शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींची तिजोरी रिकामी

By admin | Updated: January 6, 2016 01:05 IST

कारभार सांभाळण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत नावाची संस्था स्थापन केली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

अत्यल्प उत्पन्नात खर्च मात्र अवाढव्य : गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्षमंगेश भांडेकर चंद्रपूरकारभार सांभाळण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत नावाची संस्था स्थापन केली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, अत्यावश्यक सेवाही पुरविण्यास ग्रामपंचायती सक्षम नसल्याची गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची झाली आहे. ‘उत्पन्न कमी आणि खर्च जास्त’ असा प्रकार अनेक ग्रामपंचायतीत सुरू असल्याने जिल्ह्यातील ८३७ ग्रामपंचायतींच्या तिजोऱ्यात ठणठणाठ आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गावातील ग्रामपंचायतीला मोठे महत्त्व आहे. राज्य शासन विविध उपक्रम राबवून उपक्रमात भाग घेणाऱ्या व चांगले कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना लाखो रूपयांचा निधी देतो. तर गृह कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती आदींच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांकडून करवसूली करीत असते. मात्र उत्पन्न कमी आणि खर्चच जास्त असल्याने अनेक ग्रामपंचायतींजवळ आवश्यक सुविधा पुरविण्यासाठीही निधी शिल्लक नाही. गावात रस्ते बांधणे, गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे, सार्वजनिक स्वच्छता ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे, बाजार, जत्रा, उत्सव यांची व्यवस्था ठेवण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाला करावे लागते. या माध्यमातून लाखो रूपयांचा महसूल ग्रामपंचायतीला मिळत असते. मात्र या उत्पन्नानंतरही अनेक ग्रामपंचायतींचे भागत नसल्याची स्थिती आहे. केवळ मोठ्या ग्रामपंचायतींकडे निधीजिल्ह्यात ८३७ ग्रामपंचायती आहेत. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला जिल्ह्यातील ८३७ ग्रामपंचायतींकडे केवळ २ लाख २७ हजार १११ रूपयाचा निधी शिल्लक होता. वर्षभरात सर्व ग्रामपंचायतींना ८३ लाख ९० हजार ९५९ रूपयाचा महसूल मिळाला. यातून ५३ लाख १७ हजार ७७१ रूपयाचा निधी विविध कामांवर वर्षभरात खर्च झाला आहे. आता केवळ मोठ्या ग्रामपंचायतींकडे निधी शिल्लक असून लहान ग्रामपंचायतींच्या तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत. उत्पन्न कमी, खर्च जास्तअनेक ग्रामपंचायती उत्पन्न कमी असतानाही खर्च अधिक करीत असल्याने अत्यावश्यक सेवांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. पोंभुर्णा तालुक्यात ३१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना वार्षिक उत्पन्न ८७ हजार ९ रूपये मिळाले. मात्र यानंतरही ग्रामपंचायतींनी प्रारंभीच्या शिल्लक उत्पन्नातून ९३ हजार ४५ रूपयाचा खर्च केला आहे. तसेच कोरपना तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींना ७६ हजार ५६९ रूपये उत्पन्न मिळाले. या ग्रामपंचायतींनी ७८ हजार रूपयाचा खर्च केला आहे. थकीत करामुळे वाढला भारग्रामपंचायत प्रशासनाकडून दरवर्षी कर वसूली केली जाते. मात्र अनेक नागरिक वेळेवर कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकांकडे तीन ते चार वषाचे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाचे कर थकीत असते. मात्र अशा नागरिकांवर ग्रामपंचायत प्रशासनन बरेचदा कारवाई करीत नाही. कर वसूली दरवर्षी योग्यरित्या झाली तर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडून आर्थिक ताण कमी होऊ शकतो.