शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

कर वसुली नसणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखली

By admin | Updated: April 7, 2015 23:56 IST

अनेक नागरिक गृहकराचा नियमीत भरणा करीत नाही. ग्रामपंचायत कर्मचारी कर वसूलीसाठी जातात,

शासनाची अट अन्यायकारक : ९० टक्के कर वसुली बंधनकारक चंद्रपूर : अनेक नागरिक गृहकराचा नियमीत भरणा करीत नाही. ग्रामपंचायत कर्मचारी कर वसूलीसाठी जातात, आणि रिकामे परतात. थकीत करामुळे गावातील सोयीसुविधांवर तसेच कर्मचाऱ्यांचे पगार काढताना अडचणी येतात. ग्रामपंचायतीची करवसुली वाढावी यासाठी ९० टक्के कर वसुली ज्यांनी केली नाही, अशा ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखून त्यांच्या महागाई भत्त्यावरही राज्य शासनाने टाच आणली आहे. गत सहा महिन्यांपासून राज्यात ही परिस्थिती असून, यात विदर्भातील सुमारे २० हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण मंत्रालयाने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०१३ पासून किमान वेतनवाढ करून निर्धारित केलेल्या वाढीव दरानुसार विशेष महागाई भत्ता लागू केला आहे. मात्र हा आदेश काढताना शासनाने कर्मचाऱ्यांना किमान वेतन १०० टक्के अनुदानास पात्र होण्याकरिता ग्रामपंचायत कराची वसुली ही ८० ते ९० टक्के होणे गरजेचे आहे, अशी अट घातली होती. वास्तविक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगार देता यावे म्हणून किमान वेतनाच्या अगोदर शासन ५० टक्के अनुदान ग्रामपंचायतींना देत होते. मात्र एप्रिल २०१४ पासून शासनाने लोकसंख्येच्या परिमंडळ व आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या १०० टक्के अनुदान मंजूर करून यामध्ये वसुलीची अट कायम ठेवली. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींची वसुली ९० टक्के आहे, त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनवाढ आणि महागाई भत्ता मिळत आहे. मात्र अशा ग्रामपंचायती फार कमी आहेत. उर्वरीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळालेली नाही. टक्केवारी कमी असल्यामुळे शासनाचे अनुदान येऊन सुद्धा कर्मचाऱ्यांचे नियमित पगार, वाढीव पगार आणि महागाई भत्ता सहा महिन्यांपासून बंद असल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)अट रद्द करण्याची मागणीउद्दिष्टपूर्ती न झाल्यास कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर त्याचा परिणाम होत नाही, अशी कुठेही तरतूद नाही. मग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाच हा नियम का लागू करण्यात आला, हा अन्याय असून, शासनाने ९० टक्के कर वसुलीची अट रद्द करण्याची मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून होत आहे.दुष्काळी परिस्थितीचा फटकाअनेक गावात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ग्रामपंचायतींची वसुली फारच कमी आहे. नागरिक कर भरत नाही. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत आहे. जिल्ह्यात कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून कर वसुलीची टक्केवारी फार मोठ्या प्रमाणात घसरली आहे.