शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना विमा सुरक्षाकवच द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:28 IST

सरपंच, उपसरपंचांचे तहसीलदारांना निवेदन भद्रावती : सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना कोविडकाळात विमा सुरक्षाकवच देण्यात यावे, या मागणीबाबतचे ...

सरपंच, उपसरपंचांचे तहसीलदारांना निवेदन

भद्रावती : सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना कोविडकाळात विमा सुरक्षाकवच देण्यात यावे, या मागणीबाबतचे निवेदन तहसीलदार महेश शितोळे यांना भद्रावती तालुक्यातील सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य यांच्याद्वारे देण्यात आले.

सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मागील वर्षभरापासून प्रशासकीय कर्मचाऱ्यांसारखे आपापल्या गावात फ्रंटलाइन वर्कर म्हणून गावस्तरावर गावकऱ्यांच्या जीवनासाठी नि:स्वार्थ सेवा प्रदान करीत आहेत.

गावांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तसेच गाव सुरक्षित ठेवण्याकरिता कसोशीने प्रयत्न करीत आहेत. हे करीत असताना कोणत्याही बांधवांना व भगिनींना कोरोनाची लागण झाली आणि त्यात ते दगावले, तर त्यांच्या कुटुंबावर फार मोठे संकट येईल व कुटुंब उघड्यावर पडेल आणि म्हणूनच सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या कुटुंबाला सहानुभूतीचा आधार म्हणून विमा सुरक्षाकवच देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

आजपर्यंत कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेने सरपंच, उपसरपंच, सदस्यांबाबत सुरक्षेच्या हेतूने कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे आपल्या स्तरावर ग्रामपंचायत येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांना विमा सुरक्षाकवच व इतर कर्मचाऱ्यांसारखी मदत तातडीने प्रदान करण्यात यावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी चंदनखेडा ग्रामपंचायत सरपंच नयन बाबाराव जांभुळे, पानवडाळा ग्रामपंचायत सरपंच प्रदीप शंकर महाकुलकर, डोंगरगाव खडीचे उपसरपंच मुकेश भास्कर तसेच अन्य उपसरपंच, सरपंच व सदस्य उपस्थित होते.