शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ग्रामपंचायतींचे कोरोनामुळे अर्थचक्र कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST

कसा करावा गावाचा विकास? : करवसुलीवर मोठा परिणाम शशिकांत गणवीर भेजगाव : मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायतींची ...

कसा करावा गावाचा विकास? : करवसुलीवर मोठा परिणाम

शशिकांत गणवीर

भेजगाव : मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायतींची गृह व पाणी करवसुली कोरोनामुळे मंदावली आहे. परिणामी ग्रामपंचायतीचे अर्थचक्र कोलमडले असून विकास कामांवर परिणाम पडत आहे.

ग्रामपंचायतीची करवसुली विशेषता धान पीक हातात आल्यानंतर म्हणजेच मार्च महिन्याच्या शेवटी ग्रामस्थ भरत असतात. मात्र देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्य शासनाला लॉकडाऊन सुरू करावा लागला. परिणामी शेतकरी व शेतमजूर, छोटे उद्योजक यांच्या रोजगारावर पाणी फिरले. त्यामुळे अनेक नागरिकांनी कर भरण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी ग्रामपंचायतीची करवसुली मंदावली. याउलट ग्रामपंचायतीचा खर्च मात्र जैसे थे आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन कर वसुलीतून होत असते. प्रत्येक ग्रामपंचायतीला दोन, तीन कर्मचारी कार्यरत आहेत. करवसुली थांबल्याने कर्मचाऱ्यांचे ५० टक्के (ग्रामपंचायत हिस्सा) मानधन देण्यात ग्रामपंचायतींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावर्षीच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हे अनेकांच्या हाताचे काम गेले. शेती परवडण्याजोगी राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून गृहकर्ज थकबाकीदारांची संख्या वाढली आहे. ग्रामपंचायतीचा आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या ग्रामसेवकांची डोकेदुखी वाढली आहे. परिणामी गावांच्या विकास कामावर परिणाम पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंप्रेरणेने कर भरावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बॉक्स

पाणीपुरवठा योजनेचे वीज बिलही थकीत

मूल तालुक्यातील बहुतांश गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचे वीज बिल हजारो रुपये येते. मात्र कोरोनामुळे करवसुली झाली नसल्याने जवळपास पाच महिन्यांपासून वीज बिल थकीत आहेत. परिणामी योजनांचा पाणीपुरवठा कधी खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोट

नागरिकांचा कर भरण्याचा कालावधी जवळपास उन्हाळ्यात असतो आणि दोन्ही वर्षी कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट उन्हाळ्यातच आल्याने कर वसुलीवर परिणाम झाला आहे. परिणामी आर्थिक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांचे पगार व वीज बिल थकीत आहेत. ग्रामपंचायतीचा आर्थिक गाडा सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

-विजय यारेवार, ग्रामविकास अधिकारी, मूल