रामपंचायतींना ८३ लाख ९० हजार ९५९ रूपयाचा महसूल मिळाला. यातून ५३ लाख १७ हजार ७७१ रूपयाचा निधी विविध कामांवर वर्षभरात खर्च झाला आहे. आता केवळ मोठ्या ग्रामपंचायतींकडे निधी शिल्लक असून लहान ग्रामपंचायतींच्या तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत. उत्पन्न कमी, खर्च जास्तअनेक ग्रामपंचायती उत्पन्न कमी असतानाही खर्च अधिक करीत असल्याने अत्यावश्यक सेवांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. पोंभुर्णा तालुक्यात ३१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना वार्षिक उत्पन्न ८७ हजार ९ रूपये मिळाले. मात्र यानंतरही ग्रामपंचायतींनी प्रारंभीच्या शिल्लक उत्पन्नातून ९३ हजार ४५ रूपयाचा खर्च केला आहे. तसेच कोरपना तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींना ७६ हजार ५६९ रूपये उत्पन्न मिळाले. या ग्रामपंचायतींनी ७८ हजार रूपयाचा खर्च केला आहे. थकीत करामुळे वाढला भारग्रामपंचायत प्रशासनाकडून दरवर्षी कर वसूली केली जाते. मात्र अनेक नागरिक वेळेवर कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकांकडे तीन ते चार वषाचे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाचे कर थकीत असते. मात्र अशा नागरिकांवर ग्रामपंचायत प्रशासनन बरेचदा कारवाई करीत नाही. कर वसूली दरवर्षी योग्यरित्या झाली तर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडून आर्थिक ताण कमी होऊ शकतो.