शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

कर वसुली नसणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखली

By admin | Updated: April 7, 2015 23:56 IST

अनेक नागरिक गृहकराचा नियमीत भरणा करीत नाही. ग्रामपंचायत कर्मचारी कर वसूलीसाठी जातात,

शासनाची अट अन्यायकारक : ९० टक्के कर वसुली बंधनकारक चंद्रपूर : अनेक नागरिक गृहकराचा नियमीत भरणा करीत नाही. ग्रामपंचायत कर्मचारी कर वसूलीसाठी जातात, आणि रिकामे परतात. थकीत करामुळे गावातील सोयीसुविधांवर तसेच कर्मचाऱ्यांचे पगार काढताना अडचणी येतात. ग्रामपंचायतीची करवसुली वाढावी यासाठी ९० टक्के कर वसुली ज्यांनी केली नाही, अशा ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखून त्यांच्या महागाई भत्त्यावरही राज्य शासनाने टाच आणली आहे. गत सहा महिन्यांपासून राज्यात ही परिस्थिती असून, यात विदर्भातील सुमारे २० हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण मंत्रालयाने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०१३ पासून किमान वेतनवाढ करून निर्धारित केलेल्या वाढीव दरानुसार विशेष महागाई भत्ता लागू केला आहे. मात्र हा आदेश काढताना शासनाने कर्मचाऱ्यांना किमान वेतन १०० टक्के अनुदानास पात्र होण्याकरिता ग्रामपंचायत कराची वसुली ही ८० ते ९० टक्के होणे गरजेचे आहे, अशी अट घातली होती. वास्तविक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगार देता यावे म्हणून किमान वेतनाच्या अगोदर शासन ५० टक्के अनुदान ग्रामपंचायतींना देत होते. मात्र एप्रिल २०१४ पासून शासनाने लोकसंख्येच्या परिमंडळ व आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या १०० टक्के अनुदान मंजूर करून यामध्ये वसुलीची अट कायम ठेवली. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींची वसुली ९० टक्के आहे, त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनवाढ आणि महागाई भत्ता मिळत आहे. मात्र अशा ग्रामपंचायती फार कमी आहेत. उर्वरीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळालेली नाही. टक्केवारी कमी असल्यामुळे शासनाचे अनुदान येऊन सुद्धा कर्मचाऱ्यांचे नियमित पगार, वाढीव पगार आणि महागाई भत्ता सहा महिन्यांपासून बंद असल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)अट रद्द करण्याची मागणीउद्दिष्टपूर्ती न झाल्यास कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर त्याचा परिणाम होत नाही, अशी कुठेही तरतूद नाही. मग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाच हा नियम का लागू करण्यात आला, हा अन्याय असून, शासनाने ९० टक्के कर वसुलीची अट रद्द करण्याची मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून होत आहे.दुष्काळी परिस्थितीचा फटकाअनेक गावात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ग्रामपंचायतींची वसुली फारच कमी आहे. नागरिक कर भरत नाही. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत आहे. जिल्ह्यात कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून कर वसुलीची टक्केवारी फार मोठ्या प्रमाणात घसरली आहे.